शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राजपूत समाजातील 'भामटा' शब्द काढणार, फडणवीसांचा निर्धार; CM शिंदेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 09:57 IST

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत ते बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर/मुंबई - सरकारी मदतीचे पंख राजपूत समजाला लावले जातील. राजपूत समाजाच्या पुढील भामटा हा शब्द काढून टाकला पाहिजे आणि सरकार हे मान्य करुन भामटा हा शब्द काढत आहे, आता त्यासाठी लागेल ते केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात बोलताना राजपूत समाजाला दिले. तत्पूर्वी भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजपूत हा लढवय्या आणि क्षत्रीय समाज असल्याचं सांगितलं. या समाजाच्या पुढे भामटा हा शब्द लावणे योग्य नाही. समाजाला भामटा म्हणणे हीच भामटेगिरी असल्याचंही ते म्हणाले.  

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन केले जाईल. तसेच महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असून, अनावरणासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना बोलविले जाईल. पहिले सरकार कोमात होते, मात्र, आपल्या सरकारची कामे जोमात सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले, मेहनती व धाडसी समाजामागे भामटा हा शब्द राहणार नाही, यासाठी केंद्र शासनाकडेदेखील पाठपुरावा केला जाईल.

रेल्वे स्टेशन रोडवरील अयोध्यानगरी येथे झालेल्या या संमेलनाप्रसंगी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. 

१५ दिवसांत बैठक

सकल राजपूत समाजाच्या मागण्यांसाठी केली. येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह संमेलनात जाहीर केले. ते म्हणाले, देशाच्या इतिहासात क्षत्रिय समाजाचे योगदान कुणीही विसरू शकणार नाही. स्वातंत्र्यानंतर समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. समाजासमोर लागलेला भामटा हा शब्द बदलायला हवा. कुठल्याही राजपुताच्या पुढे भामटा हा शब्द लागणार नाही, यासाठी पाठपुरावा केला जाईल. लढवय्या समाजापुढे भामटा शब्द लावणे योग्य नाही. तर, समाजाला भामटा म्हणणे हीच मोठी भामटेगिरी आहे, असे म्हणत आपण भामटा शब्द काढण्याचा निर्धार केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेRajnath Singhराजनाथ सिंह