शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

By admin | Updated: August 7, 2014 01:45 IST

बीड : पाणी टंचाईसह इतर जिल्हा प्रशासनाच्या कामांचा मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड : पाणी टंचाईसह इतर जिल्हा प्रशासनाच्या कामांचा मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री सुरेश धस, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह आमदार व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रात्री ८ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीस आ. प्रकाश सोळंके, आ. बदामराव पंडित, आ. पृथ्वीराज साठे, आ. धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती. यावर्षी जिल्हा नियोजन समितीस १८५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून होणाऱ्या कामांचा व झालेल्या कामांचा उपमुख्यमंत्र्यांनी प्रारंभी आढावा घेतला. यातून सामान्यांची कामे दर्जेदार व वेळेत करण्याच्या सूचनाही त्यांनी घेतल्या. यासह यावर्षी जिल्ह्यात जवळपास बाराशे कोटींचे पीककर्ज वाटप केले जाणार आहे. आतापर्यंतच्या कर्जवाटपाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना गतीने कर्ज देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. आतापर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अद्यापही दोनशेपेक्षा अधिक टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले़ सध्याची पाणी पुरवठ्याची स्थिती, सध्या जिल्हयातील प्रकल्पात असलेला पाणीसाठा, अधिग्रहण केलेल्या विहिरी, कूपनलिका तसेच पाणीटंचाई असलेली गावे, वाडी, वस्ती याचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. तसेच आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सध्या पीक परिस्थिती कशी आहे, पाऊस किती पडला याची माहितीही त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. (प्रतिनिधी)अंबाजोगाईचा प्रश्न लवकर मार्गी लावाअंबाजोगाई शहरात गेल्या काही दिवासांपासून पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहेत. अंबाजोगाईसाठी तयार केलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनेचे काम तात्काळ मार्गी लावा, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.बीड जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्यायवतमाळनंतर सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात होत असल्याचा मुद्दा यावेळी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीची माहिती पालकमंत्र्यांनी देत शेतकऱ्यांसाठी भरीव मदत करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीचा राज्य शासन गांभीर्याने विचार करील, असे यावेळी अजित पवार म्हणाले.