शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:45 IST

मागील दीड वर्षांपासून हिंगोली बसस्थानकाचा कायापालट होण्याची स्वप्ने दाखविली जात आहे. तसा विकास आराखडा तयार करण्यात आल्याचे विभागीय कार्यालय परभणी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापही याबाबत हालचाली होताना दिसून येत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दीड वर्षांपासून हिंगोली बसस्थानकाचा कायापालट होण्याची स्वप्ने दाखविली जात आहे. तसा विकास आराखडा तयार करण्यात आल्याचे विभागीय कार्यालय परभणी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापही याबाबत हालचाली होताना दिसून येत नाहीत. विकासासाठी प्रथम दोन कोटींची नंतर साडेचार कोटींची तजविज केली होती. मात्र अजून प्रत्यक्ष कामाचा काही पत्ताच नसल्याचे चित्र आहे.मागील अनेक वर्षांपासून हिंगोली बसस्थानकात आवश्यक सुविधा नाहीत. शिवाय बसस्थानकाचा विकासच न झाल्याने कर्मचाºयांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होते. हिंगोली बसस्थानकाच्या विकासासाठी प्रथम दोन कोटी खर्च करण्यात येणार होते. परंतु ते अपुरे पडत असल्याने कंत्राटच घेण्यास कोणी तयार नव्हते. त्यामुळे विकास आराखड्याची रक्कम चार ते साडेचार कोटी करण्यात आल्याची माहिती विभागीय कार्यालयाकडून दिली जात आहे. वेळोवेळी ई-निविदा तयार करूनही विकास आराखड्याच्या कामांसाठी जागेचे केवळ मोजमाप घेतले जात आहे. दीड वर्ष लोटून गेले अद्याप कुठल्याच कामाला सुरूवात करण्यात आलेली नाही. आता तर जीएसटीमुळे कंत्राटदाराच निविदेकडे पाठ करून बसले आहेत. आगारात एकूण ५६ बसेस असून जवळपास ३०० च्यावर कर्मचारी आहेत. बसस्थानक जिल्ह्याच्या ठिकाणी असून येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. सुविधा उपलब्ध नसल्याने मात्र प्रवाशांची गैरसोय होते. विशेष म्हणजे स्थानकात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. उन्हाळ्यात प्रवाशांची दैना होते.