शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

वीज बिल वसुलीसाठी औरंगाबाद महावितरण घेणार धर्मगुरूंचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 13:57 IST

आता वीजचोरी रोखण्यासाठी जनतेचे उद्बोधन धर्मगुरूंकडून करण्याचा फंडा वापरला जाणार असून, यासाठी धर्मगुरूंची बैठकही महावितरण घेत असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत 

ठळक मुद्देवीजचोरी रोखणे, थकबाकी वसुलीचा नवा फंडा धर्मगुरूंकडून करणार जनतेचे उद्बोधन 

औरंगाबाद : महावितरणने थकीत वीज बिल वसुली व वीजचोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करूनदेखील फारसे यश आले नाही. आता वीजचोरी रोखण्यासाठी जनतेचे उद्बोधन धर्मगुरूंकडून करण्याचा फंडा वापरला जाणार असून, यासाठी धर्मगुरूंची बैठकही महावितरण घेत असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद परिमंडळांतर्गत वीज ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी घरगुती ग्राहक, कंपन्या, व्यापारी, कृषिपंप ग्राहकांकडे आहे. त्यामुळे महावितरणला सध्या अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजचोरी रोखणे, थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विविध उपाययोजना केल्या. दुस-या मंडळातील कर्मचा-यांच्या पथकांकडून घरोघरी जाऊन वीजचोरीचा आढावा घेतला. थकबाकी वसुलीची मोहीम राबविली. पोलिसांना सोबत घेऊन वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबविली; परंतु वीजचोरी पूर्णपणे थांबलेली नाही. यावर उपाययोजना म्हणून महावितरणने आता धर्मगुरूंचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मगुरू, पुजारी, कीर्तनकार, प्रबोधकार आदींच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. धर्मगुरूंनी वीजचोरी करणे पाप आहे, चोरी करू नये, असा उपदेश कीर्तन, प्रवचन, व्याख्यान आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून देऊन जनजागृती करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. यासाठी आज मुस्लिम धर्मगुरूंसोबत चर्चा झाली.

लवकरच अन्य धर्मांतील प्रमुख व्यक्तींची बैठक महावितरण कार्यालयात घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता गणेशकर यांनी दिली.गणेशकर म्हणाले की, महावितरणने घरोघरी जाऊन मीटर तपासणी मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ४५० घरांमध्ये वीजचोरी आढळली. ५०० मीटर जप्त केले आहेत. यामुळे शहरात सुमारे १८ लाख १८ हजार युनिटची चोरी अर्थात या युनिटसाठी महावितरणला महापारेषण कंपनीकडे सुमारे एक कोटी रुपये द्यावे लागत होते. यापुढेही ही कारवाई सुरूच राहील. उद्यापासून ३५० कर्मचा-यांची पथके शहरातील विविध भागांत घरोघरी जाऊन मीटरची तपासणी करणार आहेत. येणाºया काही दिवसांत वीजचोरी ब-यापैकी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. 

हायव्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम बसवणारज्या भागात ७० टक्क्यांपर्यंत वीजचोरी आहे. त्या ठिकाणी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत एरिअल बंच केबल (ए. बी. केबल) व हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम (एचव्हीडीएस) बसविण्यात येणार आहे. यामुळे वीजचोरीवर नियंत्रण मिळवता येईल. अशा प्रकारची सिस्टीम शहराच्या विविध ६० ठिकाणी बसवण्यात येणार असल्याची माहिती गणेशकर यांनी दिली. ए.बी.केबल व एचव्हीडीएस सिस्टीमच्या कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.