शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

राज्यात धनगर समाजाचा होणार नव्याने अभ्यास !

By admin | Updated: July 4, 2016 00:09 IST

गंगाराम आढाव , जालना शेजारील राज्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू झालेले आहे. पण केवळ शब्दाच्या गोंधळामुळे महाराष्ट्रात याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही

गंगाराम आढाव , जालनाशेजारील राज्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू झालेले आहे. पण केवळ शब्दाच्या गोंधळामुळे महाराष्ट्रात याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. म्हणूनच राज्यात धनगर समाजाचा नव्याने अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने टाटा सामाजिक संस्थेची नेमणूक केली आहे. येत्या वर्षभरात याबाबतचा सर्वांगीण अभ्यास करून ही संस्था शासनाला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निश्चितपणे निकाली निघेल, असा विश्वास खा.डॉ. विकास महात्मे यांनी रविवारी येथे व्यक्त केला.जालन्यात धनगर समाज संघर्ष समितीाच्या वतीने डॉ. विकास महात्मे यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राज्यसभेत गेल्या शिवाय सुटणार नाही. ते सुटावे म्हणून आपण सामाजिक क्षेत्रातून राज्यसभेवर निवडले गेलो. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे डॉ. महात्मे म्हणाले. समाजाला राज्यघटनेनेच अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले आहे. मात्र, त्याची अमंलबजावणी होत नाही, ही खंत आहे. ‘धनगर आणि धनगड एक नाही’ असा अहवाल तत्कालीन आघाडी सरकारने केंद्राकडे पाठविलेला आहे. धनगर आणि धनगड एकच असल्याबाबतचे पुरावे आम्ही सादर केले आहेत. तरीही याबाबतचा घोळ कायम आहे. तो सोडविण्यासाठी २६ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक झाली. त्यात राज्यात समाजाचा नव्याने अभ्यास करण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी टाटा सामाजिक संस्थेची नेमणूक करण्यात आली. समाजातील संघटना, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे म्हणने जाणून घेणार असून, त्यानंतर आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर आरक्षणाबाबत राज्य सरकार केंद्राकडे शिफारस पाठवून त्यानुसार समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळाल्यास ते न्यायालयात टिकून राहावे यासाठी योग्य पद्धत, अभ्यासपूर्ण संशोधन केले जाईल. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत आदिवासी समाजाचा विरोध नाही. मात्र, त्यांच्या नेत्यांचा आहे. अस्तित्वाचा प्रश्न करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते चुकीचे असल्याचे मत डॉ. महात्मे यांनी व्यक्त केले.