शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

मिठाईचे दुकान आगीत खाक

By admin | Updated: June 12, 2016 00:03 IST

औरंगाबाद : जयभवानीनगर ते पुंडलिकनगर रोडवरील गोकुळ वृंदावन या मिठाईच्या दुकानाला शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

औरंगाबाद : जयभवानीनगर ते पुंडलिकनगर रोडवरील गोकुळ वृंदावन या मिठाईच्या दुकानाला शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत हे संपूर्ण दुकान आणि मिठाई बनविण्याचा कारखाना जळून खाक झाला. या घटनेत अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.प्राप्त माहिती अशी की, सिडको एन-३ मधील जयभवानीनगर ते पुंडलिकनगर रोडवर गोकुळ वृंदावन हे मिठाईचे दुकान आहे. दुकानमालक राजेश जैस्वाल हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. शनिवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दुकानात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. त्यामुळे चार शटर असलेल्या या कॉर्नरच्या दुकानामधून धुराचे लोट निघू लागले. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती दुकान मालक आणि अग्निशामक दलास दिली. दुकानमालक येईपर्यंत आगीने संपूर्ण दुकान कवेत घेतले. दुकानातील लाकडी फर्निचर, सिलिंग, फ्रीज, टी. व्ही., सीसीटीव्ही कॅमेरे, तयार केलेला फरसान, मिठाईसह कच्चामाल, इलेक्ट्रिक वायरिंग आदींनी पेट घेतला. आगीच्या ज्वालामुळे दुकानाचे शटरही प्रचंड तप्त झाले होते. असे असताना दुकानमालकासह कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी या दुकानाचे चारीही शटर उघडून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यानंतर काही मिनिटातच अग्निशामक दलाचे जवान तेथे दाखल झाले. त्यांनी पंधरा ते वीस मिनिटांत ही आग विझविली.या घटनेत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे एस. के. भगत, सोमनाथ भोसले, वैभव बागडे, अशोक वेलदोडे आणि चालक अशोक वाघ यांनी प्रयत्न केले.