शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

हे माहिती आहे का? आझाद हिंद रेडिओचे प्रमुख सुरेशचंद्र आर्य होते औरंगाबादचे पहिले खासदार

By शांतीलाल गायकवाड | Updated: April 19, 2024 13:29 IST

फ्लॅश बॅक: औरंगाबादचे पहिले खासदार कॉँग्रेसचे सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य, पीडीएफचे एस. के. वैशंपायन यांचा दणदणीत पराभव

औरंगाबाद : देशातील पहिलीच निवडणूक, पहिलेच मतदान, पहिला खासदार, मतदान म्हणजे काय? ते कसे करतात? आदी अनेक प्रश्न व ९० टक्के निरक्षर समाज. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १९५२ मध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत जनमानसावर काँग्रेसचा प्रचंड पगडा होता. याचे प्रत्यंतर मतमोजणीतून दिसले. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार एस. के. वैशंपायन यांचा दणदणीत पराभव केला.

इंग्रज राजवटीच्या दीडशे वर्षांच्या गुलामीतून मुक्त झालेल्या भारतात २५ ऑक्टोबर १९५१ ते २२ फेब्रुवारी १९५२ या काळात पहिल्या लोकसभेसाठी मतदान झाले. देशभरात चार महिने व तब्बल ६८ टप्प्यांत मतदान चालले. औरंगाबादेत जानेवारी १९५२ मध्ये मतदान झाले; परंतु तेव्हा देशाची साक्षरता २० टक्क्यांहून, तर मराठवाड्याची १० टक्क्यांहून कमी होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेची माहिती नागरिकांनाच काय तर प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही नव्हती. हैदराबादच्या निजामावर लष्करी कारवाई करून सप्टेंबर १९४८ मध्ये हे संस्थान भारतात विलीन करण्यात आले. तेव्हा मराठवाडा व कर्नाटकातील काही भूभाग मिळून १९४८ मध्ये हैदराबाद हे स्वतंत्र राज्य तयार करण्यात आले. मराठवाड्यात तेव्हा सहा जिल्हे होते. औरंगाबाद व जालना एकच जिल्हा होता. निरक्षर देशाला मतदानाविषयी माहिती कळावी म्हणून देशभरात ऑक्टोबर १९५१ मध्ये ‘मॉक इलेक्शन’ (निवडणुकीचा सराव) घेण्यात आले होते.

प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र मतपेटीभारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली. निवडणुकीत अगदीच नवखा व प्रचंड विस्तारलेल्या देशात लोकसभेचे ४०१ मतदारसंघ व ४८९ जागा होत्या. निरक्षर मतदारांना मतदान करणे सोपे जावे यासाठी प्रत्येक उमेदवाराच्या नावाची स्वतंत्र मतपेटी मतदान केंद्रावर ठेवली होती. या मतपेटीला वेगवेगळा रंग होता. त्यावर उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह चिकटविण्यात आले होते. जेवढे उमेदवार तेवढ्या मतपेट्या ठेवलेल्या होत्या. मतदार ज्यांना मतदान करायचे त्यांच्या पेटीत ही मतपत्रिका टाकावी लागत होती.

सर्वसाधारण मतदारसंघ, कॉँग्रेसचा दणदणीत विजयऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून (क्रमांक ११) तेव्हा एकूण किती उमेदवार निवडणुकीत होते, याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही; परंतु भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निवडणुकीचे निकाल, विजेते व उपविजेत्यांची नावे व त्यांना झालेल्या मतदानाची माहिती आहे. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य यांना ७१ हजार ९२ मते मिळाली व ते विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी पीडीएफचे एस. के. वैशंपायन यांना ३५ हजार ८६९ मते मिळाली. आर्य यांनी वैशंपायन यांचा तब्बल ३५ हजार २२३ मतांनी पराभव केला होता. हा मतदारसंघ सर्वसाधारण गटात आणि एक उमेदवाराचा होता.

पहिल्या खासदाराचा अल्प परिचयडॉ. सुरेशचंद्र आर्य यांचा जन्म १८ मे १९१२ रोजी झाला. ते हैदराबादेतील हिमायत नगरचे मूळ रहिवासी होते. उच्च विद्याविभूषित असलेले डाॅ. आर्य यांना विद्यालंकार या उपाधीने गौरविले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हरिद्वार येथील गुरूकुलातून झाले. पुढे ते पॅरिस (फ्रान्स) मधून डी.लीट. झाले. जर्मनीतूनही त्यांनी शिक्षण घेतले. सत्याग्रहात सहभागी झाल्याने १९३० मध्ये त्यांना कारागृहात जावे लागले. ते १९३६-३७ या काळात बॉम्बे समाचार पत्रिकेचे संपादक होते. पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी विदेशात वास्तव्याला असताना त्यांचा संबंध क्रांतिकारकांशी आला. १९३७ ते ४७ या काळात ते आझाद हिंद सेनेच्या आझाद हिंद रेडिओचे प्रमुख होते. बर्लिनमध्ये राहून ते हे काम पाहत होते. व्हिएन्नात १९५४ मध्ये इंटर पार्लमेंटरी कॉन्फरन्समध्ये त्यांचा सहभाग होता.

असे होते मतदारसंघपहिल्या लोकसभेसाठी देशभरात लोकसभेचे ४०१ मतदारसंघ होते. तर ४८९ जागा होत्या. ३१४ मतदारसंघ एक सदस्यीय तर ८६ मतदारसंघ दोन सदस्यीय होते. त्यात सदस्य सर्वसाधारण तर दुसरा सदस्य राखीव प्रवर्गातील एससी अथवा एसटी प्रवर्गातील होता.

काँग्रेसचा ३६४ जागांवर विजयदेशभरात १८४९ उमेदवार उभे होते. ३६ कोटी लोकसंख्येच्या देशातील २१ वर्षे पूर्ण करणारे १७ कोटी ३० लाख मतदार होते. ४५.७ टक्के मतदान घेऊन काँग्रेसने ३६४ जागांवर विजय मिळवला होता. तेव्हा फक्त दोन पक्षाने विजयी उमेदवारांचा डबल आकडा गाठला होता. त्यात सीपीआयचे १६ व सोशॅलिस्ट पार्टीचे १२ खासदार विजयी झाले होते. भारतीय जनसंघाचे तीन खासदार निवडून आले. १७ एप्रिल १९५२ रोजी पहिली लोकसभा अस्तित्वात येऊन पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४