शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

क्रॉसिंगमुळे होतोय रेल्वेला विलंब

By admin | Updated: April 12, 2016 00:32 IST

लातूर : मिरजहून कृष्णेचे पाणी रेल्वेने लातूरला आणण्यात येत आहे़ रेल्वेने आलेले पाणी उतरवून घेण्यासाठी लागणारी यंत्रणा लातुरात सज्ज झाली

लातूर : मिरजहून कृष्णेचे पाणी रेल्वेने लातूरला आणण्यात येत आहे़ रेल्वेने आलेले पाणी उतरवून घेण्यासाठी लागणारी यंत्रणा लातुरात सज्ज झाली असून सोमवारी दिवसभर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कामकाज सुरू होते़ रेल्वे वॅगिनमध्ये आलेले पाणी उतरवून घेऊन ते टँकरमध्ये भरण्यासाठी विहिरीपासून काही अंतरावर ४ पॉर्इंट तयार करण्यात आले आहेत़ आता फक्त ‘पाणी एक्स्पे्रस’ची उत्सुकता लातूरकरांना लागली आहे़ मिरजहून सकाळीच रेल्वे निघाली असून क्रॉसिंगमुळे विलंब होत असल्याचे सांगण्यात आले़ रात्री उशिरा ही पाणी एक्स्प्रेस लातुरात पोहचेल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले़ या रेल्वेत जवळपास ५ लाख लिटर्स पाणी येत आहे़मिरज रेल्वेस्थानकातून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दहा वॅगिनमध्ये ५ लाख लिटर्स पाणी भरून पाणी एक्स्प्रेस लातूरकडे निघाली आहे़ रेल्वेतील पाणी उतरवून घेण्यासाठी लागणारी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी २४ तास काम सुरू आहे़ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदींच्या मदतीने पाणी उतरवून घेण्याचे काम पूर्ण केले आहे़ ट्रायलबेसेसवर जरी दहा वॅगिन पाणी येत असले तरी एकाच वेळी २५ लाख लिटर्स पाणी आले तरी ते उतरवून घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे़ रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या एस़आऱदेशमुख यांच्या शेतातील विहिरीतील गाळ उपसा करण्यात आल्यानंतर सोमवारी प्लॅस्टिक ताडपत्री टाकण्यात आली आहे़ पाणी विहिरीत मुरणार नाही, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे़ रेल्वेतून पाणी उतरवून घेण्यासाठी लागणारी सर्व कामे पूर्ण झाली आहेत़ सिमेंटची पाईपलाईन टाकण्यात आली आहे़ शिवाय, विहिरीत टाकलेले पाणी जलकुंभापर्यंत पोहचविण्यासाठी एचडीजलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे़ विहिरीतून टँकर भरण्यासाठी सोमवारी चार पॉर्इंट तयार झाले आहेत़ येथून मोठे टँकर भरले जातील़ हे पाणी हरंगुळ व आर्वी येथील जलशुध्दीकरण केंद्रात टाकण्यात येणार आहे़ याठिकाणी २४ तास वीज उपलब्ध राहील, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ एस़आऱदेशमुख यांच्या शेतातील विहिरीत घेतलेले पाणी आर्वीच्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनद्वारे नेले जाणार आहे़ सध्या या जलवाहिनीचे काम सुरू झाले असले तरी ते लवकर पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे़ मात्र, दिवसरात्र काम सुरू असल्याने लवकरच हे कामही पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली़ प्रशासन सज्ज़़़विहिरीतील गाळ उपसा पूर्ण झाला, ताडपत्री टाकण्यात आली़ शिवाय, वरच्या बाजूचे प्लास्टरही करण्यात आले आहे़ रेल्वे कधीही आली तरी आपण आपल्याकडील सर्व कामे पूर्ण झाली आहेत़ प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे़ आता केवळ रेल्वेची प्रतीक्षा लागली आहे़ जलकुंभात पाणी टाकल्यास ४ तासात वॅगिन रिकामी होईल़ ट्रायल बेसवर पाणी येत असले तरी ते शुध्द पाणी आहे़ तरीही आपण त्याच्यावर प्रक्रिया करूनच टँकरने शहरात पूरविणार असल्याचे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़