शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

पेरणीत घट, मोडणीत वाढ

By admin | Updated: July 27, 2015 01:13 IST

राजेश खराडे , बीड निसर्ग कोपल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. कर्ज-पाणी करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीपाचा पेरा केला खरा मात्र, पिकांची मशागत करण्याच्या काळातच

राजेश खराडे , बीडनिसर्ग कोपल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. कर्ज-पाणी करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीपाचा पेरा केला खरा मात्र, पिकांची मशागत करण्याच्या काळातच शेतकऱ्यांना सबंध पिकावरच नांगुर फिरवण्याची वेळ आली आहे. पावसाने ओढ दिल्याने गत आठवड्यात खरीपाच्या पेरणीची शुन्य टक्के नोंद झाली आहे. पाऊस पडला तर दुबार नाहीतर रब्बीची तयारी या उद्देशाने खरीपातील पिके मोडली जात आहेत. यंदा जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले होते. पहिल्या पावसाच्या जोरावरच खरीपाच्या पेऱ्याला सबंध जिल्ह्यात सुरवात करण्यात आली. कमी-जास्त पावसाच्या जोरावर १५ जुन ते १५ जुलै या महिन्याभराच्या कालाधीत ९३ टक्के खरीपाची पेरणी करण्यात आली होती. पावसाने ओढ दिल्याने पेरणीत घट झाली आहे. गत आठवड्यात तर जिल्ह्यात शुन्य टक्के पेरणी झाली असल्याची नोंद कृषि विभागाकडे झाली आहे. सद्य स्थितीला ५ लाख २१ हजार ३४४ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे. ३१ जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास २ लाख ३४ हजार ५४३ हेक्टरावरील पिकांची मोडणी होणार आहे तर २ लाख १४ हजार ६३७ हेक्टरवर दुबार पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषि विभागाने वर्तविला आहे. दुबार पेरणीलाही आवश्यक असणारा पाऊस अजून तरी जिल्ह्यात दाखल झालेला नाही. त्यामुळे अडीच लाख हेक्टरच्या खरीपावर धोक्याची घंटा आहे. खरीपातील सर्व पिके कोमजली असून शेतकरी हताश झाला आहे. पावसाच्या आशेवर पिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करून पिकांची जपवणूक करण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून करण्यात आला. मात्र पासवसाने पाठ रविल्याने शेतकरी हताश झाला आहे. पिकांचा सर्वाधिक उत्पादन बाजूलाच आर्थिक फटकाचपेरणीपुर्व मशागतीपासून लागणारा बारदाना ते बि-बीयाणे खरेदीपर्यंत शेतकऱ्यांना एकरी ५ हजार मोजावे लागले होते. लागवडीच्या पिकातून उत्पादन तर सोडच मात्र झालेला खर्च निघाला नाही. शिवाय पिकांची मोडणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत डुबत आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले तरी दीड महिन्यापूर्वी मंजूर झालेला पीकविमा पदरात पडलेला नाही.४बँकांकडून पीककर्जाची प्रकरणेही प्रलंबित ठेवली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे.४काही शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून पेरणी केली होती. मात्र, आता व्याजाचा पैसा व मुद्दल देणार कशी ? हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे.