शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

क्रॉसिंगमुळे होतोय रेल्वेला विलंब

By admin | Updated: April 12, 2016 00:32 IST

लातूर : मिरजहून कृष्णेचे पाणी रेल्वेने लातूरला आणण्यात येत आहे़ रेल्वेने आलेले पाणी उतरवून घेण्यासाठी लागणारी यंत्रणा लातुरात सज्ज झाली

लातूर : मिरजहून कृष्णेचे पाणी रेल्वेने लातूरला आणण्यात येत आहे़ रेल्वेने आलेले पाणी उतरवून घेण्यासाठी लागणारी यंत्रणा लातुरात सज्ज झाली असून सोमवारी दिवसभर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कामकाज सुरू होते़ रेल्वे वॅगिनमध्ये आलेले पाणी उतरवून घेऊन ते टँकरमध्ये भरण्यासाठी विहिरीपासून काही अंतरावर ४ पॉर्इंट तयार करण्यात आले आहेत़ आता फक्त ‘पाणी एक्स्पे्रस’ची उत्सुकता लातूरकरांना लागली आहे़ मिरजहून सकाळीच रेल्वे निघाली असून क्रॉसिंगमुळे विलंब होत असल्याचे सांगण्यात आले़ रात्री उशिरा ही पाणी एक्स्प्रेस लातुरात पोहचेल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले़ या रेल्वेत जवळपास ५ लाख लिटर्स पाणी येत आहे़मिरज रेल्वेस्थानकातून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दहा वॅगिनमध्ये ५ लाख लिटर्स पाणी भरून पाणी एक्स्प्रेस लातूरकडे निघाली आहे़ रेल्वेतील पाणी उतरवून घेण्यासाठी लागणारी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी २४ तास काम सुरू आहे़ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदींच्या मदतीने पाणी उतरवून घेण्याचे काम पूर्ण केले आहे़ ट्रायलबेसेसवर जरी दहा वॅगिन पाणी येत असले तरी एकाच वेळी २५ लाख लिटर्स पाणी आले तरी ते उतरवून घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे़ रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या एस़आऱदेशमुख यांच्या शेतातील विहिरीतील गाळ उपसा करण्यात आल्यानंतर सोमवारी प्लॅस्टिक ताडपत्री टाकण्यात आली आहे़ पाणी विहिरीत मुरणार नाही, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे़ रेल्वेतून पाणी उतरवून घेण्यासाठी लागणारी सर्व कामे पूर्ण झाली आहेत़ सिमेंटची पाईपलाईन टाकण्यात आली आहे़ शिवाय, विहिरीत टाकलेले पाणी जलकुंभापर्यंत पोहचविण्यासाठी एचडीजलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे़ विहिरीतून टँकर भरण्यासाठी सोमवारी चार पॉर्इंट तयार झाले आहेत़ येथून मोठे टँकर भरले जातील़ हे पाणी हरंगुळ व आर्वी येथील जलशुध्दीकरण केंद्रात टाकण्यात येणार आहे़ याठिकाणी २४ तास वीज उपलब्ध राहील, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ एस़आऱदेशमुख यांच्या शेतातील विहिरीत घेतलेले पाणी आर्वीच्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनद्वारे नेले जाणार आहे़ सध्या या जलवाहिनीचे काम सुरू झाले असले तरी ते लवकर पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे़ मात्र, दिवसरात्र काम सुरू असल्याने लवकरच हे कामही पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली़ प्रशासन सज्ज़़़विहिरीतील गाळ उपसा पूर्ण झाला, ताडपत्री टाकण्यात आली़ शिवाय, वरच्या बाजूचे प्लास्टरही करण्यात आले आहे़ रेल्वे कधीही आली तरी आपण आपल्याकडील सर्व कामे पूर्ण झाली आहेत़ प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे़ आता केवळ रेल्वेची प्रतीक्षा लागली आहे़ जलकुंभात पाणी टाकल्यास ४ तासात वॅगिन रिकामी होईल़ ट्रायल बेसवर पाणी येत असले तरी ते शुध्द पाणी आहे़ तरीही आपण त्याच्यावर प्रक्रिया करूनच टँकरने शहरात पूरविणार असल्याचे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़