शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

लोकसभेची उमेदवारी मागितली नाही, पण पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढेन: अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: December 23, 2023 14:15 IST

लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. यामुळे २९ किंवा ३० डिसेंबर रोजी दिल्लीत जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी आपण पक्षाकडे मागितली नाही, पण पक्षाने दिल्यास निवडणूक लढेन अशी आपली भूमिका असल्याचे विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघावर शिवसेनेकडून माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे दावा सांगत आहेत. एवढेच नव्हे तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या मतदार संघावर हक्क सांगितला जात आहे. यापार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आ. दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. यामुळे २९ किंवा ३० डिसेंबर रोजी दिल्लीत जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून कोण उमेदवार असेल, याविषयी काही ठरले का, या प्रश्नाचे उत्तर देताना दानवे म्हणाले की, पक्षाने अद्याप कोण उमेदवार असेल हे निश्चित केले नाही. आपणही पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. पण पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढेन.

असे असेल संभाव्य जागा वाटप शिवसेना २०,काँग्रेस १६ तर राष्ट्रवादीला १० आणि अन्य २ असे जागावाटपाचे सुत्र. महाविकास आघाडीकडून अद्याप लोकसभेच्या जागा वाटप करण्यात आले नाही.असे असले तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना २०, काँग्रेस १६,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १० आणि वंचीत बहुजन आघाडीला १ , राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला १ असे जागा वाटप शिवसेनेकडून प्रस्तावित करण्यात आल्याचे वरिष्ठ सुत्रांनी सांगितले.मात्र हे जागा वाटप काँग्रेस पक्ष मान्य करण्याची शक्यता नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभा