शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

धारूरात पाणी पेटले

By admin | Updated: August 5, 2015 00:36 IST

अनिल महाजन , धारूर दिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत असल्याने पाणी जीवन नव्हे संघर्ष बनतोय. याचा प्रत्यय मंगळवारी धारूर तालुक्यात आला.

अनिल महाजन , धारूरदिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत असल्याने पाणी जीवन नव्हे संघर्ष बनतोय. याचा प्रत्यय मंगळवारी धारूर तालुक्यात आला.तालुक्यातील मोरफळी साठवण तलावातून आठ टँकरने आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा केला जात होता. आता अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मोरफळी साठवण तलावाजवळील आसरडोह येथील ग्रामस्थांनी हे पाणी भविष्यात आम्हाला लागेल, असा मुद्दा पुढे करीत होत असलेल्या आठ गावांचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून थांबवला आहे. मोरफळी साठवण तलावाजवळ सध्या आठ टँकर पाण्याच्या मागणीसाठी उभे ओहत.मोरफळी तलावावर पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आता शिगेला पोहचण्याची शक्यता आहे. आसरडोह येथील ग्रामस्थांच्या मतांनुसार येथील पाणीसाठा आरक्षित आहे. भविष्यात आसरडोह गावाकरिता आरक्षित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यामुळे हे पाणी आम्ही इतर गावांना टँकरद्वारे नेऊ देणार नाही, अशी भूमिका आसरडोह येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. टँकर चालक व आसरडोह येथील ग्रामस्थ यांच्यातील संघर्षाची प्रशासनाला कालपर्यंत कसलीच खबरदारी नव्हती. माहिती झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी तलावाला भेट दिली. यामुळे प्रकरण निवळले आहे.या ठिकाणी होत होता पाणीपुरवठायेथील साठवण तलावावरून आठ टँकरद्वारे आसोला आईचा तांडा, चांभारतळ तांडा, अंजनडोह, उमरेवाडी, कोळपिंप्री, खोडस, वाघोली, चिंचपूर या गावांना पाणी पुरवठा केला जातो. तूर्तास तरी संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरू आहे.गटविकास अधिकारी कांबळे यांनी मोरफळी साठवण तलावावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली व आसरडोह येथील ग्रामस्थांना भेटून त्यांची समजूत घातल्याने तूर्तास तरी हा प्रश्न मिटला असून, सध्या टँकर पूर्ववत झाले आहेत.४धारूर तालुक्याप्रमाणेच इतर तालुक्यांमध्येही भविष्यात पाणी प्रश्न पेटू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाला आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाला विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.