शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

वीज बिल वसुलीसाठी औरंगाबाद महावितरण घेणार धर्मगुरूंचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 13:57 IST

आता वीजचोरी रोखण्यासाठी जनतेचे उद्बोधन धर्मगुरूंकडून करण्याचा फंडा वापरला जाणार असून, यासाठी धर्मगुरूंची बैठकही महावितरण घेत असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत 

ठळक मुद्देवीजचोरी रोखणे, थकबाकी वसुलीचा नवा फंडा धर्मगुरूंकडून करणार जनतेचे उद्बोधन 

औरंगाबाद : महावितरणने थकीत वीज बिल वसुली व वीजचोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करूनदेखील फारसे यश आले नाही. आता वीजचोरी रोखण्यासाठी जनतेचे उद्बोधन धर्मगुरूंकडून करण्याचा फंडा वापरला जाणार असून, यासाठी धर्मगुरूंची बैठकही महावितरण घेत असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद परिमंडळांतर्गत वीज ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी घरगुती ग्राहक, कंपन्या, व्यापारी, कृषिपंप ग्राहकांकडे आहे. त्यामुळे महावितरणला सध्या अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजचोरी रोखणे, थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विविध उपाययोजना केल्या. दुस-या मंडळातील कर्मचा-यांच्या पथकांकडून घरोघरी जाऊन वीजचोरीचा आढावा घेतला. थकबाकी वसुलीची मोहीम राबविली. पोलिसांना सोबत घेऊन वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबविली; परंतु वीजचोरी पूर्णपणे थांबलेली नाही. यावर उपाययोजना म्हणून महावितरणने आता धर्मगुरूंचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मगुरू, पुजारी, कीर्तनकार, प्रबोधकार आदींच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. धर्मगुरूंनी वीजचोरी करणे पाप आहे, चोरी करू नये, असा उपदेश कीर्तन, प्रवचन, व्याख्यान आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून देऊन जनजागृती करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. यासाठी आज मुस्लिम धर्मगुरूंसोबत चर्चा झाली.

लवकरच अन्य धर्मांतील प्रमुख व्यक्तींची बैठक महावितरण कार्यालयात घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता गणेशकर यांनी दिली.गणेशकर म्हणाले की, महावितरणने घरोघरी जाऊन मीटर तपासणी मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ४५० घरांमध्ये वीजचोरी आढळली. ५०० मीटर जप्त केले आहेत. यामुळे शहरात सुमारे १८ लाख १८ हजार युनिटची चोरी अर्थात या युनिटसाठी महावितरणला महापारेषण कंपनीकडे सुमारे एक कोटी रुपये द्यावे लागत होते. यापुढेही ही कारवाई सुरूच राहील. उद्यापासून ३५० कर्मचा-यांची पथके शहरातील विविध भागांत घरोघरी जाऊन मीटरची तपासणी करणार आहेत. येणाºया काही दिवसांत वीजचोरी ब-यापैकी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. 

हायव्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम बसवणारज्या भागात ७० टक्क्यांपर्यंत वीजचोरी आहे. त्या ठिकाणी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत एरिअल बंच केबल (ए. बी. केबल) व हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम (एचव्हीडीएस) बसविण्यात येणार आहे. यामुळे वीजचोरीवर नियंत्रण मिळवता येईल. अशा प्रकारची सिस्टीम शहराच्या विविध ६० ठिकाणी बसवण्यात येणार असल्याची माहिती गणेशकर यांनी दिली. ए.बी.केबल व एचव्हीडीएस सिस्टीमच्या कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.