शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

औरंगाबाद-नगर महामार्गावरील अतिक्रमणे हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 23:24 IST

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर विविध व्यवसायिक व नागरिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, यासाठी वाळूज परिसरातील ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

औरंगाबाद-नगर: जागतिक बँक प्रकल्पातर्फे ग्रामपंचायतीना नोटिसावाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर विविध व्यवसायिक व नागरिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, यासाठी वाळूज परिसरातील ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

जागतिक बँक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ अहमदनगर अंतर्गत येणाऱ्या या महामार्गावर औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी भागांतील हजारो वाहनांची रात्र-दिवस ये-जा सुरु असते. मात्र, ग्रामपंचायत हद्दीतून जाणाºया या महामार्गावर विविध व्यवसायिकांनी अतिक्रमणे करुन व्यवसाय थाटले आहेत. रस्त्याच्याकडेला भाजी मंडई, मच्छी मार्केट, गॅरेज, पानटपºया, हातगाड्यावर व्यवसाय करणारे आदीसह अनेकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. याचबरोबर हॉस्पीटल, कापड दुकानदार, दुचाकी व तीन चाकीचे शोरुम असणारे व्यवसायिक आदींनी पार्किंगसाठी जागा न सोडल्यामुळे खरेदीसाठी येणाºया ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची सतत कोंडी होत आहे.

या महामार्गाच्या दुतर्फा जडवाहनधारक रस्त्याच्याकडेला वाहने उभी करीत असल्यामुळे ये-जा करणाºया दुचाकीस्वार, छोटे वाहनधारक व पादचाºयांना जिव मुठीत धरुनच ये-जा करावी लागत आहेत. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. या रुंदीकरणासाठी जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवून वाळूज, पंढरपूर, तिरंगा चौक, सिडकोमहानगर आदी ठिकाणची अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली होती.

त्यानंतर जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाºयांनी लोखंडी बॅरिकेटस् व फुटपाथ न उभारल्यामुळे अल्पवधीतच अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली आहेत. आजघडीला गोलवाडी फाट्यापासून ढोरेगावपर्यंत या महामार्गावर अनेकांनी अतिक्रमणे थाटली आहेत. या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच असून रस्ते अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

ग्रामपंचायतींना नोटीसाऔरंगाबाद-नगर महामार्गालगत वाळूज, पंढरपूर, तीसगाव व वळदगाव, लिंबेजळगाव, ढोरेगाव आदी ग्रामपंचायतीच्या हद्दी आहेत. अपघाताचा धोका टाळण्यासाठी महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावे, यासाठी जागतिक बँक प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी एस.वाय.औटी यांनी या चार ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

वेळकाढू धोरणवाळूज परिसरातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतून हा महामार्ग गेलेला आहे. गावातील बेरोजगार तसेच विविध व्यवसायिकांनी या महामार्गालगतच्या जागेवरच अतिक्रमणे करुन व्यवसाय थाटले आहेत. अतिक्रमणे हटविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा नसल्यामुळे अतिक्रमणे हटविण्यास ग्रामपंचायती वेळकाढू धोरण अवलंबीत असल्याची चर्चा आहेत.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद