शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेत ‘गळ खेळून’ भक्तांनी फेडले नवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:29 IST

जिल्हा प्रशासनाने मांगीरबाबा यात्रेत केलेल्या गळटोचणी बंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. पोलिसांच्या आदेशानुसार देवस्थान समितीने गळ पुरविण्यास असमर्थता दाखविताच भक्त व मंदिर विश्वस्तांमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता कडाक्याचे भांडण झाले. यावेळी तेथे पोलीस व प्रशासनाचे कुणीच अधिकारी नसल्याने देवस्थान समितीने माघार घेऊन भक्तांना गळ पुरविले. भक्तांनी ‘गळ खेळून’ नवस फेडले. त्यानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांसमोर गळटोचणीचा सिलसिला दिवसभर निर्वेध सुरू होता.

ठळक मुद्देशेंद्रा कमंगर : संतप्त भाविकांसमोर मंदिर विश्वस्तांची सपशेल माघार; पोलीस व प्रशासनातील अधिकारी गैरहजर

श्रीकांत पोफळे ।लोकमत न्यूज नेटवर्कशेंद्रा : जिल्हा प्रशासनाने मांगीरबाबा यात्रेत केलेल्या गळटोचणी बंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. पोलिसांच्या आदेशानुसार देवस्थान समितीने गळ पुरविण्यास असमर्थता दाखविताच भक्त व मंदिर विश्वस्तांमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता कडाक्याचे भांडण झाले. यावेळी तेथे पोलीस व प्रशासनाचे कुणीच अधिकारी नसल्याने देवस्थान समितीने माघार घेऊन भक्तांना गळ पुरविले. भक्तांनी ‘गळ खेळून’ नवस फेडले. त्यानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांसमोर गळटोचणीचा सिलसिला दिवसभर निर्वेध सुरू होता.शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेस बुधवारी प्रारंभ झाला. प्रशासनाच्या बंदीनंतरही यंदाही यात्रेच्या चित्रात व स्वरूपात काहीही बदल नव्हता. हातात बकरू व काखेत लेकरू घेऊन गळ टोचून नवस फेडणाºया भाविकांची यात्रेत रांग लागलीहोती.

हळद व मळवट भरून नवरदेवाचे रूप घेऊन नवस फेडणाºया व्यक्ती व महिला ‘मांगीरबाबा की जय’ असा जयघोष करीत गळ टोचून घेत होत्या. भाविक तेथून किमान दोनशे फूट धावत जाऊन मंदिरासमोर नतमस्तक होत होते. रेवड्यांची उधळण करीत बाबांच्या जयघोषाने मंदिर परिसरात भाविकांत उत्साह संचारलाहोता.उन्हाचा पारा आग ओकू लागल्याने जालना रोडपासून ते मंदिरापर्यंत ग्रामस्थ पाणी पाऊच वाटत होते. त्यामुळे भाविकांना पाणीटंचाई जाणवत नव्हती. मंदिराच्या शेजारी देवस्थान समितीचे कार्यालय असून, समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे, सचिव सुरेश नाईकवाडे, वैजिनाथ मुळे, साळुबा कचकुरे, कडुबा कुटे, किशोर शेजूळ भाविकांना मार्गदर्शन करीत होते. यात्रेत नियोजनासाठी समितीच्या वतीने ५० स्वयंसेवक नियुक्त केले आहेत.मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. कोठेही अनुचित प्रकार होऊ नये त्यासाठी सरपंच शुभांगी तांबे, उपसरपंच पांडुरंग कचकुरे परिश्रम घेत होते. मंदिर परिसरात रोडवर मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पहाटेपासूनच गर्दी, कोंबड्या-बकºयांचा बळीपहाटेपासूनच नवस फेडणारे भाविक अनवाणी पायाने मंदिराकडे जात होते. भाविक महिला व पुरुष डफाच्या तालावर वाजतगाजत कापडाचा मांडव डोक्यावर धरून पूजेचे साहित्य घेऊन जात होते.काही भक्त तर लोटांगण घालत मंदिराकडे दर्शनाला जात होते. मारुती मंदिरासमोर कंबरेला गळ टोचल्यानंतर साधारण दोनशे फूट पळत जाऊन गळ काढल्यानंतर मांगीरबाबाचरणी नतमस्तक होऊन कंदुरीकडे जात होते.यात्रेत जनजागृतीमुळे गळाचे प्रमाण निम्म्याने घटले असून, पहिल्या दिवशी १,३०० बोकड आणि ४४२ कोंबड्यांचा बळी देण्यात आला.१,३०० बोकड आणि ४४२ कोंबड्यांचा बळी.जनजागृतीमुळे गळ निम्म्याने घटल्याचे देवस्थान व ग्रामपंचायतीचा दावा.गळ टोचायला विरोध करताना भाविक व देवस्थान समितीत वाद. ग्रामस्थांच्या मागणीमुळे व त्यांच्या सुरक्षेसाठी समितीची माघार.गळ टोचणीच्या ठिकाणी त्यावेळी पोलीस किंवा प्रशासनाचा एकही कर्मचारी, अधिकाºयाची उपस्थिती नव्हती.यावर्षी चतुर्थी दोन दिवस असल्यामुळे येणारा समाज दोन दिवसांत विभागला गेला. त्यामुळे बुधवारी भाविकांची संख्या कमी असल्याचे समितीने कळविले.

टॅग्स :communityसमाजAurangabadऔरंगाबाद