शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

‘कन्या कल्याण’ योजनेस उदासीनता

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

सितम सोनवणे , लातूर कुटुंबात १ अथवा २ मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना राबविण्यात येत आहे.

सितम सोनवणे , लातूरमहिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी कुटुंबात १ अथवा २ मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना राबविण्यात येत आहे. मात्र ही योजना राबविण्यात स्थानिक प्रशासनाची उदासीनता आहे. सहा वर्षांत केवळ २६ लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी ही योजना १९९५ मध्ये सुरू करण्यात आली. १९९६ मध्ये या योजनेत सुधारणा करण्यात आली. एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास २ हजार रुपये रोख व मुलीच्या नावे ८ हजारांचे बचत प्रमाणपत्र. दोन मुलींवर कुटुंब नियोजन केल्यास रोख २ हजार व प्रत्येकी मुलींच्या नावे ४ हजारांचे बचत प्रमाणपत्र असे स्वरूप या योजनेचे आहे. मात्र ही योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे प्रस्तावाचे प्रमाण कमी आहे. २००८-०९ मध्ये तीन कुटुंबांंना, २००९-१० मध्ये पाच, २०१०-११ मध्ये एक, २०११-१२ मध्ये सहा, २०१२-१३ मध्ये तीन, २०१३-१४ मध्ये आठ अशा २६ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांना शस्त्रक्रियेच्या वेळी रोख २ हजार व त्यांच्या मुलींच्या नावे बचत प्रमाणपत्र मिळाले आहे. २०१४-१५ सालात तर फक्त तीन प्रस्ताव आले आहेत. त्यातही त्रुटी आहेत. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजनेची जनजागृती केली नसल्यामुळे लाभार्थ्यांचे प्रमाण नगण्य आहे. ग्रामीण स्तरावर जि.प.चा आरोग्य विभाग व शहरी स्तरावर न.प.च्या आरोग्य विभागातर्फे प्रस्ताव घेतले जातील. मात्र जि.प. व न.प.च्या आरोग्य विभागाची उदासीनता असल्यामुळे ही योजना कागदावरच राहत आहे. प्रसार करूनही प्रस्ताव अल्प..़सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना प्रोत्साहन मिळावे म्हणून सुरू करण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी ही योजना आहे. योजना जुनी झाली आहे. प्रत्येकाला योजनेची माहिती आहे. तरीही प्रस्ताव कमी येत आहेत. चालू वर्षात तीन प्रस्ताव आले आहेत. त्यातील त्रुटी दुरुस्त करून संबंधितांना या योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.