शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

औरंगाबाद-नगर महामार्गावरील अतिक्रमणे हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 23:24 IST

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर विविध व्यवसायिक व नागरिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, यासाठी वाळूज परिसरातील ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

औरंगाबाद-नगर: जागतिक बँक प्रकल्पातर्फे ग्रामपंचायतीना नोटिसावाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर विविध व्यवसायिक व नागरिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, यासाठी वाळूज परिसरातील ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

जागतिक बँक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ अहमदनगर अंतर्गत येणाऱ्या या महामार्गावर औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी भागांतील हजारो वाहनांची रात्र-दिवस ये-जा सुरु असते. मात्र, ग्रामपंचायत हद्दीतून जाणाºया या महामार्गावर विविध व्यवसायिकांनी अतिक्रमणे करुन व्यवसाय थाटले आहेत. रस्त्याच्याकडेला भाजी मंडई, मच्छी मार्केट, गॅरेज, पानटपºया, हातगाड्यावर व्यवसाय करणारे आदीसह अनेकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. याचबरोबर हॉस्पीटल, कापड दुकानदार, दुचाकी व तीन चाकीचे शोरुम असणारे व्यवसायिक आदींनी पार्किंगसाठी जागा न सोडल्यामुळे खरेदीसाठी येणाºया ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची सतत कोंडी होत आहे.

या महामार्गाच्या दुतर्फा जडवाहनधारक रस्त्याच्याकडेला वाहने उभी करीत असल्यामुळे ये-जा करणाºया दुचाकीस्वार, छोटे वाहनधारक व पादचाºयांना जिव मुठीत धरुनच ये-जा करावी लागत आहेत. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. या रुंदीकरणासाठी जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवून वाळूज, पंढरपूर, तिरंगा चौक, सिडकोमहानगर आदी ठिकाणची अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली होती.

त्यानंतर जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाºयांनी लोखंडी बॅरिकेटस् व फुटपाथ न उभारल्यामुळे अल्पवधीतच अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली आहेत. आजघडीला गोलवाडी फाट्यापासून ढोरेगावपर्यंत या महामार्गावर अनेकांनी अतिक्रमणे थाटली आहेत. या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच असून रस्ते अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

ग्रामपंचायतींना नोटीसाऔरंगाबाद-नगर महामार्गालगत वाळूज, पंढरपूर, तीसगाव व वळदगाव, लिंबेजळगाव, ढोरेगाव आदी ग्रामपंचायतीच्या हद्दी आहेत. अपघाताचा धोका टाळण्यासाठी महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावे, यासाठी जागतिक बँक प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी एस.वाय.औटी यांनी या चार ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

वेळकाढू धोरणवाळूज परिसरातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतून हा महामार्ग गेलेला आहे. गावातील बेरोजगार तसेच विविध व्यवसायिकांनी या महामार्गालगतच्या जागेवरच अतिक्रमणे करुन व्यवसाय थाटले आहेत. अतिक्रमणे हटविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा नसल्यामुळे अतिक्रमणे हटविण्यास ग्रामपंचायती वेळकाढू धोरण अवलंबीत असल्याची चर्चा आहेत.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद