शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

आज फैसला !

By admin | Updated: October 19, 2014 00:20 IST

जालना : विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार, याबाबत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये असलेल्या उत्सुकतेला रविवारी दुपारी जाहीर होणाऱ्या निकालानंतर पूर्णविराम मिळणार आहे.

जालना : विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार, याबाबत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये असलेल्या उत्सुकतेला रविवारी दुपारी जाहीर होणाऱ्या निकालानंतर पूर्णविराम मिळणार आहे. या निकालाबाबत आज शेवटच्या दिवशीही बाजारात सट्टा तेजीतच होता. या निवडणुकीत युती आणि आघाडीत फूट पडल्याने पाचही मतदारसंघात चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. परिणामी निवडणूक चुरशीची झाली. मतदानानंतर कोण उमेदवार विजयी होणार, याबाबत त्या-त्या पक्षांचे उमेदवार वगळता अन्य कोणीही ठाम दावा करताना दिसत नव्हते. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून विजयश्रीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, या विषयीची उत्सुकता कायम राहिली. अनेक दिवसानंतर सट्टेबाजारही तेजीत आला. विशेष म्हणजे बाजारात सट्टा लावणाऱ्यांचीही संख्याही यावेळी अधिक होती, असे जाणकारांचे म्हणणे आहे. निवडणूक लागल्यापासून राजकीय वातावरणाने कळस गाठला. कोण बाजी मारणार, यावर शनिवारीही शर्यती, पैजा लागत होत्या. निवडून कोण येणार, त्याचबरोबर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाला कोण राहणार, यावरही काही जणांनी शर्यती लावल्या. सट्टेबाजारातील जाणकारांच्या माहितीनुसार काही निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)जिल्ह्यात पाच मतदारसंघातून एकूण ७७ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यातील मातब्बर उमेदवारांना प्रचारादरम्यान मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी रविवारी निकालानंतरच विजयश्रीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे स्पष्ट होणार आहे. ४पाचही मतदारसंघांमध्ये निवडणूक अतिशय चुरशीची झाली. मातब्बर उमेदवारांनी अक्षरश: जिवाचे रान केले. त्यामुळे गेल्या पंधरवाड्यात सर्वत्र वातावरण ढवळून निघाले होते. ४२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल दुपारी ३ वाजेपर्यंत घोषित झाला होता. यंदा त्यापेक्षाही एक तासाने कमी म्हणजे दुपारी २ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. ४याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश जोशी म्हणाले की, सर्वसाधारणपणे सहा-सात तासांमध्ये हा निकाल अपेक्षित आहे. याबाबत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सर्व मतमोजणी प्रक्रियेवर नियुक्त कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सरासरी दुपारी २ वाजेपर्यंत निकाल लागणे अपेक्षित आहे.