शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

धारूरात पाणी पेटले

By admin | Updated: August 5, 2015 00:36 IST

अनिल महाजन , धारूर दिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत असल्याने पाणी जीवन नव्हे संघर्ष बनतोय. याचा प्रत्यय मंगळवारी धारूर तालुक्यात आला.

अनिल महाजन , धारूरदिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत असल्याने पाणी जीवन नव्हे संघर्ष बनतोय. याचा प्रत्यय मंगळवारी धारूर तालुक्यात आला.तालुक्यातील मोरफळी साठवण तलावातून आठ टँकरने आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा केला जात होता. आता अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मोरफळी साठवण तलावाजवळील आसरडोह येथील ग्रामस्थांनी हे पाणी भविष्यात आम्हाला लागेल, असा मुद्दा पुढे करीत होत असलेल्या आठ गावांचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून थांबवला आहे. मोरफळी साठवण तलावाजवळ सध्या आठ टँकर पाण्याच्या मागणीसाठी उभे ओहत.मोरफळी तलावावर पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आता शिगेला पोहचण्याची शक्यता आहे. आसरडोह येथील ग्रामस्थांच्या मतांनुसार येथील पाणीसाठा आरक्षित आहे. भविष्यात आसरडोह गावाकरिता आरक्षित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यामुळे हे पाणी आम्ही इतर गावांना टँकरद्वारे नेऊ देणार नाही, अशी भूमिका आसरडोह येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. टँकर चालक व आसरडोह येथील ग्रामस्थ यांच्यातील संघर्षाची प्रशासनाला कालपर्यंत कसलीच खबरदारी नव्हती. माहिती झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी तलावाला भेट दिली. यामुळे प्रकरण निवळले आहे.या ठिकाणी होत होता पाणीपुरवठायेथील साठवण तलावावरून आठ टँकरद्वारे आसोला आईचा तांडा, चांभारतळ तांडा, अंजनडोह, उमरेवाडी, कोळपिंप्री, खोडस, वाघोली, चिंचपूर या गावांना पाणी पुरवठा केला जातो. तूर्तास तरी संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरू आहे.गटविकास अधिकारी कांबळे यांनी मोरफळी साठवण तलावावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली व आसरडोह येथील ग्रामस्थांना भेटून त्यांची समजूत घातल्याने तूर्तास तरी हा प्रश्न मिटला असून, सध्या टँकर पूर्ववत झाले आहेत.४धारूर तालुक्याप्रमाणेच इतर तालुक्यांमध्येही भविष्यात पाणी प्रश्न पेटू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाला आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाला विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.