शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पक्षातील सुसंवाद संपतोय...निष्ठावंतांची घुसमट - भारतभूषण क्षीरसागर

By admin | Updated: June 10, 2017 00:03 IST

बीड : प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्षीरसागर घराण्याने सर्वसामान्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला वैभव प्राप्त करून दिले.

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्षीरसागर घराण्याने सर्वसामान्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला वैभव प्राप्त करून दिले. परंतु आज अशा अनेक निष्ठावंतांची पक्षात घुसमट होत आहे. पक्षातील सुसंवाद, समन्वय संपतोय की काय, अशी शंका येण्याइतपत अंतर्गत हालचाली वाढत आहेत. ह्या गोष्टी पक्षाच्या हिताच्या नाहीत, अशी खंत नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.राकाँच्या जिल्हाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांची नियुक्ती झाली. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ज्या लोकांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाच्या विरुद्ध काम केले, निवडणूक लढविली, अशा लोकांच्याच हातात पदाधिकारी निवडताना ‘व्हीप’चे अधिकार दिले होते. असा प्रकार कुठल्याच पक्षात यापूर्वी घडला नसावा. या कृतीचा निषेध म्हणून मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा तेव्हाच दिला होता. बजरंग सोनवणे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली, याचा आम्हालाही आनंद आहे, त्यांच्याशी सहकार्यही असेल. परंतु पक्षश्रेष्ठींनी ही निवड करण्यापूर्वी जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळींशी चर्चा करायला हवी होती. परंतु तसे घडले नाही, याचे शल्य वाटते. आम्ही पक्षासाठी काय केले? पक्ष कसा वाढविला? किती खस्ता खाल्ल्या? हे आम्हाला सांगायची गरज वाटत नाही. कारण जिल्ह्याला हे माहीत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही मागील लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार जयसिंग गायकवाड यांना ४० हजार मताधिक्याने निवडून आणले होते. उमेदवार कोणीही असो, पक्ष महत्त्वाचा, हा गुण आमच्या रक्तात आहे. परंतु भाजपमधूनचे ‘आयाराम’ आम्हाला निष्ठेचे धडे देत आहेत.पालिकेतील घटना घडामोडी संदर्भात ते म्हणाले, विकासाचे सकारात्मक राजकारण करणे हा आमचा स्वभाव आहे. परंतु व्यक्तिद्वेषातून काही मंडळी पालिकेत आली, विकास सोडून वैयक्तिक हेव्यादाव्यातून पालिकेतील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे, ही गोष्ट निंदनीय आहे.प्रस्तावावर सह्या होत नाहीत, विरोध केला जातो, असा आरोप केला जातो. परंतु एखादा प्रस्ताव, निर्णय जर पालिकेच्या हिताचा नसेल तर कितीही दबाव असेल तर तो, मी मान्य असा करेल, असे सांगताना त्यांनी कचऱ्याच्या टेंडरचे उदाहरण दिले. कचरा उचलण्यासाठीच्या घंटागाडीचे टेंडर दुप्पट दराने आले होते. नियमानुसार टेंडरची संख्या ३ आवश्यक असतानाही दोनच होते. या कारणास्तव आणि नियमाप्रमाणे मी या टेंडरला विरोध केला, तो वैयक्तिक भावनेतून नाही तर पालिकेच्या हितातून घेतला होता.