शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

औरंगाबाद-नगर महामार्गावरील अतिक्रमणे हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 23:24 IST

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर विविध व्यवसायिक व नागरिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, यासाठी वाळूज परिसरातील ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

औरंगाबाद-नगर: जागतिक बँक प्रकल्पातर्फे ग्रामपंचायतीना नोटिसावाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर विविध व्यवसायिक व नागरिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, यासाठी वाळूज परिसरातील ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

जागतिक बँक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ अहमदनगर अंतर्गत येणाऱ्या या महामार्गावर औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी भागांतील हजारो वाहनांची रात्र-दिवस ये-जा सुरु असते. मात्र, ग्रामपंचायत हद्दीतून जाणाºया या महामार्गावर विविध व्यवसायिकांनी अतिक्रमणे करुन व्यवसाय थाटले आहेत. रस्त्याच्याकडेला भाजी मंडई, मच्छी मार्केट, गॅरेज, पानटपºया, हातगाड्यावर व्यवसाय करणारे आदीसह अनेकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. याचबरोबर हॉस्पीटल, कापड दुकानदार, दुचाकी व तीन चाकीचे शोरुम असणारे व्यवसायिक आदींनी पार्किंगसाठी जागा न सोडल्यामुळे खरेदीसाठी येणाºया ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची सतत कोंडी होत आहे.

या महामार्गाच्या दुतर्फा जडवाहनधारक रस्त्याच्याकडेला वाहने उभी करीत असल्यामुळे ये-जा करणाºया दुचाकीस्वार, छोटे वाहनधारक व पादचाºयांना जिव मुठीत धरुनच ये-जा करावी लागत आहेत. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. या रुंदीकरणासाठी जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवून वाळूज, पंढरपूर, तिरंगा चौक, सिडकोमहानगर आदी ठिकाणची अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली होती.

त्यानंतर जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाºयांनी लोखंडी बॅरिकेटस् व फुटपाथ न उभारल्यामुळे अल्पवधीतच अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली आहेत. आजघडीला गोलवाडी फाट्यापासून ढोरेगावपर्यंत या महामार्गावर अनेकांनी अतिक्रमणे थाटली आहेत. या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच असून रस्ते अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

ग्रामपंचायतींना नोटीसाऔरंगाबाद-नगर महामार्गालगत वाळूज, पंढरपूर, तीसगाव व वळदगाव, लिंबेजळगाव, ढोरेगाव आदी ग्रामपंचायतीच्या हद्दी आहेत. अपघाताचा धोका टाळण्यासाठी महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावे, यासाठी जागतिक बँक प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी एस.वाय.औटी यांनी या चार ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

वेळकाढू धोरणवाळूज परिसरातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतून हा महामार्ग गेलेला आहे. गावातील बेरोजगार तसेच विविध व्यवसायिकांनी या महामार्गालगतच्या जागेवरच अतिक्रमणे करुन व्यवसाय थाटले आहेत. अतिक्रमणे हटविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा नसल्यामुळे अतिक्रमणे हटविण्यास ग्रामपंचायती वेळकाढू धोरण अवलंबीत असल्याची चर्चा आहेत.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद