शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

डी.एड., बी.एड. अंतिम वर्षाच्या तीन हजार विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:02 IST

-- डी.एड., बी.एड. अंतिम वर्षाच्या ३ हजार १०० विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी विद्यार्थ्यांमध्ये आनंद : शिक्षण विभागाचे महाराष्ट राज्य ...

--

डी.एड., बी.एड. अंतिम वर्षाच्या ३ हजार १०० विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी

विद्यार्थ्यांमध्ये आनंद : शिक्षण विभागाचे महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेला आदेश

औरंगाबाद : शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टिईटी) आता डी.एड., बी.एड. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील अंतिम वर्षात शिकत असलेल्या दोन हजार बी.एड. आणि १ हजार १०० डी.एड.च्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा देता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा होणार आहे. त्यासाठी ३ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. मात्र, या परीक्षेसाठी बी.एड. आणि डी.एड.च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षेपासून वंचित राहणार होते. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठविल्यावर शालेय शिक्षण विभागाने परीक्षा परिषदेला या विद्यार्थ्यांनाही ‘टीईटी’ची संधी देण्याचे आदेश दिले.

जिल्ह्यात डी.एड.चे ३ शासकीय, तर २७ खासगी महाविद्यालये असून, त्यात अंतिम वर्षात ११०० विद्यार्थी शिकत आहेत, तर बी.एड.च्या अंतिम वर्षात जिल्ह्यातील १८ महाविद्यालयांत १७०० विद्यार्थी तसेच एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्नित ४ बी.एड. महाविद्यालयात ३०० विद्यार्थी शिकत आहेत. ‘टीईटी’बाबत परीक्षा परिषदेचा निर्णय लवकरच अपेक्षित असून, जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा मिळणार आहे, असे बोलले जात आहे.

----

जिल्ह्यात डी.एड.च्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - २०००

बी.एड.च्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - ११००

---

पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

शिक्षक पात्रता परीक्षेकरिता ३ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. २५ ऑगस्टपर्यंत मुदत असलेल्या या प्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्याने आता ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. सुरुवातीला बी.एड., डी.एड.च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी नव्हती.

---

विद्यार्थी काय म्हणतात

---

कोरोनामुळे आधीच आर्थिक व शैक्षणिक स्थिती खराब झाली आहे. त्यात पुढे परीक्षा कधी होईल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे आता आम्हाला परीक्षेस संधी मिळाल्याने भवितव्य आशादायी वाटत आहे.

- गणेश बोरकर, बी.एड. अंतिम वर्ष विद्यार्थी

----

‘टीईटी’ परीक्षेची संधी हुकणार होती; पण शिक्षण विभागाने बी.एड., डी.एड. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पात्र ठरविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

-अश्विनी भालेराव, बी.एड. अंतिम वर्ष विद्यार्थी

---