शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये ‘डेंग्यू’चे सात दिवसांत सात रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:28 IST

डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरियासदृश रुग्णांतही होतेय वाढ

ठळक मुद्देकाही दिवसांत पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे.घाटीत सध्या त्याचा तुटवडा आहे.

औरंगाबाद : शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत असल्याने डेंग्यू आणि मलेरियासदृश आजारांनी शिरकाव केला आहे. जुलै महिन्याच्या अवघ्या ७ दिवसांत ७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे, तर घाटीत दररोज ५ ते ६ मलेरियासदृश रुग्ण दाखल होत आहेत.

पावसाळ्याला सुरुवात होताच कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाय राबविण्यावर भर दिला जातो; परंतु अवघ्या काही दिवसांच्या पावसानंतरच औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूरफवारणी यासह शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, तरीही डेंग्यूने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दोन रुग्ण ग्रामीण भागातील, तर पाच रुग्ण हे शहरातील असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.

पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य उपसंचालक, तसेच जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच नागरिकांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे क रण्यात आले आहे.

‘ओआरएस’चा तुटवडाजलजन्य आजारांच्या रुग्णासाठी ‘ओआरएस’ महत्त्वपूर्ण ठरते; परंतु घाटीत सध्या त्याचा तुटवडा आहे. याविषयी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, साथरोगांच्या दृष्टीने घाटीत औषधी उपलब्ध आहेत. ‘ओआरएस’ची स्थानिक पातळीवर खरेदी केली जात आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावीपावसाळ्याच्या कालावधीत पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने डासांमध्ये आणि डासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजारांत वाढ होत असते. रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी नागरिकांनीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे. -अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी

औषधींना प्रतिसादघाटीत डायरियाचे दररोज ३ ते ४ रुग्ण दाखल होत आहेत, तर मलेरियासदृश ५ ते ६ रुग्ण येत आहेत. घाटीत पुरेसा औषधीसाठा उपलब्ध आहे. रुग्णांना मलेरियाची औषधी दिली जात असून, त्याला प्रतिसाद मिळत असल्याने रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होते. - डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन विभाग, घाटी

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdengueडेंग्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर