शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजपूत समाजातील 'भामटा' शब्द काढणार, फडणवीसांचा निर्धार; CM शिंदेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 09:57 IST

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत ते बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर/मुंबई - सरकारी मदतीचे पंख राजपूत समजाला लावले जातील. राजपूत समाजाच्या पुढील भामटा हा शब्द काढून टाकला पाहिजे आणि सरकार हे मान्य करुन भामटा हा शब्द काढत आहे, आता त्यासाठी लागेल ते केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात बोलताना राजपूत समाजाला दिले. तत्पूर्वी भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजपूत हा लढवय्या आणि क्षत्रीय समाज असल्याचं सांगितलं. या समाजाच्या पुढे भामटा हा शब्द लावणे योग्य नाही. समाजाला भामटा म्हणणे हीच भामटेगिरी असल्याचंही ते म्हणाले.  

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन केले जाईल. तसेच महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असून, अनावरणासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना बोलविले जाईल. पहिले सरकार कोमात होते, मात्र, आपल्या सरकारची कामे जोमात सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले, मेहनती व धाडसी समाजामागे भामटा हा शब्द राहणार नाही, यासाठी केंद्र शासनाकडेदेखील पाठपुरावा केला जाईल.

रेल्वे स्टेशन रोडवरील अयोध्यानगरी येथे झालेल्या या संमेलनाप्रसंगी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. 

१५ दिवसांत बैठक

सकल राजपूत समाजाच्या मागण्यांसाठी केली. येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह संमेलनात जाहीर केले. ते म्हणाले, देशाच्या इतिहासात क्षत्रिय समाजाचे योगदान कुणीही विसरू शकणार नाही. स्वातंत्र्यानंतर समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. समाजासमोर लागलेला भामटा हा शब्द बदलायला हवा. कुठल्याही राजपुताच्या पुढे भामटा हा शब्द लागणार नाही, यासाठी पाठपुरावा केला जाईल. लढवय्या समाजापुढे भामटा शब्द लावणे योग्य नाही. तर, समाजाला भामटा म्हणणे हीच मोठी भामटेगिरी आहे, असे म्हणत आपण भामटा शब्द काढण्याचा निर्धार केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेRajnath Singhराजनाथ सिंह