शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

यात्रेत ‘गळ खेळून’ भक्तांनी फेडले नवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:29 IST

जिल्हा प्रशासनाने मांगीरबाबा यात्रेत केलेल्या गळटोचणी बंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. पोलिसांच्या आदेशानुसार देवस्थान समितीने गळ पुरविण्यास असमर्थता दाखविताच भक्त व मंदिर विश्वस्तांमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता कडाक्याचे भांडण झाले. यावेळी तेथे पोलीस व प्रशासनाचे कुणीच अधिकारी नसल्याने देवस्थान समितीने माघार घेऊन भक्तांना गळ पुरविले. भक्तांनी ‘गळ खेळून’ नवस फेडले. त्यानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांसमोर गळटोचणीचा सिलसिला दिवसभर निर्वेध सुरू होता.

ठळक मुद्देशेंद्रा कमंगर : संतप्त भाविकांसमोर मंदिर विश्वस्तांची सपशेल माघार; पोलीस व प्रशासनातील अधिकारी गैरहजर

श्रीकांत पोफळे ।लोकमत न्यूज नेटवर्कशेंद्रा : जिल्हा प्रशासनाने मांगीरबाबा यात्रेत केलेल्या गळटोचणी बंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. पोलिसांच्या आदेशानुसार देवस्थान समितीने गळ पुरविण्यास असमर्थता दाखविताच भक्त व मंदिर विश्वस्तांमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता कडाक्याचे भांडण झाले. यावेळी तेथे पोलीस व प्रशासनाचे कुणीच अधिकारी नसल्याने देवस्थान समितीने माघार घेऊन भक्तांना गळ पुरविले. भक्तांनी ‘गळ खेळून’ नवस फेडले. त्यानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांसमोर गळटोचणीचा सिलसिला दिवसभर निर्वेध सुरू होता.शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेस बुधवारी प्रारंभ झाला. प्रशासनाच्या बंदीनंतरही यंदाही यात्रेच्या चित्रात व स्वरूपात काहीही बदल नव्हता. हातात बकरू व काखेत लेकरू घेऊन गळ टोचून नवस फेडणाºया भाविकांची यात्रेत रांग लागलीहोती.

हळद व मळवट भरून नवरदेवाचे रूप घेऊन नवस फेडणाºया व्यक्ती व महिला ‘मांगीरबाबा की जय’ असा जयघोष करीत गळ टोचून घेत होत्या. भाविक तेथून किमान दोनशे फूट धावत जाऊन मंदिरासमोर नतमस्तक होत होते. रेवड्यांची उधळण करीत बाबांच्या जयघोषाने मंदिर परिसरात भाविकांत उत्साह संचारलाहोता.उन्हाचा पारा आग ओकू लागल्याने जालना रोडपासून ते मंदिरापर्यंत ग्रामस्थ पाणी पाऊच वाटत होते. त्यामुळे भाविकांना पाणीटंचाई जाणवत नव्हती. मंदिराच्या शेजारी देवस्थान समितीचे कार्यालय असून, समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे, सचिव सुरेश नाईकवाडे, वैजिनाथ मुळे, साळुबा कचकुरे, कडुबा कुटे, किशोर शेजूळ भाविकांना मार्गदर्शन करीत होते. यात्रेत नियोजनासाठी समितीच्या वतीने ५० स्वयंसेवक नियुक्त केले आहेत.मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. कोठेही अनुचित प्रकार होऊ नये त्यासाठी सरपंच शुभांगी तांबे, उपसरपंच पांडुरंग कचकुरे परिश्रम घेत होते. मंदिर परिसरात रोडवर मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पहाटेपासूनच गर्दी, कोंबड्या-बकºयांचा बळीपहाटेपासूनच नवस फेडणारे भाविक अनवाणी पायाने मंदिराकडे जात होते. भाविक महिला व पुरुष डफाच्या तालावर वाजतगाजत कापडाचा मांडव डोक्यावर धरून पूजेचे साहित्य घेऊन जात होते.काही भक्त तर लोटांगण घालत मंदिराकडे दर्शनाला जात होते. मारुती मंदिरासमोर कंबरेला गळ टोचल्यानंतर साधारण दोनशे फूट पळत जाऊन गळ काढल्यानंतर मांगीरबाबाचरणी नतमस्तक होऊन कंदुरीकडे जात होते.यात्रेत जनजागृतीमुळे गळाचे प्रमाण निम्म्याने घटले असून, पहिल्या दिवशी १,३०० बोकड आणि ४४२ कोंबड्यांचा बळी देण्यात आला.१,३०० बोकड आणि ४४२ कोंबड्यांचा बळी.जनजागृतीमुळे गळ निम्म्याने घटल्याचे देवस्थान व ग्रामपंचायतीचा दावा.गळ टोचायला विरोध करताना भाविक व देवस्थान समितीत वाद. ग्रामस्थांच्या मागणीमुळे व त्यांच्या सुरक्षेसाठी समितीची माघार.गळ टोचणीच्या ठिकाणी त्यावेळी पोलीस किंवा प्रशासनाचा एकही कर्मचारी, अधिकाºयाची उपस्थिती नव्हती.यावर्षी चतुर्थी दोन दिवस असल्यामुळे येणारा समाज दोन दिवसांत विभागला गेला. त्यामुळे बुधवारी भाविकांची संख्या कमी असल्याचे समितीने कळविले.

टॅग्स :communityसमाजAurangabadऔरंगाबाद