शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पाणी बचतीचा निर्धार

By admin | Updated: May 8, 2016 01:06 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र आणि देशातील बहुतांश भागांमध्ये जलसंकट ओढावले आहे. या बिकट परिस्थितीत पाण्याची बचत आणि त्याच्या पुनर्वापरासाठी ‘लोकमत’ने राज्यभर जलमित्र अभियान हाती घेतले आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्र आणि देशातील बहुतांश भागांमध्ये जलसंकट ओढावले आहे. या बिकट परिस्थितीत पाण्याची बचत आणि त्याच्या पुनर्वापरासाठी ‘लोकमत’ने राज्यभर जलमित्र अभियान हाती घेतले आहे. या अभियानात शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर्स, प्लंबिंग असोसिएशन यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची तयारी दर्शवून पाणी बचतीचा निर्धार केला. सध्याच्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी जनजागरण व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या अभियानानिमित्त शनिवारी ‘लोकमत भवन’ मध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, उपाध्यक्ष हरिसिंग, कोषाध्यक्ष शिवशंकर स्वामी, औरंगाबाद हॉटेल, रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील, अविनाश अवरगावकर, प्लंबिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंग फरकाडे, अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात, सचिव बाळासाहेब भोसले, कोषाध्यक्ष वजीद सिराज, कार्याध्यक्ष चंद्रशेखर कुबेर, संतोष कुमावत, बबन खरात, लायन्स क्लब आॅफ औरंगाबादचे बोर्ड आॅफ डायरेक्टर अब्दुल हकीम, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनुपम टाकळकर, ‘लोकमत’चे संपादक सुधीर महाजन, ‘लोकमत समाचार’चे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोले, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप विष्णोई यांची उपस्थिती होती. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अजय शहा म्हणाले, पाणीटंचाईच्या परिस्थितीमुळे आज जलमित्र बनविणे ही खरी गरज आहे. शहरासह ग्रामीण भागात वॉटर हार्वेस्टिंग करण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापारी महासंघ पुढाकार घेत असल्याचे सांगितले. डॉ. अनुपम टाकळकर म्हणाले, रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज आहे. त्यामुळे अभियानात इंडियन मेडिकल असोसिएशन प्राधान्याने सहभागी होईल, असे त्यांनी सांगितले. श्रीरंग फरकाडे म्हणाले, शहरातील रस्त्यावरील, उतारावरील पाणी वाहून जाते. वाहून जाणारे पाणी मोकळ्या जागांच्या माध्यमातून जमिनीत मुरविले पाहिजे, असे ते म्हणाले. हॉटेल असोसिएशनही ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहे. उपस्थित मान्यवरांनी उत्साहाने अभियानात सहभागी होणार असल्याचे सांगून ‘लोकमत’चा हा उपक्रम कौतुकास्पद आणि स्वागतार्ह असल्याचे सांगितले. औरंगाबाद हॉटेल, रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले, हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना ग्लास भरून पाणी दिले जाते. त्यातून अनेकदा पाणी वाया जाते. त्यामुळे अर्धा ग्लास पाणी देण्यास प्राधान्य दिले पाहिजे, याची सुरुवातदेखील करण्यात आली आहे. हॉटेल असोसिएशन या अभियानात सहभागी होणार आहे. प्रारंभी ‘लोकमत’चे संपादक सुधीर महाजन यांनी जलमित्र अभियानाविषयी माहिती दिली. पैसे खर्च करताना ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते, त्याचप्रमाणे पाण्याचीही बचत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी विविध टप्प्यांमध्ये होणाऱ्या या अभियानात सोशल मीडियातून जनजागृती, पोस्टर्स स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलमित्रांकडून जनजागृती आदींविषयी त्यांनी माहिती दिली.