शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

विद्यापीठांमधील पदनाम घोटाळा : अनियमितता करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे शासनाने आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 19:12 IST

वित्त विभागाने काढलेल्या शासन निर्णयात अनियमितता करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.

ठळक मुद्देपदनामे व वेतनश्रेणी कटाक्षाने पूर्ववत करा

औरंगाबाद : राज्यातील सहा विद्यापीठांमध्ये शेकडो कर्मचाऱ्यांना अनियमितपणे पदनाम बदलून वेतनश्रेण्या बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात बक्षी समितीने सातव्या वेतन आयोगाच्या अहवालात केलेल्या शिफारशी वित्त विभागाने मान्य केल्या आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वित्त विभागाने काढलेल्या शासन निर्णयात अनियमितता करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.

राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगासाठी राज्य वेतन सुधारणा समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी शासनाला सादर केलेल्या अहवालात विद्यापीठांमध्ये पदनाम बदलून शेकडो कर्मचाऱ्यांना ७ आॅक्टोबर २००९ च्या अधिसूचनेपेक्षा अधिकची वेतनश्रेणी उच्च शिक्षण विभागाने मंजूर केली आहे. या बदललेल्या वेतनश्रेण्यांना वित्त विभागाची मंजुरी मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले होते.

यानुसार पदनाम, वेतनश्रेण्या पूर्ववत करून अतिप्रदान वसुली कटाक्षाने करण्याची शिफारस केली. हा अहवाल शासनाने स्वीकारल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने  तातडीने कार्यवाही करीत सहा विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांच्या बदललेल्या वेतनश्रेण्यासंबंधी आठ शासन निर्णय रद्द करणारा शासन निर्णय १७ डिसेंबर २०१८ रोजी निर्गमित केला. यानंतर राज्य मंत्रिमंडळाने बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकारत सातवा वेतन आयोग १ जानेवारीपासून देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली.वित्त विभागाने १ जानेवारी रोजी शासन निर्णय काढत बक्षी समितीच्या स्वीकारलेल्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू केली आहे. यानुसार विद्यापीठांमधील पदनाम बदलाच्या अनियमिततेला जबाबदार असणाऱ्या उच्च शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्वरित शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा शासनादेश मंगळवारी काढला आहे.

बक्षी समितीची दिशाभूल केलीविद्यापीठीय संघटनांनी सादर केलेले वेतन त्रुटीचे प्रस्ताव हे दिनांक ७ आॅक्टोबर २००९ च्या अधिसूचनेतील पदानुसार असून, पाच विद्यापीठांच्या बदललेल्या पदनामाप्रमाणे नाही. त्यामुळे अनेक वेतन पदाची त्रुटी आजही कायम आहे. ती दूर करण्याची गरज असताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पदनाम बदललेल्या विद्यापीठांच्या पदांचे संदर्भ देऊन बक्षी समितीची दिशाभूल केली आहे. त्यामुळे समितीच्या अहवालात संपूर्ण चुकीची व विसंगत माहिती नमूद झाली आहे. याबाबत बक्षी समितीला वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्याचे ठरविले आहे. - रमेश शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ

टॅग्स :fraudधोकेबाजीuniversityविद्यापीठState Governmentराज्य सरकार