शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

विद्यापीठांमधील पदनाम घोटाळा : अनियमितता करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे शासनाने आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 19:12 IST

वित्त विभागाने काढलेल्या शासन निर्णयात अनियमितता करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.

ठळक मुद्देपदनामे व वेतनश्रेणी कटाक्षाने पूर्ववत करा

औरंगाबाद : राज्यातील सहा विद्यापीठांमध्ये शेकडो कर्मचाऱ्यांना अनियमितपणे पदनाम बदलून वेतनश्रेण्या बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात बक्षी समितीने सातव्या वेतन आयोगाच्या अहवालात केलेल्या शिफारशी वित्त विभागाने मान्य केल्या आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वित्त विभागाने काढलेल्या शासन निर्णयात अनियमितता करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.

राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगासाठी राज्य वेतन सुधारणा समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी शासनाला सादर केलेल्या अहवालात विद्यापीठांमध्ये पदनाम बदलून शेकडो कर्मचाऱ्यांना ७ आॅक्टोबर २००९ च्या अधिसूचनेपेक्षा अधिकची वेतनश्रेणी उच्च शिक्षण विभागाने मंजूर केली आहे. या बदललेल्या वेतनश्रेण्यांना वित्त विभागाची मंजुरी मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले होते.

यानुसार पदनाम, वेतनश्रेण्या पूर्ववत करून अतिप्रदान वसुली कटाक्षाने करण्याची शिफारस केली. हा अहवाल शासनाने स्वीकारल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने  तातडीने कार्यवाही करीत सहा विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांच्या बदललेल्या वेतनश्रेण्यासंबंधी आठ शासन निर्णय रद्द करणारा शासन निर्णय १७ डिसेंबर २०१८ रोजी निर्गमित केला. यानंतर राज्य मंत्रिमंडळाने बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकारत सातवा वेतन आयोग १ जानेवारीपासून देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली.वित्त विभागाने १ जानेवारी रोजी शासन निर्णय काढत बक्षी समितीच्या स्वीकारलेल्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू केली आहे. यानुसार विद्यापीठांमधील पदनाम बदलाच्या अनियमिततेला जबाबदार असणाऱ्या उच्च शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्वरित शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा शासनादेश मंगळवारी काढला आहे.

बक्षी समितीची दिशाभूल केलीविद्यापीठीय संघटनांनी सादर केलेले वेतन त्रुटीचे प्रस्ताव हे दिनांक ७ आॅक्टोबर २००९ च्या अधिसूचनेतील पदानुसार असून, पाच विद्यापीठांच्या बदललेल्या पदनामाप्रमाणे नाही. त्यामुळे अनेक वेतन पदाची त्रुटी आजही कायम आहे. ती दूर करण्याची गरज असताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पदनाम बदललेल्या विद्यापीठांच्या पदांचे संदर्भ देऊन बक्षी समितीची दिशाभूल केली आहे. त्यामुळे समितीच्या अहवालात संपूर्ण चुकीची व विसंगत माहिती नमूद झाली आहे. याबाबत बक्षी समितीला वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्याचे ठरविले आहे. - रमेश शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ

टॅग्स :fraudधोकेबाजीuniversityविद्यापीठState Governmentराज्य सरकार