शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

भाजपाच्या विजयात संभाजीरावांनी बांधलेली मोट निर्णायक

By admin | Updated: February 27, 2017 00:38 IST

लातूर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाच्या विजयात सर्वाधिक वाटा असलेले नेते आहेत.

दत्ता थोरे लातूरपालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाच्या विजयात सर्वाधिक वाटा असलेले नेते आहेत. आ. विनायकराव पाटील यांना पक्षात घेऊन अहमदपूर तालुका आणि विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपाचे वाढविलेले बळ आणि आ. सुधाकर भालेराव, रमेश कराड, माजी आमदार गोविंद केंद्रे अशा साऱ्या ग्रामीण नेत्यांना घेऊन त्यांनी बांधलेली पक्षाची मोट हेच भाजपाच्या जिल्हा परिषदेत मिळालेल्या बहुमताचे रहस्य आहे. पण त्यांच्यासकट भाजपातले हे नेते एकत्र येणे ही बाब पक्षाला जितकी चांगली आहे, तितकी ती कायम एकत्रच राहणे अवघड. ही एकी एकसंघ असणारी ‘मोट’ राहते की जिल्हा परिषदेपुरती बांधलेली ‘मोळी’ यावर खुद्द संभाजीराव आणि भाजपाचे पुढचे यश अवलंबून आहे. ३५ वर्षांची काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषदेतून हद्दपार होईल, हे कुणी सांगितले तरी खरे वाटले नसते. पण हे घडले. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांनी हे करून दाखविले. यासाठी त्यांनी केलेल्या व्यूहरचना निर्णायक ठरल्या. पहिला अफलातून मार्इंड गेम म्हणजे आ. विनायकराव पाटील यांना भाजपात घेणे. विनायकरावांच्या भाजपा प्रवेशाने स्वत: लातूर जिल्ह्यात पक्षाचे तीन आमदार झाले. या तीनही आमदारांच्या आपापल्या विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या ५८ पैकी ३५ जागा येतात. तर राहिलेल्या तीन विधानसभा मतदारसंघात २३. याशिवाय लातूर ग्रामीणमधून विधानसभेला पराभव झाल्यानंतर दररोज मशागत करणाऱ्या रमेश करांडांनी चौथा विधानसभा मतदारसंघ पक्षासाठी जिद्दीने लढविला. खुद्द आमदार त्रिंबक भिसे यांच्या गावातली पंचायत समिती त्यांनी खेचून आणली. भाजपाला मिळालेले यश हे चार विधानसभा मतदारसंघातलेच आहे. स्वत:च्या मतदारसंघात अपयश नको म्हणून शिरुर अनंतपाळच्या अ‍ॅड. संभाजीराव पाटील यांनाही संभाजीरावांनी पक्षात घेतले. छोटा-मोठा कशाला घ्यायचा असा संकुचित विचार केला नाही. या चार विधानसभा मतदारसंघातच पक्ष जिंकला. औशातल्या तीन जागा बोनस ठरल्या. प्रत्येकाने आपापल्या विधानसभा मतदारसंघातल्या जागा आमदारकीची निवडणूक लढावी तशाच पध्दतीने लढली. आपले सांभाळून दुसरीकडे कुणी गेले नाही की 'वाकूनही' बघितले नाही. इकडे पालकमंत्र्यांनी दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख यांच्याबरोबर शाब्दिक लढाई खेळली. ज्यामुळे ते मतदारात चर्चेत आले. साधेपणाने लोकात गेले. दाढीही केली नाही. प्रचाराला गेल्यावर हरिनाम सप्ताह दिसला तर मांडी घालून बसले. महाप्रसाद म्हणून तिथेच जेवले. हे आतून की नाटक याचा निष्कर्ष अवघड आहे, पण मतदारांना नेमके हेच भावत गेले आणि त्यांची छबी बनत गेली. वरपासून खालपर्यंत भाजपा नेत्यांच्या शब्दांची अशीच भुरळ पडून मोदी, फडणवीस व पाटील लाटीचे लोण काँग्रेस वटवृक्षाची मुळे रुजलेल्या गावा-गावातपर्यंत कधीच पोहोचले हे कळलेही नाही. अस्सल काँग्रेस मतदार असलेल्या ग्रामीण भागातही शहरी भाजपवाले पोहोचल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले. नोटाबंदीचे अर्थतज्ज्ञांनी दाखवून दिलेले अपयश अद्याप तरी लोकांना दिसत नसल्याचेच निकालाचे आकडे सांगतात. ज्यावर काँग्रेसचा शाब्दिक प्रचारजोर होता.