शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

विकासाचे शेंद्रा‘बन’

By admin | Updated: April 6, 2016 01:28 IST

औरंगाबाद : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीलगतच्या शेंद्रा बन आणि गंगापूर जहांगीर या गावचे रहिवासी आता विकासाची मधुर फळे चाखत आहेत.

औरंगाबाद : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीलगतच्या शेंद्रा बन आणि गंगापूर जहांगीर या गावचे रहिवासी आता विकासाची मधुर फळे चाखत आहेत. अपार्टमेंट व रो-हाऊसची शेकडो बांधकामे जणू येथे वास्तव्यास येण्याची शहरवासीयांना सादच घालत आहेत.कार्डद्वारे मिळणारे शुद्ध पाणी, गरोदर महिलांसाठी माहेरघर, तरुणांसाठी व्हॉलीबॉलचे मैदान, प्रत्येक घरावर टाकण्यात आलेली घरमालक आणि मालकिणीची नावे, गावाच्या संरक्षणासाठी लाभलेले ‘सीसीटीव्ही’चे कवच, सर्व ग्रामस्थांना घरपोेच देण्यात आलेली विविध प्रमाणपत्रे, भूमिगत ड्रेनेजलाईन, सौर ऊर्जेवर प्रकाशमान होणारे पथदिवे, कचऱ्यातून केली जाणारी खतनिर्मिती, शाळेत उपलब्ध असणारी ई-लर्निंगची सुविधा ही या गावाची वैशिष्ट्य म्हणावी लागतील.शेंद्रा औद्योगिक वसाहतीत स्कोडा कंपनीच्या पाठीमागे शेंद्रा बन हे गाव आहे. शेंद्रा बन आणि लगतचे गंगापूर जहांगीर, अशी मिळून गट ग्रामपंचायत आहे. दोन्ही गावांची लोकसंख्या सुमारे २,४०० च्या घरात आहे. शेंद्रा बन येथील ७० टक्के जमिनी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद शहरातीले काही बिल्डरांनी आपला मोर्चा आता या परिसरात वळविला आहे. सद्य:स्थितीत येथे शेकडो फ्लॅट, रो-हाऊस बांधून तयार असून, भविष्यात हा परिसर एखाद्या टुमदार शहरातच रूपांतरित होणार असल्याचे चित्र आहे. औद्योगिक वसाहतीतील कारखाने, नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारती यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा खात्रीचा मार्ग सापडला आहे. असा झाला कायापालटतीन वर्षांपूर्वी शेंद्रा बन हे गाव सामान्य खेड्याप्रमाणे होते. उघड्यावर शौचास जाणारे ग्रामस्थ, गावातून वाहणाऱ्या गटारी, सततची पाणी टंचाई, असे गावचे चित्र होते; परंतु एकेदिवशी ग्रामस्थांनी पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजार या गावास भेट दिली. त्याचवेळी शेजारचे कुंभेफळ हे विकास कामांमुळे प्रकाशझोतात आले होते. आता आपल्यालाही त्याच दिशेने मार्गक्रमण करायचे, असा संकल्प ग्रामस्थांनी केला. परिणामी, आज गावाचा कायापालट झालेला दिसत आहे. ‘सीसीटीव्ही’चे कवचगावातील मुख्य रस्ते, गल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर २३ ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संपूर्ण गावावर अशा प्रकारे तिसऱ्या डोळ्याचा ‘वॉच’ असल्याने किरकोळ वाद मिटले आहेत. भांडणे केल्यास आपण कॅमेऱ्यात कैद होऊत या भीतीने प्रत्येक जण सामंजस्याने वागण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. भूमिगत ड्रेनेजलाईनभूमिगत ड्रेनेजलाईनमुळे या छोट्याशा गावात कुठेही रस्त्यावर सांडपाणी वाहताना दिसत नाही. सुमारे २० लाख रुपये खर्चून ड्रेनेजलाईन टाकण्यात आली आहे. त्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल.गावातील विजेच्या खांबांवर सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे बसविण्यात आली आहेत. त्यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. आगामी काळात सौर ऊर्जेचे आणखी प्रकल्प राबविण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे.अशी झाली प्रमाणपत्रमुक्ती महसूल खात्यात मंडळ अधिकारी असणारे सतीश तुपे हे या गावचे रहिवासी. विविध प्रमाणपत्रांसाठी ग्रामस्थांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी तुपे यांनी पुढाकार घेतला. विशेष मोहीम राबवून विद्यार्थी, ग्रामस्थांना घरपोच प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अशा प्रकारे प्रमाणपत्रांसाठी औरंगाबादला येण्याच्या कटकटीतून ग्रामस्थांची कायम सुटका झाली आहे.गावचे कारभारी सरपंच- संजय पाटुळे, उपसरपंच- भाऊलाल तरटे, ग्रामसेवक- विलास कचकुरे, सदस्य- कल्याण तुपे, रंजनाबाई तुपे, कांताबाई भुसारे, सरला काळे, सोनाबाई सुलाने.