शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:29 IST

जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानपिकावर मावा, तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव झाला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्येक शेतकऱ्याला केवळ २० ते २५ टक्केच उत्पादन झाले. प्रतिहेक्टरी जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले.

ठळक मुद्दे जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानपिकावर मावा, तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव झाला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्येक शेतकऱ्याला केवळ २० ते २५ टक्केच उत्पादन झाले. प्रतिहेक्टरी जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले. उत्पादन खर्च भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रूपयांची हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.२०१७-१८ यावर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच अनियमित पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांची धान रोवणी उशिरा झाली. त्यामुळे धानपिकाला फटका बसला. धानपीक जोमात येत असताना तसेच गर्भावस्थेत असताना मावा, तुडतुडा, खोडकिडा यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव धानपिकावर झाला. अनेक शेतकºयांनी तीन ते चार वेळा फवारणी करूनही उपयोग झाला नाही. यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला. त्यानंतर दिवाळी सणात परतीचा पाऊस आला. यादरम्यान हलके धानपीक कापणीला आले होते. परंतु पावसामुळे धानपीक सडले. जडप्रतीचे धानपीक विविध रोगांनी नष्ट झाले. अनेक गावांमध्ये पंचनामे करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून प्रती हेक्टरी २५ हजार रूपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी स्वीकारले.याप्रसंगी अनूसुचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, मिलींद बोगसर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, पी.टी. मसराम, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, नंदू वाईलकर, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, लता ढोक, पंकज बारसिंगे, कमलेश खोब्रागडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.आणेवारी चुकीची दाखविल्याचा आरोपखरीप हंगामात दरवर्षीच्या एकूण उत्पादनाच्या तुलनेत २० ते २५ टक्के उत्पादन झाले. परंतु सरकारी सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील केवळ १६६ गावांची आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी दाखविण्यात आली. ही आणेवारी चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून दाखविण्यात आली. तसेच शासनाची दिशाभूल करणारा अहवाल महसूल व कृषी विभागामार्फत शासनाला सादर करण्यात आला. त्यामुळे बहुतांश शेतकरी शासकीय मदतीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकºयांमध्ये रोष व्यक्त होत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.