शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

भत्यांपासून पोलिस वंचित

By admin | Updated: June 26, 2014 00:41 IST

हिंगोली : जिल्हा पोलिस विभागातील तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रवास व आहार भत्ता वेळेवर मिळत नाही. सुरक्षेसाठी दिवसरात्र एक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील ९ महिन्यांपासून भत्याविना कार्य करावे लागत आहे.

हिंगोली : जिल्हा पोलिस विभागातील तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रवास व आहार भत्ता वेळेवर मिळत नाही. सुरक्षेसाठी दिवसरात्र एक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील ९ महिन्यांपासून भत्याविना कार्य करावे लागत आहे. दरम्यान, वारंवार मागणी करूनही भत्याकडे दूर्लक्ष झाल्याने कर्मचाऱ्यांचे लक्ष कामापासून विचलित होत आहे. जिल्ह्यात जवळपास १ हजारांच्या पूढे तृतीयश्रेणी पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या आहे. कर्मचाऱ्यांकडे सुरक्षेची जबाबदारी असल्याने नेहमी कार्यस्थळी ये-जा असते. वर्षभरातील अधिक कालावधी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर राहवे लागते. घरांपासून दूर राहावे लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाहेरच्या जेवनाशिवाय पर्याय नसतो. ग्रामीण भागात अनेकवेळा उपासमारीची वेळ कर्मचाऱ्यांवर येते. अशा स्थितीत दिवसरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन होत नाही. त्याहीपेक्षा मागील ८ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना प्रवास तसेच आहार भत्ता मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांकडून वारंवार भत्याची मागणी केली जाते; परंतु कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. कर्मचाऱ्यांची संघटना नसल्याने प्रत्येक जणांनी केलेल्या वेगळ्या मागणीला प्रतिसाद मिळत नाही. संघटनेअभावी कर्मचाऱ्यांच्या या समस्येला अद्याप कोणी वाचा फोडलेली नाही. परिणामी प्रत्येक कर्मचाऱ्यांचा कमी-अधिक प्रमाणात असलेला भत्ता वाटप केला जात नाही. मध्यंतरी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी लवकर प्रवासभत्ता करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याला आज दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना आगामी काळात विधानसभेची निवडणूक होवू घातली आहे. निवडणुकीच्या पूर्वीपासून रखडलेल्या भत्यामुळे कर्मचाऱ्यांना अर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. दैैनंदिन कामांत कर्मचाऱ्यांचे लक्ष लागत नाही. कामांवर परिणाम होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. शिवाय कार्यालयीन कारकूनांकडून इतरही बिले वेळेवर काढली जात नाहीत. अल्पश: कामांसाठी देखील काही कारकून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. वरिष्ठांनी या समस्येकडे लक्ष देवून पगार तसेच भत्ते वेळेवर देण्याची मागणी तृतीयश्रेणी पोलिस कर्मचाऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)