शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

पक्षातील सुसंवाद संपतोय...निष्ठावंतांची घुसमट - भारतभूषण क्षीरसागर

By admin | Updated: June 10, 2017 00:03 IST

बीड : प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्षीरसागर घराण्याने सर्वसामान्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला वैभव प्राप्त करून दिले.

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्षीरसागर घराण्याने सर्वसामान्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला वैभव प्राप्त करून दिले. परंतु आज अशा अनेक निष्ठावंतांची पक्षात घुसमट होत आहे. पक्षातील सुसंवाद, समन्वय संपतोय की काय, अशी शंका येण्याइतपत अंतर्गत हालचाली वाढत आहेत. ह्या गोष्टी पक्षाच्या हिताच्या नाहीत, अशी खंत नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.राकाँच्या जिल्हाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांची नियुक्ती झाली. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ज्या लोकांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाच्या विरुद्ध काम केले, निवडणूक लढविली, अशा लोकांच्याच हातात पदाधिकारी निवडताना ‘व्हीप’चे अधिकार दिले होते. असा प्रकार कुठल्याच पक्षात यापूर्वी घडला नसावा. या कृतीचा निषेध म्हणून मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा तेव्हाच दिला होता. बजरंग सोनवणे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली, याचा आम्हालाही आनंद आहे, त्यांच्याशी सहकार्यही असेल. परंतु पक्षश्रेष्ठींनी ही निवड करण्यापूर्वी जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळींशी चर्चा करायला हवी होती. परंतु तसे घडले नाही, याचे शल्य वाटते. आम्ही पक्षासाठी काय केले? पक्ष कसा वाढविला? किती खस्ता खाल्ल्या? हे आम्हाला सांगायची गरज वाटत नाही. कारण जिल्ह्याला हे माहीत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही मागील लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार जयसिंग गायकवाड यांना ४० हजार मताधिक्याने निवडून आणले होते. उमेदवार कोणीही असो, पक्ष महत्त्वाचा, हा गुण आमच्या रक्तात आहे. परंतु भाजपमधूनचे ‘आयाराम’ आम्हाला निष्ठेचे धडे देत आहेत.पालिकेतील घटना घडामोडी संदर्भात ते म्हणाले, विकासाचे सकारात्मक राजकारण करणे हा आमचा स्वभाव आहे. परंतु व्यक्तिद्वेषातून काही मंडळी पालिकेत आली, विकास सोडून वैयक्तिक हेव्यादाव्यातून पालिकेतील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे, ही गोष्ट निंदनीय आहे.प्रस्तावावर सह्या होत नाहीत, विरोध केला जातो, असा आरोप केला जातो. परंतु एखादा प्रस्ताव, निर्णय जर पालिकेच्या हिताचा नसेल तर कितीही दबाव असेल तर तो, मी मान्य असा करेल, असे सांगताना त्यांनी कचऱ्याच्या टेंडरचे उदाहरण दिले. कचरा उचलण्यासाठीच्या घंटागाडीचे टेंडर दुप्पट दराने आले होते. नियमानुसार टेंडरची संख्या ३ आवश्यक असतानाही दोनच होते. या कारणास्तव आणि नियमाप्रमाणे मी या टेंडरला विरोध केला, तो वैयक्तिक भावनेतून नाही तर पालिकेच्या हितातून घेतला होता.