शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

हरणांचा पाण्यात बुडून मृत्यू, अधिकारी म्हणतात तुम्हीच घ्या पाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:07 IST

बाजारसावंगी : गेल्या तीन दिवसांत विरमगाव आणि धामणगाव शिवारातील विहिरीत पडून दोन हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर ...

बाजारसावंगी : गेल्या तीन दिवसांत विरमगाव आणि धामणगाव शिवारातील विहिरीत पडून दोन हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. यासंदर्भात वनविभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना माहिती देऊनही त्यांच्याकडून ‘तुम्हीच घ्या पाहून’ असे उत्तर मिळाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याची साधी तसदीदेखील घेतलेली नाही. त्यामुळे वन्यप्राणी ठार झाले तर होऊ द्या, असा दृष्टिकोन असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे.

विरमगाव शिवारात मंगळवारी (दि.९) एक हरिण विहिरीत पडून मृत झाली होती. याबाबत वनविभागाला तातडीने माहिती देण्यात आली. यानंतर दोन दिवसाने गुरुवारी (दि.११) धामणगाव शिवारातही एका हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. धामणगावातील गट क्रमांक- ५९ मधील सरलाबाई कामठे यांच्या शेतातील विहिरीत हरिण मृतावस्थेत आढळून आले. यासंबंधी रावसाहेब कामठे यांनी वनमजूर रामदास आघाडे यांना माहिती दिली. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर चौकीदार दगडू घोडके घटनास्थळी आले. त्यांनी परिसरातील शेतकरी बाळू माचवे, शैलेश आघाडे आणि मोहन चव्हाण यांच्या मदतीने मृत हरणाला विहिरीतून बाहेर काढले. यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. याबद्दल वनपाल श्रेया कोटूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही, तर खुलताबाद वनपरिक्षेत्र अधिकारी पेहेरकर यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे रानावनातील पाणीसाठे संपुष्टात आल्याने वन्यप्राणी शेतवस्तीकडे पाण्याच्या शोधात येत आहेत. त्यामुळे अशा घटना होत असल्यामुळे वनविभागाकडून कुठल्याच उपाययोजना राबविण्यात येत नसल्याची स्थिती आहे.

------

नेहमीप्रमाणे करा; वनपालाने दिला अजब सल्ला

विहिरीतून मृत हरिण बाहेर काढल्यानंतर चौकीदारांनी वनपाल यांना याबाबत माहिती दिली. यावर वनपालांनी आपण जसे नेहमी करतो तसेच करा, कोणी असेल तर पंचनामा करून घेऊन या. मी सही करून घेतो, असा अजब सल्ला दिला. पण घटनास्थळी वनपाल किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने येण्याची तसदीही सुद्धा घेतली नाही. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी अशा घटनेतबाबत सुद्धा किती गंभीर असल्याचे यावरून पुढे येते. खुलताबाद तालुक्यातील लोणी, बोडखा, झरी, वडगाव, दरेगाव, पाडळी, बाजारसावंगी, कनकशीळ, धामणगाव भागात मोठ्या प्रमाणात घनदाट वन असल्याने येथे वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे वनविभागाकडून उन्हाळ्यात पाणवठ्यात पाणीण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.