शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

औरंगाबादेत दंगल घडणार असल्याचा अहवाल कुणी दडपला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:09 IST

औरंगाबादेत दंगल घडणार असा गुप्तचर खात्याने दिलेला लेखी अहवाल कोणत्या अधिकाऱ्याने दडपला, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी येथे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबादेत दंगल घडणार असा गुप्तचर खात्याने दिलेला लेखी अहवाल कोणत्या अधिकाऱ्याने दडपला, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी येथे केली.मुंडे यांनी दुपारी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर ते सुभेदारी गेस्ट हाऊसवर पत्रकारांशी बोलत होते.त्यांनी सांगितले की, माझी पक्की माहिती आहे की, दंगल होणार असल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिका-यांना अडीच महिन्यांपूर्वी अहवाल दिला गेला होता. परंतु वरीष्ठ अधिका-यांनी ही माहिती दडवली. या अहवालाची दखल घेऊन वेळीच कारवाई केली असती, तर कदाचित ही दंगलही टळली असती. गुप्तचर खात्याचा अहवाल दाबणा-या त्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांवर तातडीने कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी जोरदार मागणी मुंडे यांनी केली.राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत. औरंगाबादची दंगल हे गृहखात्याचे अपयश होय. त्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असे सांगत मुंडे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या खासदारांवर केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे म्हटले. तसेच एका माजी आमदाराच्या प्लॉटकडे जायला रस्ता नाही म्हणून वाटेतील दुकाने या दंगलीत जाळण्यात आली. शहराचे काहीही वाटोळे होवो पण आमचा वैयक्तिक स्वार्थ साधला गेला पाहिजे, या भूमिकेतून औरंगाबादची दंगल पेटवण्यात आली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. किशनचंद तनवाणी असे या माजी आमदाराचे नावही मुंडे यांनी घेतले. दंगल पेटलेली असतानाही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे ते वागले. पोलिसांचा म्हणून एक दबदबा असतो, तो औरंगाबादेत दिसला नाही, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी नोंदवली.येथून पुढे निवडणुकांवर डोळा ठेवून राज्यात दंगली घडवून आणल्या जातील, असे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे म्हणाले होते. ते आता खरे वाटू लागले आहे, अशी टिप्पणी मुंडे यांनी केली.पत्रपरिषदेस आ. सतीश चव्हाण, कदीर मौलाना, कमाल फारुकी, इलियास किरमानी, अभिजित देशमुख, दत्ता भांगे, विनोद बनकर, ख्वाजा शरफोद्दीन आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारDhananjay Mundeधनंजय मुंडे