शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

राजपूत समाजातील 'भामटा' शब्द काढणार, फडणवीसांचा निर्धार; CM शिंदेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 09:57 IST

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत ते बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर/मुंबई - सरकारी मदतीचे पंख राजपूत समजाला लावले जातील. राजपूत समाजाच्या पुढील भामटा हा शब्द काढून टाकला पाहिजे आणि सरकार हे मान्य करुन भामटा हा शब्द काढत आहे, आता त्यासाठी लागेल ते केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात बोलताना राजपूत समाजाला दिले. तत्पूर्वी भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजपूत हा लढवय्या आणि क्षत्रीय समाज असल्याचं सांगितलं. या समाजाच्या पुढे भामटा हा शब्द लावणे योग्य नाही. समाजाला भामटा म्हणणे हीच भामटेगिरी असल्याचंही ते म्हणाले.  

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन केले जाईल. तसेच महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असून, अनावरणासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना बोलविले जाईल. पहिले सरकार कोमात होते, मात्र, आपल्या सरकारची कामे जोमात सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले, मेहनती व धाडसी समाजामागे भामटा हा शब्द राहणार नाही, यासाठी केंद्र शासनाकडेदेखील पाठपुरावा केला जाईल.

रेल्वे स्टेशन रोडवरील अयोध्यानगरी येथे झालेल्या या संमेलनाप्रसंगी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. 

१५ दिवसांत बैठक

सकल राजपूत समाजाच्या मागण्यांसाठी केली. येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह संमेलनात जाहीर केले. ते म्हणाले, देशाच्या इतिहासात क्षत्रिय समाजाचे योगदान कुणीही विसरू शकणार नाही. स्वातंत्र्यानंतर समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. समाजासमोर लागलेला भामटा हा शब्द बदलायला हवा. कुठल्याही राजपुताच्या पुढे भामटा हा शब्द लागणार नाही, यासाठी पाठपुरावा केला जाईल. लढवय्या समाजापुढे भामटा शब्द लावणे योग्य नाही. तर, समाजाला भामटा म्हणणे हीच मोठी भामटेगिरी आहे, असे म्हणत आपण भामटा शब्द काढण्याचा निर्धार केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेRajnath Singhराजनाथ सिंह