शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हरणांचा पाण्यात बुडून मृत्यू, अधिकारी म्हणतात तुम्हीच घ्या पाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:07 IST

बाजारसावंगी : गेल्या तीन दिवसांत विरमगाव आणि धामणगाव शिवारातील विहिरीत पडून दोन हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर ...

बाजारसावंगी : गेल्या तीन दिवसांत विरमगाव आणि धामणगाव शिवारातील विहिरीत पडून दोन हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. यासंदर्भात वनविभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना माहिती देऊनही त्यांच्याकडून ‘तुम्हीच घ्या पाहून’ असे उत्तर मिळाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याची साधी तसदीदेखील घेतलेली नाही. त्यामुळे वन्यप्राणी ठार झाले तर होऊ द्या, असा दृष्टिकोन असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे.

विरमगाव शिवारात मंगळवारी (दि.९) एक हरिण विहिरीत पडून मृत झाली होती. याबाबत वनविभागाला तातडीने माहिती देण्यात आली. यानंतर दोन दिवसाने गुरुवारी (दि.११) धामणगाव शिवारातही एका हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. धामणगावातील गट क्रमांक- ५९ मधील सरलाबाई कामठे यांच्या शेतातील विहिरीत हरिण मृतावस्थेत आढळून आले. यासंबंधी रावसाहेब कामठे यांनी वनमजूर रामदास आघाडे यांना माहिती दिली. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर चौकीदार दगडू घोडके घटनास्थळी आले. त्यांनी परिसरातील शेतकरी बाळू माचवे, शैलेश आघाडे आणि मोहन चव्हाण यांच्या मदतीने मृत हरणाला विहिरीतून बाहेर काढले. यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. याबद्दल वनपाल श्रेया कोटूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही, तर खुलताबाद वनपरिक्षेत्र अधिकारी पेहेरकर यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे रानावनातील पाणीसाठे संपुष्टात आल्याने वन्यप्राणी शेतवस्तीकडे पाण्याच्या शोधात येत आहेत. त्यामुळे अशा घटना होत असल्यामुळे वनविभागाकडून कुठल्याच उपाययोजना राबविण्यात येत नसल्याची स्थिती आहे.

------

नेहमीप्रमाणे करा; वनपालाने दिला अजब सल्ला

विहिरीतून मृत हरिण बाहेर काढल्यानंतर चौकीदारांनी वनपाल यांना याबाबत माहिती दिली. यावर वनपालांनी आपण जसे नेहमी करतो तसेच करा, कोणी असेल तर पंचनामा करून घेऊन या. मी सही करून घेतो, असा अजब सल्ला दिला. पण घटनास्थळी वनपाल किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने येण्याची तसदीही सुद्धा घेतली नाही. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी अशा घटनेतबाबत सुद्धा किती गंभीर असल्याचे यावरून पुढे येते. खुलताबाद तालुक्यातील लोणी, बोडखा, झरी, वडगाव, दरेगाव, पाडळी, बाजारसावंगी, कनकशीळ, धामणगाव भागात मोठ्या प्रमाणात घनदाट वन असल्याने येथे वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे वनविभागाकडून उन्हाळ्यात पाणवठ्यात पाणीण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.