शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

दिशाहीन नेतृत्वामुळे विकास खुंटला-दुर्राणी

By admin | Updated: October 12, 2014 12:12 IST

२५ वर्षांत जिल्ह्याला दिशाहीन नेतृत्व मिळाल्यामुळे विकास खुंटला गेला असल्याचे प्रतिपादन आ. बाबाजानी दुर्राणी पाथरी येथे व्यापार्‍यांशी सुसंवाद साधताना केले.

पाथरी : मराठवाड्यात सर्वात जास्त कापूस उत्पादन करणारा परभणी जिल्हा असतानाही केंद्र शासनाची टेक्सस्टाईल पार्क योजना जिल्ह्याबाहेर गेल्यामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील २५ वर्षांत जिल्ह्याला दिशाहीन नेतृत्व मिळाल्यामुळे विकास खुंटला गेला असल्याचे प्रतिपादन आ. बाबाजानी दुर्राणी पाथरी येथे व्यापार्‍यांशी सुसंवाद साधताना केले. 

पाथरी शहरातील बाबा टॉवरमध्ये ११ ऑक्टोबर रोजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी शहरातील सर्व व्यापार्‍यांची बैठक बोलावली होती. याप्रसंगी बालाप्रसाद मुंदडा, राजू पामे, शिवाजीराव चिंचाणे, सत्यनारायण चांडक, माऊली तायनाक, राम कोक्कर, आरेफ खान, दिगंबर लिपणे, पप्पू लाहोटी यांची उपस्थिती होती. व्यापार्‍यांशी बोलताना दुर्राणी म्हणाले, पाथरी शहरात मागील काही वर्षांत व्यापारपेठ मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने व्यापार्‍यांच्या दृष्टिकोनातून शहर पुढे येऊ लागले आहे.
पूर्वीच्या निवडणुकांमध्ये आणि या निवडणुकांमध्ये आता मोठा फरक जानवत आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या समस्यांवर कोणी बोलताना दिसत नाही. धनदांडग्याची शक्ती वातावरण गढूळ करण्याचे काम करीत आहे. चुकीच्या माणसांना निवडून दिल्यानंतर पाच वर्षे पश्‍चाताप करावा लागतो. त्यामुळे मतदारसंघ विकासापासून वंचितही राहतो.
जिल्ह्यात मागील २५ वर्षांत दिशाहीन नेतृत्वामुळे आर्थिक प्रगती झाली नाही. याप्रसंगी सूत्रसंचालन बा. सु. टेंगसे यांनी केले. बैठकीला शहरातील व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)