शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

हे माहिती आहे का? आझाद हिंद रेडिओचे प्रमुख सुरेशचंद्र आर्य होते औरंगाबादचे पहिले खासदार

By शांतीलाल गायकवाड | Updated: April 19, 2024 13:29 IST

फ्लॅश बॅक: औरंगाबादचे पहिले खासदार कॉँग्रेसचे सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य, पीडीएफचे एस. के. वैशंपायन यांचा दणदणीत पराभव

औरंगाबाद : देशातील पहिलीच निवडणूक, पहिलेच मतदान, पहिला खासदार, मतदान म्हणजे काय? ते कसे करतात? आदी अनेक प्रश्न व ९० टक्के निरक्षर समाज. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १९५२ मध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत जनमानसावर काँग्रेसचा प्रचंड पगडा होता. याचे प्रत्यंतर मतमोजणीतून दिसले. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार एस. के. वैशंपायन यांचा दणदणीत पराभव केला.

इंग्रज राजवटीच्या दीडशे वर्षांच्या गुलामीतून मुक्त झालेल्या भारतात २५ ऑक्टोबर १९५१ ते २२ फेब्रुवारी १९५२ या काळात पहिल्या लोकसभेसाठी मतदान झाले. देशभरात चार महिने व तब्बल ६८ टप्प्यांत मतदान चालले. औरंगाबादेत जानेवारी १९५२ मध्ये मतदान झाले; परंतु तेव्हा देशाची साक्षरता २० टक्क्यांहून, तर मराठवाड्याची १० टक्क्यांहून कमी होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेची माहिती नागरिकांनाच काय तर प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही नव्हती. हैदराबादच्या निजामावर लष्करी कारवाई करून सप्टेंबर १९४८ मध्ये हे संस्थान भारतात विलीन करण्यात आले. तेव्हा मराठवाडा व कर्नाटकातील काही भूभाग मिळून १९४८ मध्ये हैदराबाद हे स्वतंत्र राज्य तयार करण्यात आले. मराठवाड्यात तेव्हा सहा जिल्हे होते. औरंगाबाद व जालना एकच जिल्हा होता. निरक्षर देशाला मतदानाविषयी माहिती कळावी म्हणून देशभरात ऑक्टोबर १९५१ मध्ये ‘मॉक इलेक्शन’ (निवडणुकीचा सराव) घेण्यात आले होते.

प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र मतपेटीभारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली. निवडणुकीत अगदीच नवखा व प्रचंड विस्तारलेल्या देशात लोकसभेचे ४०१ मतदारसंघ व ४८९ जागा होत्या. निरक्षर मतदारांना मतदान करणे सोपे जावे यासाठी प्रत्येक उमेदवाराच्या नावाची स्वतंत्र मतपेटी मतदान केंद्रावर ठेवली होती. या मतपेटीला वेगवेगळा रंग होता. त्यावर उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह चिकटविण्यात आले होते. जेवढे उमेदवार तेवढ्या मतपेट्या ठेवलेल्या होत्या. मतदार ज्यांना मतदान करायचे त्यांच्या पेटीत ही मतपत्रिका टाकावी लागत होती.

सर्वसाधारण मतदारसंघ, कॉँग्रेसचा दणदणीत विजयऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून (क्रमांक ११) तेव्हा एकूण किती उमेदवार निवडणुकीत होते, याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही; परंतु भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निवडणुकीचे निकाल, विजेते व उपविजेत्यांची नावे व त्यांना झालेल्या मतदानाची माहिती आहे. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य यांना ७१ हजार ९२ मते मिळाली व ते विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी पीडीएफचे एस. के. वैशंपायन यांना ३५ हजार ८६९ मते मिळाली. आर्य यांनी वैशंपायन यांचा तब्बल ३५ हजार २२३ मतांनी पराभव केला होता. हा मतदारसंघ सर्वसाधारण गटात आणि एक उमेदवाराचा होता.

पहिल्या खासदाराचा अल्प परिचयडॉ. सुरेशचंद्र आर्य यांचा जन्म १८ मे १९१२ रोजी झाला. ते हैदराबादेतील हिमायत नगरचे मूळ रहिवासी होते. उच्च विद्याविभूषित असलेले डाॅ. आर्य यांना विद्यालंकार या उपाधीने गौरविले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हरिद्वार येथील गुरूकुलातून झाले. पुढे ते पॅरिस (फ्रान्स) मधून डी.लीट. झाले. जर्मनीतूनही त्यांनी शिक्षण घेतले. सत्याग्रहात सहभागी झाल्याने १९३० मध्ये त्यांना कारागृहात जावे लागले. ते १९३६-३७ या काळात बॉम्बे समाचार पत्रिकेचे संपादक होते. पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी विदेशात वास्तव्याला असताना त्यांचा संबंध क्रांतिकारकांशी आला. १९३७ ते ४७ या काळात ते आझाद हिंद सेनेच्या आझाद हिंद रेडिओचे प्रमुख होते. बर्लिनमध्ये राहून ते हे काम पाहत होते. व्हिएन्नात १९५४ मध्ये इंटर पार्लमेंटरी कॉन्फरन्समध्ये त्यांचा सहभाग होता.

असे होते मतदारसंघपहिल्या लोकसभेसाठी देशभरात लोकसभेचे ४०१ मतदारसंघ होते. तर ४८९ जागा होत्या. ३१४ मतदारसंघ एक सदस्यीय तर ८६ मतदारसंघ दोन सदस्यीय होते. त्यात सदस्य सर्वसाधारण तर दुसरा सदस्य राखीव प्रवर्गातील एससी अथवा एसटी प्रवर्गातील होता.

काँग्रेसचा ३६४ जागांवर विजयदेशभरात १८४९ उमेदवार उभे होते. ३६ कोटी लोकसंख्येच्या देशातील २१ वर्षे पूर्ण करणारे १७ कोटी ३० लाख मतदार होते. ४५.७ टक्के मतदान घेऊन काँग्रेसने ३६४ जागांवर विजय मिळवला होता. तेव्हा फक्त दोन पक्षाने विजयी उमेदवारांचा डबल आकडा गाठला होता. त्यात सीपीआयचे १६ व सोशॅलिस्ट पार्टीचे १२ खासदार विजयी झाले होते. भारतीय जनसंघाचे तीन खासदार निवडून आले. १७ एप्रिल १९५२ रोजी पहिली लोकसभा अस्तित्वात येऊन पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४