शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

औरंगाबादमध्ये ‘डेंग्यू’चे सात दिवसांत सात रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:28 IST

डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरियासदृश रुग्णांतही होतेय वाढ

ठळक मुद्देकाही दिवसांत पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे.घाटीत सध्या त्याचा तुटवडा आहे.

औरंगाबाद : शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत असल्याने डेंग्यू आणि मलेरियासदृश आजारांनी शिरकाव केला आहे. जुलै महिन्याच्या अवघ्या ७ दिवसांत ७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे, तर घाटीत दररोज ५ ते ६ मलेरियासदृश रुग्ण दाखल होत आहेत.

पावसाळ्याला सुरुवात होताच कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाय राबविण्यावर भर दिला जातो; परंतु अवघ्या काही दिवसांच्या पावसानंतरच औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूरफवारणी यासह शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, तरीही डेंग्यूने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दोन रुग्ण ग्रामीण भागातील, तर पाच रुग्ण हे शहरातील असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.

पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य उपसंचालक, तसेच जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच नागरिकांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे क रण्यात आले आहे.

‘ओआरएस’चा तुटवडाजलजन्य आजारांच्या रुग्णासाठी ‘ओआरएस’ महत्त्वपूर्ण ठरते; परंतु घाटीत सध्या त्याचा तुटवडा आहे. याविषयी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, साथरोगांच्या दृष्टीने घाटीत औषधी उपलब्ध आहेत. ‘ओआरएस’ची स्थानिक पातळीवर खरेदी केली जात आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावीपावसाळ्याच्या कालावधीत पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने डासांमध्ये आणि डासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजारांत वाढ होत असते. रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी नागरिकांनीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे. -अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी

औषधींना प्रतिसादघाटीत डायरियाचे दररोज ३ ते ४ रुग्ण दाखल होत आहेत, तर मलेरियासदृश ५ ते ६ रुग्ण येत आहेत. घाटीत पुरेसा औषधीसाठा उपलब्ध आहे. रुग्णांना मलेरियाची औषधी दिली जात असून, त्याला प्रतिसाद मिळत असल्याने रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होते. - डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन विभाग, घाटी

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdengueडेंग्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर