शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

भाजपाच्या विजयात संभाजीरावांनी बांधलेली मोट निर्णायक

By admin | Updated: February 27, 2017 00:38 IST

लातूर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाच्या विजयात सर्वाधिक वाटा असलेले नेते आहेत.

दत्ता थोरे लातूरपालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाच्या विजयात सर्वाधिक वाटा असलेले नेते आहेत. आ. विनायकराव पाटील यांना पक्षात घेऊन अहमदपूर तालुका आणि विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपाचे वाढविलेले बळ आणि आ. सुधाकर भालेराव, रमेश कराड, माजी आमदार गोविंद केंद्रे अशा साऱ्या ग्रामीण नेत्यांना घेऊन त्यांनी बांधलेली पक्षाची मोट हेच भाजपाच्या जिल्हा परिषदेत मिळालेल्या बहुमताचे रहस्य आहे. पण त्यांच्यासकट भाजपातले हे नेते एकत्र येणे ही बाब पक्षाला जितकी चांगली आहे, तितकी ती कायम एकत्रच राहणे अवघड. ही एकी एकसंघ असणारी ‘मोट’ राहते की जिल्हा परिषदेपुरती बांधलेली ‘मोळी’ यावर खुद्द संभाजीराव आणि भाजपाचे पुढचे यश अवलंबून आहे. ३५ वर्षांची काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषदेतून हद्दपार होईल, हे कुणी सांगितले तरी खरे वाटले नसते. पण हे घडले. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांनी हे करून दाखविले. यासाठी त्यांनी केलेल्या व्यूहरचना निर्णायक ठरल्या. पहिला अफलातून मार्इंड गेम म्हणजे आ. विनायकराव पाटील यांना भाजपात घेणे. विनायकरावांच्या भाजपा प्रवेशाने स्वत: लातूर जिल्ह्यात पक्षाचे तीन आमदार झाले. या तीनही आमदारांच्या आपापल्या विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या ५८ पैकी ३५ जागा येतात. तर राहिलेल्या तीन विधानसभा मतदारसंघात २३. याशिवाय लातूर ग्रामीणमधून विधानसभेला पराभव झाल्यानंतर दररोज मशागत करणाऱ्या रमेश करांडांनी चौथा विधानसभा मतदारसंघ पक्षासाठी जिद्दीने लढविला. खुद्द आमदार त्रिंबक भिसे यांच्या गावातली पंचायत समिती त्यांनी खेचून आणली. भाजपाला मिळालेले यश हे चार विधानसभा मतदारसंघातलेच आहे. स्वत:च्या मतदारसंघात अपयश नको म्हणून शिरुर अनंतपाळच्या अ‍ॅड. संभाजीराव पाटील यांनाही संभाजीरावांनी पक्षात घेतले. छोटा-मोठा कशाला घ्यायचा असा संकुचित विचार केला नाही. या चार विधानसभा मतदारसंघातच पक्ष जिंकला. औशातल्या तीन जागा बोनस ठरल्या. प्रत्येकाने आपापल्या विधानसभा मतदारसंघातल्या जागा आमदारकीची निवडणूक लढावी तशाच पध्दतीने लढली. आपले सांभाळून दुसरीकडे कुणी गेले नाही की 'वाकूनही' बघितले नाही. इकडे पालकमंत्र्यांनी दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख यांच्याबरोबर शाब्दिक लढाई खेळली. ज्यामुळे ते मतदारात चर्चेत आले. साधेपणाने लोकात गेले. दाढीही केली नाही. प्रचाराला गेल्यावर हरिनाम सप्ताह दिसला तर मांडी घालून बसले. महाप्रसाद म्हणून तिथेच जेवले. हे आतून की नाटक याचा निष्कर्ष अवघड आहे, पण मतदारांना नेमके हेच भावत गेले आणि त्यांची छबी बनत गेली. वरपासून खालपर्यंत भाजपा नेत्यांच्या शब्दांची अशीच भुरळ पडून मोदी, फडणवीस व पाटील लाटीचे लोण काँग्रेस वटवृक्षाची मुळे रुजलेल्या गावा-गावातपर्यंत कधीच पोहोचले हे कळलेही नाही. अस्सल काँग्रेस मतदार असलेल्या ग्रामीण भागातही शहरी भाजपवाले पोहोचल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले. नोटाबंदीचे अर्थतज्ज्ञांनी दाखवून दिलेले अपयश अद्याप तरी लोकांना दिसत नसल्याचेच निकालाचे आकडे सांगतात. ज्यावर काँग्रेसचा शाब्दिक प्रचारजोर होता.