शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग ओस

By admin | Updated: June 2, 2014 01:08 IST

जिंतूर : खरीपपूर्व हंगामात विविध बियाणे तसेच कीटकनाशके, माती परीक्षण, पिकांची निवड यावर मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याऐवजी

जिंतूर : खरीपपूर्व हंगामात विविध बियाणे तसेच कीटकनाशके, माती परीक्षण, पिकांची निवड यावर मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याऐवजी तब्बल १५ ते २० दिवसांपासून या कार्यालयात एकही अधिकारी हजर राहत नसल्याचे चित्र आहे. येथील तालुका कृषी कार्यालय हे गावापासून तीन कि.मी.अंतरावर आहे. कार्यालयाचा कारभार सेलू येथील तालुका कृषी अधिकारी रोडगे यांच्याकडे देण्यात आला आहे. प्रभारी कारभार असल्याने रोडगे महिन्यातील मोजक्याच दिवशी जिंतुरात येतात. कार्यालयप्रमुखच येत नसल्याने इतर अधिकार्‍यांना तर रान मोकळे झाले आहे. मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, सहाय्यक यांचा तर कार्यालयात पत्ताच नसतो. विशेष म्हणजे अवघ्या आठ दिवसांवर खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. या हंगामात शेतकर्‍यांना विविध बियाणांच्या संदर्भात खत- कीटकनाशक, माती परीक्षण, पीक पद्धती व वातावरणाशी समरस होत कोणती पिके कोणत्या भागात घ्यावीत, यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. परंतु, या विभागातील अधिकार्‍यांना मार्गदर्शनाऐवजी विविध कामे असतील तरच कार्यालयात यावेसे वाटते. संबंधित मंडळ अधिकारी व पर्यवेक्षक तसेच कृषी सहाय्यक साईड व्हीजीटच्या नावाखाली महिना -महिना गायब असतात. त्यामुळे शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडण्याचे काम या विभागाकडून होत आहे. (वार्ताहर) तालुका कृषी कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकार्‍यावर असल्याने कार्यालयावर कोणाचेही नियंत्रण नाही. ६० ते ७० कर्मचारी असलेल्या कार्यालयात केवळ तीन ते चार व्यक्ती हजर असतात. परिणामी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकर्‍यांना विविध योजनांची माहिती, अनुदानाची माहिती, शेती औजाराची माहिती घेता येत नाही. अधिकारी कायमस्वरुपी नसल्याने कर्मचारीही उंटावरुन शेळ्या राखण्याचे काम करत आहेत. या कर्मचार्‍यांना कोणाचेही देणे-घेणे नाही. या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकार्‍याची गरज येथील कार्यालयास आहे.