शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 13:34 IST

बैठकीत सर्वांनीच संघटनात्मक फेरबदलाची जोरदार मागणी केल्याने बैठकीचा मूळ मुद्दा भरकटला. 

ठळक मुद्देजिल्हाप्रमुखपदापासून सर्वच पदांवरील पदाधिकारी बदलले गेले पाहिजेत. फेरबदल झाल्यास नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल

औरंगाबाद : राज्यात महाआघाडीचे सरकार येऊन ९ महिन्यांचा कालावधी लोटला आहे, तरी विविध शासकीय समित्या, महामंडळांवर नियुक्त्या न झाल्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवर लवकर नियुक्त्या व्हाव्यात यासाठी रविवारी एक बैठक पार पडली. संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वांनीच संघटनात्मक फेरबदलाची जोरदार मागणी केल्याने बैठकीचा मूळ मुद्दा भरकटला. 

जिल्हाप्रमुखपदासह सगळेच संघटनात्मक बदल करण्यात यावेत, अशी मागणी माझ्यासह सर्वांनी लावून धरली, असे आ. संजय शिरसाट यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अनेक महत्त्वाच्या पदांवर वर्षानुवर्षे तीच माणसे आहेत, त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी सर्वानुमते पुढे आली. याबाबत संपर्कप्रमुख घोसाळकर यांनी मागणी पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असा शब्द दिल्याची माहिती मिळाली. 

राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांना महामंडळ, अशासकीय समिती सदस्य होण्याचे वेध लागले; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काही रखडले. महाविकास आघाडीच्या सरकारमधील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांसाठी याद्या तयार झाल्या असून, शिवसेना मागे पडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याचे संपर्कप्रमुख घोसाळकर यांना बैठक घेऊन याद्या तयार करण्याबाबत सूचना देण्यासाठी पाठविले होते. आमदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुखांनी समित्यांसाठी सदस्यांच्या नावाची यादी द्यावी, याबाबत घोसाळकर यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यावरून पक्षात दोन गट पडले आहेत. 

फेरबदल होणे गरजेचे मी स्वत: मागणी केली आहे, संघटनेतील सर्व पदावरील चेहरे बदलणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे तेच चेहरे आहेत. जिल्हाप्रमुखपदापासून सर्वच पदांवरील पदाधिकारी बदलले गेले पाहिजेत. फेरबदल झाल्यास नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, असे मत माझ्यासह सर्वांनीच मांडल्याचे आ.  शिरसाट यांनी सांगितले.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादSanjay Sirsatसंजय सिरसाट