शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

हरणांचा पाण्यात बुडून मृत्यू, अधिकारी म्हणतात तुम्हीच घ्या पाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:07 IST

बाजारसावंगी : गेल्या तीन दिवसांत विरमगाव आणि धामणगाव शिवारातील विहिरीत पडून दोन हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर ...

बाजारसावंगी : गेल्या तीन दिवसांत विरमगाव आणि धामणगाव शिवारातील विहिरीत पडून दोन हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. यासंदर्भात वनविभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना माहिती देऊनही त्यांच्याकडून ‘तुम्हीच घ्या पाहून’ असे उत्तर मिळाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याची साधी तसदीदेखील घेतलेली नाही. त्यामुळे वन्यप्राणी ठार झाले तर होऊ द्या, असा दृष्टिकोन असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे.

विरमगाव शिवारात मंगळवारी (दि.९) एक हरिण विहिरीत पडून मृत झाली होती. याबाबत वनविभागाला तातडीने माहिती देण्यात आली. यानंतर दोन दिवसाने गुरुवारी (दि.११) धामणगाव शिवारातही एका हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. धामणगावातील गट क्रमांक- ५९ मधील सरलाबाई कामठे यांच्या शेतातील विहिरीत हरिण मृतावस्थेत आढळून आले. यासंबंधी रावसाहेब कामठे यांनी वनमजूर रामदास आघाडे यांना माहिती दिली. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर चौकीदार दगडू घोडके घटनास्थळी आले. त्यांनी परिसरातील शेतकरी बाळू माचवे, शैलेश आघाडे आणि मोहन चव्हाण यांच्या मदतीने मृत हरणाला विहिरीतून बाहेर काढले. यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. याबद्दल वनपाल श्रेया कोटूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही, तर खुलताबाद वनपरिक्षेत्र अधिकारी पेहेरकर यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे रानावनातील पाणीसाठे संपुष्टात आल्याने वन्यप्राणी शेतवस्तीकडे पाण्याच्या शोधात येत आहेत. त्यामुळे अशा घटना होत असल्यामुळे वनविभागाकडून कुठल्याच उपाययोजना राबविण्यात येत नसल्याची स्थिती आहे.

------

नेहमीप्रमाणे करा; वनपालाने दिला अजब सल्ला

विहिरीतून मृत हरिण बाहेर काढल्यानंतर चौकीदारांनी वनपाल यांना याबाबत माहिती दिली. यावर वनपालांनी आपण जसे नेहमी करतो तसेच करा, कोणी असेल तर पंचनामा करून घेऊन या. मी सही करून घेतो, असा अजब सल्ला दिला. पण घटनास्थळी वनपाल किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने येण्याची तसदीही सुद्धा घेतली नाही. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी अशा घटनेतबाबत सुद्धा किती गंभीर असल्याचे यावरून पुढे येते. खुलताबाद तालुक्यातील लोणी, बोडखा, झरी, वडगाव, दरेगाव, पाडळी, बाजारसावंगी, कनकशीळ, धामणगाव भागात मोठ्या प्रमाणात घनदाट वन असल्याने येथे वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे वनविभागाकडून उन्हाळ्यात पाणवठ्यात पाणीण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.