शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ही महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:39 IST

अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी-का-मकबरा, पाणचक्की, प्राचीन दरवाजे अशा ऐतिहासिक स्थळांनी नटलेली औरंगाबाद नगरी पर्यटनाच्या बाबतीत थेट जगाच्या नकाशावर आलेली आहे; परंतु काळानुसार स्वत:मध्ये बदल करीत पर्यटक ांच्या अपेक्षेनुसार या शहरात काही भौतिक सुविधा उपलब्ध होऊन पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेंन्स’ वाढणेही आवश्यक असल्याचे मत पर्यटन व्यावसायिकांनी तसेच शहरातील पर्यटनप्रेमींनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त व्यक्त केले.

ठळक मुद्देजागतिक पर्यटन दिन : पर्यटकांच्या गरजेनुसार शहरात भौतिक सुधारणा आवश्यक

रुचिका पालोदकरऔरंगाबाद : अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी-का-मकबरा, पाणचक्की, प्राचीन दरवाजे अशा ऐतिहासिक स्थळांनी नटलेली औरंगाबाद नगरी पर्यटनाच्या बाबतीत थेट जगाच्या नकाशावर आलेली आहे; परंतु काळानुसार स्वत:मध्ये बदल करीत पर्यटक ांच्या अपेक्षेनुसार या शहरात काही भौतिक सुविधा उपलब्ध होऊन पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेंन्स’ वाढणेही आवश्यक असल्याचे मत पर्यटन व्यावसायिकांनी तसेच शहरातील पर्यटनप्रेमींनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त व्यक्त केले.सध्या अनेक व्यवसाय हे आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत. आजच्या तरुणांपर्यंत आणि जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीपर्यंत क्षणार्धात पोहोचायचे असेल, तर आपला किंवा आपल्या उद्योगाचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ असणे अत्यंत आवश्यक आहे. भरघोस उत्पन्न आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाºया पर्यटन व्यवसायानेही डिजिटल युगाची पावले ओळखत कात टाकणे गरजेचे झाले आहे. त्यामुळेच २०१८ च्या पर्यटन दिनासाठी खास ‘पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.जागतिक ख्यातीची पर्यटनस्थळे शहरात असूनही या स्थळांचा डिजिटल माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्यात पर्यटन मंडळ कमी पडत असल्याचे दिसून येते. या मंडळाचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ केवळ नावालाच असून ‘अपडेट’ राहणे आणि पर्यटन स्थळांचे ‘डिजिटल मार्के टिंग’ करून अधिकाधिक पर्यटक ांना शहराकडे आकर्षित करण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मागे पडते आहे. एमटीडीसीची वेबसाईट पुस्तकी स्वरूपातील असून, त्यावर पर्यटन स्थळांची सर्व माहिती उपलब्ध तर आहे. मात्र, सध्याच्या काळानुसार पर्यटनस्थळी असणारे तिकिटांचे दर, तिकि टांचे आॅनलाईन बुकिंग या सर्व सुविधांचा येथे अभाव आहे. येथील दूरध्वनी क्रमांकही जुने असून ते बदलणेही आवश्यक आहे. या गोष्टीमुळे पर्यटक इतर संकेतस्थळांना भेटी देतात. प्रत्येक संकेत स्थळावर वेगवेगळी माहिती उपलब्ध असल्यामुळे कोणती माहिती ग्राह्य धरावी, याबाबत पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण होतो.पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे अभ्यासपूर्ण लेखन (ब्लॉग), पर्यटन स्थळांसंबंधीचे वृत्त, या क्षेत्रात होणारे बदल या सर्व गोष्टी वारंवार संकेतस्थळावर टाकाव्यात, तसेच फे सबुक पेज, टिष्ट्वटर या माध्यमातूनही पर्यटन स्थळांचा अधिकाधिक प्रचार करावा, असे काही बदल पर्यटनप्रेमींनी सुचविले.चौकट :- परदेशी पर्यटकांनी दिवसभर पर्यटन केल्यानंतर त्यांना सायंकाळच्या वेळी त्यांच्या पद्धतीनुसार मनोरंजनासाठी शहरात काही सुविधा उपलब्ध असणेही बदलत्या काळानुसार गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या लोककलांविषयी माहिती देणाºया सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण, नाईट क्लब, खास परदेशी नागरिकांच्या पद्धतीनुसार उभी करण्यात आलेली रेस्टॉरंटस् या सर्व गोष्टी शहरात सुरू झाल्यास त्याचा पर्यटनावर निश्चितच सकारात्मक परिणाम होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.- पर्यटकांच्या दृष्टीने शहरात उत्कृष्ट बाजारपेठ निर्माण होणेही आवश्यक आहे. याच धर्तीवर अवाढव्य खर्च करून कलाग्रामचा पांढरा हत्ती उभारण्यात आला; परंतु चुकीची जागा निवडल्यामुळे आणि अन्य काही कारणांमुळे थोड्या दिवसात तेथील ‘कला’ लोप पावली असून केवळ ‘ग्राम’ उरले आहे.चौकट :रस्ते आणि कचरा हे मुख्य अडसर-डिजिटल प्रेझेन्ससोबतच शहरात भौतिक सुविधांचा अभाव दिसून येतो. येथील रस्ते आणि कचरा या दोन गोष्टी प्रामुख्याने अडसर ठरत आहेत. रस्ते दुरुस्ती हे प्रशासनाचे काम असले तरी कचºयासाठी मात्र सामान्य नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा. परदेशी नागरिकांना आपल्या शहरात स्वच्छ वाटावे म्हणून मनपाच्या बरोबरीने नागरिकांनी प्रयत्न केल्यास ही एक मोठी देशसेवा होईल.- जसवंतसिंगसहल आयोजक

टॅग्स :Aurangabad caveऔरंगाबाद लेणीtourismपर्यटन