शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आज फैसला !

By admin | Updated: October 19, 2014 00:20 IST

जालना : विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार, याबाबत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये असलेल्या उत्सुकतेला रविवारी दुपारी जाहीर होणाऱ्या निकालानंतर पूर्णविराम मिळणार आहे.

जालना : विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार, याबाबत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये असलेल्या उत्सुकतेला रविवारी दुपारी जाहीर होणाऱ्या निकालानंतर पूर्णविराम मिळणार आहे. या निकालाबाबत आज शेवटच्या दिवशीही बाजारात सट्टा तेजीतच होता. या निवडणुकीत युती आणि आघाडीत फूट पडल्याने पाचही मतदारसंघात चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. परिणामी निवडणूक चुरशीची झाली. मतदानानंतर कोण उमेदवार विजयी होणार, याबाबत त्या-त्या पक्षांचे उमेदवार वगळता अन्य कोणीही ठाम दावा करताना दिसत नव्हते. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून विजयश्रीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, या विषयीची उत्सुकता कायम राहिली. अनेक दिवसानंतर सट्टेबाजारही तेजीत आला. विशेष म्हणजे बाजारात सट्टा लावणाऱ्यांचीही संख्याही यावेळी अधिक होती, असे जाणकारांचे म्हणणे आहे. निवडणूक लागल्यापासून राजकीय वातावरणाने कळस गाठला. कोण बाजी मारणार, यावर शनिवारीही शर्यती, पैजा लागत होत्या. निवडून कोण येणार, त्याचबरोबर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाला कोण राहणार, यावरही काही जणांनी शर्यती लावल्या. सट्टेबाजारातील जाणकारांच्या माहितीनुसार काही निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)जिल्ह्यात पाच मतदारसंघातून एकूण ७७ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यातील मातब्बर उमेदवारांना प्रचारादरम्यान मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी रविवारी निकालानंतरच विजयश्रीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे स्पष्ट होणार आहे. ४पाचही मतदारसंघांमध्ये निवडणूक अतिशय चुरशीची झाली. मातब्बर उमेदवारांनी अक्षरश: जिवाचे रान केले. त्यामुळे गेल्या पंधरवाड्यात सर्वत्र वातावरण ढवळून निघाले होते. ४२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल दुपारी ३ वाजेपर्यंत घोषित झाला होता. यंदा त्यापेक्षाही एक तासाने कमी म्हणजे दुपारी २ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. ४याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश जोशी म्हणाले की, सर्वसाधारणपणे सहा-सात तासांमध्ये हा निकाल अपेक्षित आहे. याबाबत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सर्व मतमोजणी प्रक्रियेवर नियुक्त कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सरासरी दुपारी २ वाजेपर्यंत निकाल लागणे अपेक्षित आहे.