शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

भाडे कपातीसाठी अंतर घटविले

By admin | Updated: July 24, 2016 00:53 IST

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसाठी सुरू केलेल्या पर्यटन बसचे भाडे अखेर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसाठी सुरू केलेल्या पर्यटन बसचे भाडे अखेर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयासाठी या बसचे टी पॉइंट ते लेणीपर्यंतचे अंतर कमी केले जात आहे. त्यामुळे यापुढे पर्यटकांना टी पॉइंटवर सोडण्यात येईल. आजपर्यंत थेट लेणीपर्यंत ही बस धावत होती. परंतु आता पर्यटकांना टी पॉइंटवरून प्रदूषणमुक्त बस पकडावी लागेल.वेरूळ आणि अजिंठा लेणीसाठी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १५ आॅक्टोबर २०१५ पासून पर्यटन बसेस पर्यटकांच्या सेवेत दाखल झाल्या. सुरुवातीला या बसगाड्यांना पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु अवघ्या काही दिवसांनंतर पर्यटक नसल्याचे कारण पुढे करून या बसेस रद्द होण्याचे प्रकार सुरू झाले. त्यामुळे पर्यटकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रद्द केलेल्या दिवशी त्या पुणे मार्गावर चालविण्यात येत आहेत. अशा प्रकारे बसच्या फेऱ्या वारंवार रद्द होत असल्याने खाजगी वाहतुकीचा आधार घेण्याची वेळ पर्यटकांवर येत आहे. यासाठी विभाग नियंत्रक कार्यालयाने या बसगाड्यांचे भाडे कमी करून पर्यटक वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला. अखेर अजिंठा पर्यटन बसचे भाडे कपातीस मंजुरी मिळाली आहे. या बसचे भाडे ७२१ ऐवजी ६१५ घेतले जाणार आहे. त्यासाठी यंत्रणेत आवश्यक ते बदल केले जात आहेत.टी पॉइंट ते अजिंठा लेणीपर्यंतच्या ४ कि. मी. अंतरावर ‘एसटी’च्या प्रदूषणविरहित बसेस वगळता इतर वाहनांना प्रवेश बंदी आहे. पर्यटन बस अत्याधुनिक आणि प्रदूषणमुक्त असल्याने थेट लेणीपर्यंत पर्यटकांना सोडण्यात येत होते. परंतु यापुढे भाडे कपातीमुळे पर्यटकांना टी पॉइंटवरच सोडले जाईल. तेथून अन्य बस पकडून लेणीसाठी रवाना होण्याची वेळ पर्यटकांवर येणार आहे. या बसला वाहक दिल्यास टी पॉइंट ते लेणी, अशा फेऱ्या मारून अतिरिक्त उत्पन्नही मिळविता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु घेतलेल्या निर्णयामुळे कर्मचारी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.