शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

हरणांचा पाण्यात बुडून मृत्यू, अधिकारी म्हणतात तुम्हीच घ्या पाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:07 IST

बाजारसावंगी : गेल्या तीन दिवसांत विरमगाव आणि धामणगाव शिवारातील विहिरीत पडून दोन हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर ...

बाजारसावंगी : गेल्या तीन दिवसांत विरमगाव आणि धामणगाव शिवारातील विहिरीत पडून दोन हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. यासंदर्भात वनविभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना माहिती देऊनही त्यांच्याकडून ‘तुम्हीच घ्या पाहून’ असे उत्तर मिळाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याची साधी तसदीदेखील घेतलेली नाही. त्यामुळे वन्यप्राणी ठार झाले तर होऊ द्या, असा दृष्टिकोन असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे.

विरमगाव शिवारात मंगळवारी (दि.९) एक हरिण विहिरीत पडून मृत झाली होती. याबाबत वनविभागाला तातडीने माहिती देण्यात आली. यानंतर दोन दिवसाने गुरुवारी (दि.११) धामणगाव शिवारातही एका हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. धामणगावातील गट क्रमांक- ५९ मधील सरलाबाई कामठे यांच्या शेतातील विहिरीत हरिण मृतावस्थेत आढळून आले. यासंबंधी रावसाहेब कामठे यांनी वनमजूर रामदास आघाडे यांना माहिती दिली. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर चौकीदार दगडू घोडके घटनास्थळी आले. त्यांनी परिसरातील शेतकरी बाळू माचवे, शैलेश आघाडे आणि मोहन चव्हाण यांच्या मदतीने मृत हरणाला विहिरीतून बाहेर काढले. यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. याबद्दल वनपाल श्रेया कोटूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही, तर खुलताबाद वनपरिक्षेत्र अधिकारी पेहेरकर यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे रानावनातील पाणीसाठे संपुष्टात आल्याने वन्यप्राणी शेतवस्तीकडे पाण्याच्या शोधात येत आहेत. त्यामुळे अशा घटना होत असल्यामुळे वनविभागाकडून कुठल्याच उपाययोजना राबविण्यात येत नसल्याची स्थिती आहे.

------

नेहमीप्रमाणे करा; वनपालाने दिला अजब सल्ला

विहिरीतून मृत हरिण बाहेर काढल्यानंतर चौकीदारांनी वनपाल यांना याबाबत माहिती दिली. यावर वनपालांनी आपण जसे नेहमी करतो तसेच करा, कोणी असेल तर पंचनामा करून घेऊन या. मी सही करून घेतो, असा अजब सल्ला दिला. पण घटनास्थळी वनपाल किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने येण्याची तसदीही सुद्धा घेतली नाही. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी अशा घटनेतबाबत सुद्धा किती गंभीर असल्याचे यावरून पुढे येते. खुलताबाद तालुक्यातील लोणी, बोडखा, झरी, वडगाव, दरेगाव, पाडळी, बाजारसावंगी, कनकशीळ, धामणगाव भागात मोठ्या प्रमाणात घनदाट वन असल्याने येथे वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे वनविभागाकडून उन्हाळ्यात पाणवठ्यात पाणीण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.