शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

भाजपाच्या विजयात संभाजीरावांनी बांधलेली मोट निर्णायक

By admin | Updated: February 27, 2017 00:38 IST

लातूर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाच्या विजयात सर्वाधिक वाटा असलेले नेते आहेत.

दत्ता थोरे लातूरपालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाच्या विजयात सर्वाधिक वाटा असलेले नेते आहेत. आ. विनायकराव पाटील यांना पक्षात घेऊन अहमदपूर तालुका आणि विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपाचे वाढविलेले बळ आणि आ. सुधाकर भालेराव, रमेश कराड, माजी आमदार गोविंद केंद्रे अशा साऱ्या ग्रामीण नेत्यांना घेऊन त्यांनी बांधलेली पक्षाची मोट हेच भाजपाच्या जिल्हा परिषदेत मिळालेल्या बहुमताचे रहस्य आहे. पण त्यांच्यासकट भाजपातले हे नेते एकत्र येणे ही बाब पक्षाला जितकी चांगली आहे, तितकी ती कायम एकत्रच राहणे अवघड. ही एकी एकसंघ असणारी ‘मोट’ राहते की जिल्हा परिषदेपुरती बांधलेली ‘मोळी’ यावर खुद्द संभाजीराव आणि भाजपाचे पुढचे यश अवलंबून आहे. ३५ वर्षांची काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषदेतून हद्दपार होईल, हे कुणी सांगितले तरी खरे वाटले नसते. पण हे घडले. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांनी हे करून दाखविले. यासाठी त्यांनी केलेल्या व्यूहरचना निर्णायक ठरल्या. पहिला अफलातून मार्इंड गेम म्हणजे आ. विनायकराव पाटील यांना भाजपात घेणे. विनायकरावांच्या भाजपा प्रवेशाने स्वत: लातूर जिल्ह्यात पक्षाचे तीन आमदार झाले. या तीनही आमदारांच्या आपापल्या विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या ५८ पैकी ३५ जागा येतात. तर राहिलेल्या तीन विधानसभा मतदारसंघात २३. याशिवाय लातूर ग्रामीणमधून विधानसभेला पराभव झाल्यानंतर दररोज मशागत करणाऱ्या रमेश करांडांनी चौथा विधानसभा मतदारसंघ पक्षासाठी जिद्दीने लढविला. खुद्द आमदार त्रिंबक भिसे यांच्या गावातली पंचायत समिती त्यांनी खेचून आणली. भाजपाला मिळालेले यश हे चार विधानसभा मतदारसंघातलेच आहे. स्वत:च्या मतदारसंघात अपयश नको म्हणून शिरुर अनंतपाळच्या अ‍ॅड. संभाजीराव पाटील यांनाही संभाजीरावांनी पक्षात घेतले. छोटा-मोठा कशाला घ्यायचा असा संकुचित विचार केला नाही. या चार विधानसभा मतदारसंघातच पक्ष जिंकला. औशातल्या तीन जागा बोनस ठरल्या. प्रत्येकाने आपापल्या विधानसभा मतदारसंघातल्या जागा आमदारकीची निवडणूक लढावी तशाच पध्दतीने लढली. आपले सांभाळून दुसरीकडे कुणी गेले नाही की 'वाकूनही' बघितले नाही. इकडे पालकमंत्र्यांनी दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख यांच्याबरोबर शाब्दिक लढाई खेळली. ज्यामुळे ते मतदारात चर्चेत आले. साधेपणाने लोकात गेले. दाढीही केली नाही. प्रचाराला गेल्यावर हरिनाम सप्ताह दिसला तर मांडी घालून बसले. महाप्रसाद म्हणून तिथेच जेवले. हे आतून की नाटक याचा निष्कर्ष अवघड आहे, पण मतदारांना नेमके हेच भावत गेले आणि त्यांची छबी बनत गेली. वरपासून खालपर्यंत भाजपा नेत्यांच्या शब्दांची अशीच भुरळ पडून मोदी, फडणवीस व पाटील लाटीचे लोण काँग्रेस वटवृक्षाची मुळे रुजलेल्या गावा-गावातपर्यंत कधीच पोहोचले हे कळलेही नाही. अस्सल काँग्रेस मतदार असलेल्या ग्रामीण भागातही शहरी भाजपवाले पोहोचल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले. नोटाबंदीचे अर्थतज्ज्ञांनी दाखवून दिलेले अपयश अद्याप तरी लोकांना दिसत नसल्याचेच निकालाचे आकडे सांगतात. ज्यावर काँग्रेसचा शाब्दिक प्रचारजोर होता.