शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

औरंगाबादेत दंगल घडणार असल्याचा अहवाल कुणी दडपला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:09 IST

औरंगाबादेत दंगल घडणार असा गुप्तचर खात्याने दिलेला लेखी अहवाल कोणत्या अधिकाऱ्याने दडपला, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी येथे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबादेत दंगल घडणार असा गुप्तचर खात्याने दिलेला लेखी अहवाल कोणत्या अधिकाऱ्याने दडपला, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी येथे केली.मुंडे यांनी दुपारी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर ते सुभेदारी गेस्ट हाऊसवर पत्रकारांशी बोलत होते.त्यांनी सांगितले की, माझी पक्की माहिती आहे की, दंगल होणार असल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिका-यांना अडीच महिन्यांपूर्वी अहवाल दिला गेला होता. परंतु वरीष्ठ अधिका-यांनी ही माहिती दडवली. या अहवालाची दखल घेऊन वेळीच कारवाई केली असती, तर कदाचित ही दंगलही टळली असती. गुप्तचर खात्याचा अहवाल दाबणा-या त्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांवर तातडीने कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी जोरदार मागणी मुंडे यांनी केली.राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत. औरंगाबादची दंगल हे गृहखात्याचे अपयश होय. त्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असे सांगत मुंडे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या खासदारांवर केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे म्हटले. तसेच एका माजी आमदाराच्या प्लॉटकडे जायला रस्ता नाही म्हणून वाटेतील दुकाने या दंगलीत जाळण्यात आली. शहराचे काहीही वाटोळे होवो पण आमचा वैयक्तिक स्वार्थ साधला गेला पाहिजे, या भूमिकेतून औरंगाबादची दंगल पेटवण्यात आली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. किशनचंद तनवाणी असे या माजी आमदाराचे नावही मुंडे यांनी घेतले. दंगल पेटलेली असतानाही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे ते वागले. पोलिसांचा म्हणून एक दबदबा असतो, तो औरंगाबादेत दिसला नाही, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी नोंदवली.येथून पुढे निवडणुकांवर डोळा ठेवून राज्यात दंगली घडवून आणल्या जातील, असे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे म्हणाले होते. ते आता खरे वाटू लागले आहे, अशी टिप्पणी मुंडे यांनी केली.पत्रपरिषदेस आ. सतीश चव्हाण, कदीर मौलाना, कमाल फारुकी, इलियास किरमानी, अभिजित देशमुख, दत्ता भांगे, विनोद बनकर, ख्वाजा शरफोद्दीन आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारDhananjay Mundeधनंजय मुंडे