शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

डी.एड., बी.एड. अंतिम वर्षाच्या तीन हजार विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:02 IST

-- डी.एड., बी.एड. अंतिम वर्षाच्या ३ हजार १०० विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी विद्यार्थ्यांमध्ये आनंद : शिक्षण विभागाचे महाराष्ट राज्य ...

--

डी.एड., बी.एड. अंतिम वर्षाच्या ३ हजार १०० विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी

विद्यार्थ्यांमध्ये आनंद : शिक्षण विभागाचे महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेला आदेश

औरंगाबाद : शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टिईटी) आता डी.एड., बी.एड. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील अंतिम वर्षात शिकत असलेल्या दोन हजार बी.एड. आणि १ हजार १०० डी.एड.च्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा देता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा होणार आहे. त्यासाठी ३ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. मात्र, या परीक्षेसाठी बी.एड. आणि डी.एड.च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षेपासून वंचित राहणार होते. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठविल्यावर शालेय शिक्षण विभागाने परीक्षा परिषदेला या विद्यार्थ्यांनाही ‘टीईटी’ची संधी देण्याचे आदेश दिले.

जिल्ह्यात डी.एड.चे ३ शासकीय, तर २७ खासगी महाविद्यालये असून, त्यात अंतिम वर्षात ११०० विद्यार्थी शिकत आहेत, तर बी.एड.च्या अंतिम वर्षात जिल्ह्यातील १८ महाविद्यालयांत १७०० विद्यार्थी तसेच एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्नित ४ बी.एड. महाविद्यालयात ३०० विद्यार्थी शिकत आहेत. ‘टीईटी’बाबत परीक्षा परिषदेचा निर्णय लवकरच अपेक्षित असून, जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा मिळणार आहे, असे बोलले जात आहे.

----

जिल्ह्यात डी.एड.च्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - २०००

बी.एड.च्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - ११००

---

पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

शिक्षक पात्रता परीक्षेकरिता ३ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. २५ ऑगस्टपर्यंत मुदत असलेल्या या प्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्याने आता ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. सुरुवातीला बी.एड., डी.एड.च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी नव्हती.

---

विद्यार्थी काय म्हणतात

---

कोरोनामुळे आधीच आर्थिक व शैक्षणिक स्थिती खराब झाली आहे. त्यात पुढे परीक्षा कधी होईल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे आता आम्हाला परीक्षेस संधी मिळाल्याने भवितव्य आशादायी वाटत आहे.

- गणेश बोरकर, बी.एड. अंतिम वर्ष विद्यार्थी

----

‘टीईटी’ परीक्षेची संधी हुकणार होती; पण शिक्षण विभागाने बी.एड., डी.एड. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पात्र ठरविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

-अश्विनी भालेराव, बी.एड. अंतिम वर्ष विद्यार्थी

---