शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

By admin | Updated: August 7, 2014 01:45 IST

बीड : पाणी टंचाईसह इतर जिल्हा प्रशासनाच्या कामांचा मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड : पाणी टंचाईसह इतर जिल्हा प्रशासनाच्या कामांचा मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री सुरेश धस, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह आमदार व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रात्री ८ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीस आ. प्रकाश सोळंके, आ. बदामराव पंडित, आ. पृथ्वीराज साठे, आ. धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती. यावर्षी जिल्हा नियोजन समितीस १८५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून होणाऱ्या कामांचा व झालेल्या कामांचा उपमुख्यमंत्र्यांनी प्रारंभी आढावा घेतला. यातून सामान्यांची कामे दर्जेदार व वेळेत करण्याच्या सूचनाही त्यांनी घेतल्या. यासह यावर्षी जिल्ह्यात जवळपास बाराशे कोटींचे पीककर्ज वाटप केले जाणार आहे. आतापर्यंतच्या कर्जवाटपाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना गतीने कर्ज देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. आतापर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अद्यापही दोनशेपेक्षा अधिक टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले़ सध्याची पाणी पुरवठ्याची स्थिती, सध्या जिल्हयातील प्रकल्पात असलेला पाणीसाठा, अधिग्रहण केलेल्या विहिरी, कूपनलिका तसेच पाणीटंचाई असलेली गावे, वाडी, वस्ती याचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. तसेच आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सध्या पीक परिस्थिती कशी आहे, पाऊस किती पडला याची माहितीही त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. (प्रतिनिधी)अंबाजोगाईचा प्रश्न लवकर मार्गी लावाअंबाजोगाई शहरात गेल्या काही दिवासांपासून पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहेत. अंबाजोगाईसाठी तयार केलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनेचे काम तात्काळ मार्गी लावा, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.बीड जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्यायवतमाळनंतर सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात होत असल्याचा मुद्दा यावेळी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीची माहिती पालकमंत्र्यांनी देत शेतकऱ्यांसाठी भरीव मदत करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीचा राज्य शासन गांभीर्याने विचार करील, असे यावेळी अजित पवार म्हणाले.