शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

अंबलवाडीकर ग्रामस्थ नळ योजनेपासून वंचित

By admin | Updated: July 23, 2014 00:29 IST

परळी : परळी विधानसभा मतदारसंघातील व अंबाजोगाई तालुक्यातील अंबलवाडी गावातच कन्हेरवाडी पाझर तलाव भरलेला असूनही नळ योजनेचे काम बंद आहे.

परळी : परळी विधानसभा मतदारसंघातील व अंबाजोगाई तालुक्यातील अंबलवाडी गावातच कन्हेरवाडी पाझर तलाव भरलेला असूनही नळ योजनेचे काम बंद आहे. मागील दोन वर्षांपासून अंबलवाडीकर ग्रामस्थांना या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. येथील ग्रामस्थांना खड्डे पाडून पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.परळीपासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या अंबलवाडी येथे नळ योजना मंजूर झालेली आहे. मात्र ती अद्यापही कार्यान्वित नसल्याने येथील ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अंबलवाडी तलावातील पाणी पूस वीसखेडी योजनेला पुरवठा केला जातो. पूस येथे जलशुद्धीकरण होऊनही अंबलवाडी ग्रामस्थांना मिळत नाही. धरण उशाला असूनही अंबलवाडीच्या ग्रामस्थांच्या घशाला कोरड आहे. नळ योजना कार्यान्वित नसल्याने तलावाशेजारी खड्डे खोदून त्यातील पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावाजवळ असणाऱ्या पाझर तलावात मुबलक पाणीसाठा असूनही नळ योजनेचे पाणी प्यायला मिळत नसल्याचे येथील सुरेश गर्जे, दीपक गर्जे, संजय गर्जे यांनी सांगितले.पूस पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईन अनेक दिवसांपासून फुटलेली आहे. ती अद्यापही दुरुस्त झालेली नाही. याकडे दुरुस्ती विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रामदास गर्जे यांनी केला आहे. खड्ड्यातील पाणी प्यावे लागत असल्याने ते दूषित असून, त्यापासून विविध आजार जडत असल्याचे बिभीषण गर्जे यांनी सांगितले. उलटी, संडास यासारखे विविध आजार मागील अनेक दिवसांपासून येथील ग्रामस्थांना झाले असल्याचे चंद्रकांत दहीवडे यांनी सांगितले. अंबलवाडी येथे सुमारे आठशे घरे आहेत. मात्र या घरांना मागील दोन वर्षांपासून नळ योजनेचे पाणी प्यायला मिळालेले नाही.हातपंपही बंदअंबलवाडी रस्ता व पाझर तलावाजवळील दोन हातपंप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. विशेष म्हणजे गावात केवळ हे दोनच हातपंप असून तेही बंद असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अंबलवाडी ग्रामस्थांच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून, नळ योजनेबाबत पाठपुरावा करू, असे आ. धनंजय मुंडे यांनी सांगितले तर जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे गोविंद भुजबळ म्हणाले, या योजनेत अंबलवाडीचा समावेश आहे. नळ योजनेचे पाणी सुरू आहे. कधी वीज तर कधी पाणीपट्टीच्या समस्या असतात, त्यामुळे अडचणी येत आहेत. (वार्ताहर)धरण उशाला कोरड घशाला..!