शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धरण उशाला... पण मनपामुळे कोरड पैठणकरांच्या घशाला

By admin | Updated: February 10, 2015 00:33 IST

संजय जाधव , औरंगाबाद पैठण येथील ज्या जलाशयातून औरंगाबादकरांची तहान भागविली जाते त्याच औरंगाबाद मनपाने पैठण तालुक्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

संजय जाधव , औरंगाबादपैठण येथील ज्या जलाशयातून औरंगाबादकरांची तहान भागविली जाते त्याच औरंगाबाद मनपाने पैठण तालुक्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळविले आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीनंतरही मनपा व औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कं.तील पत्र प्रवासाचा गोंधळ मिटत नसल्याने फारोळा व ढोरकीन येथील जलशुद्धीकरण केंद्रातून टँकर भरण्यास पॉइंट देण्यास टाळाटाळ होत आहे. यामुळे पैठण तालुक्यातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. पैठण तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, दिवसागणिक टंचाईची दाहकता वाढत आहे. सध्या ५४ टँकरने ४१ गावांची तहान भागवली जाते. या आठवड्यात आणखी ५० गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. सध्या मुधलवाडी पॉइंटवर फक्त ९६ वेळा टँकर भरले जाते. या पॉइंटवर ३६ गावांना पाणीपुरवठा करणारे ४९ टँकर ९६ वेळेस भरण्याचे नियोजन आहे. येथून थेरगाव, दादेगाव, हार्षी, रांजणगाव दांडगा, पुसेगाव, खेर्डा, पाचलगाव, मुरमा, बालानगर, कुतूबखेडा, ढाकेफळ, वरूडी, कासार पाडळी, कोळीबोडखा, यासिनपूर, नानेगाव, वडजी, ववा, लिंबगाव, नांदर, कडेठाण, पाचोड आदींसह ३६ गावांचे टँकर पाणी भरण्यासाठी येतात. त्यामुळे येथे वेळेवर पाणी मिळत नाही, त्यामुळे नियोजित खेपाही होत नाहीत. मनपाने टँकरसाठी पॉइंट देण्याबाबत पत्र आम्हाला दिले आहे; मात्र किती टँकर भरणार, किती खेपा होणार याची सविस्तर माहिती आम्ही मनपाकडे मागवली आहे. याचे उत्तर आम्हाला अजून मिळाले नाही. त्यामुळे पुढील कार्यवाही रखडली आहे -शिवा नागे, व्यवस्थापक, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी.