शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

औरंगाबादमध्ये २४ मेपर्यंत सलग लॉकडाऊनबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयातून होणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:49 IST

शहरात २० ते ते २४ मेपर्यंत लॉकडाऊन कसे असेल याबाबत १९ मे रोजीच निर्णय होईल

ठळक मुद्देऔरंगाबादचे जिल्हाधिकारी चौधरी यांची माहितीखासदारांचा मात्र सलग लॉकडाऊन लागू करण्यास विरोध

औरंगाबाद : शहरात २० मेपर्यंत १०० टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यापुढे लॉकडाऊन १०० टक्के ठेवायचे की सम-विषम तारखांना ठेवायचे याबाबत १९ मे रोजी विभागीय प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या समन्वय बैठकीतील निर्णयानुसार ठरेल, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी रविवारी दिले. 

अचानकपणे लॉकडाऊनमध्ये बदल करण्याचे निर्णय होत आहेत, रात्री उशिरा त्याबाबतची माहिती दिली जाते. ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या नागरिकांना ती माहिती मिळत नाही. त्यामुळे दूध, भाजीपाला विक्रेता शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच रमजान ईदच्या अनुषंगाने किमान खाद्यपदार्थ खरेदीसाठी लॉकडाऊनमध्ये सवलत असणार आहे की नाही, याबाबतचे प्रश्न नागरिकांना पडले आहेत. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, ३१ मेपर्यंत सरकारने लॉकडाऊन वाढविले आहे.  ग्रामीण भागात जे लॉकडाऊन आहे ते तसेच सुरू राहणार आहे. शहरात २० ते ते २४ मेपर्यंत लॉकडाऊन कसे असेल याबाबत १९ मे रोजीच निर्णय होईल. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन कडक करण्यात आल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

...तर ते लॉकडाऊन मानवतेच्या विरोधात ठरेल -इम्तियाज जलीलमागील दोन महिन्यांपासून औरंगाबादकर लॉकडाऊनला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. कोरोना विषाणूंची साखळी ब्रेक करण्यासाठी सलग तीन दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर आणखीन तीन दिवस वाढवून देण्यात आले. प्रशासन जर २४ मेपर्यंत सलग लॉकडाऊन वाढविण्याचा विचार करीत असेल तर ते अमानवीय होईल. त्याला माझा कडाडून विरोध राहणार आहे, असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले. प्रशासनाने मध्यरात्री औरंगाबादमध्ये तीन दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याची संधीही मिळाली नाही. कोरोनाचा पराभव करण्यासाठी लॉकडाऊनला आणखीन तीन दिवस मुदतवाढ देण्यात आली. २० मेपर्यंत नागरिक हे सहनसुद्धा करतील. मात्र, २४ मेपर्यंत सलग लॉकडाऊन वाढविण्याचा प्रशासन विचार करीत असेल तर तो चुकीचा आहे. पोलीस आणि लष्कर आणून हे सर्व करायचे असेल तर नागरिक सहन करणार नाहीत. नागरिकांना दररोज दुधाची गरज भासते. ज्यांच्या घरांमध्ये लहान लहान मुले आहेत त्यांचा तरी विचार झाला पाहिजे. 

दहा दिवस सामान्य माणसाने जगायचे कसे?विभागीय आयुक्तांनी २० तारखेनंतर २४ तारखेपर्यंत सलग लॉकडाऊन वाढविण्याचे केलेले सूतोवाच हे सामान्य जनतेवर अन्यायकारक ठरणारे असून, त्याबाबत प्रशासनाने योग्य तो विचार करावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष मोहसीन अहमद यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन सलग २४ तारखेपर्यंत वाढविल्यास सामान्य आणि हातावर पोट असणाऱ्या जनतेवर अन्यायकारक ठरेल. यामुळे  प्रशासनाने जनतेचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. सलग सहा दिवस संपूर्ण लॉकडाऊन घेतल्यानंतर तुम्ही एक-दोन दिवस ठराविक वेळ जनतेला जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दिला पाहिजे, असेही ते म्हणाले. 

शहरात दूध विक्रीला परवानगीकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी घेऊन आलेल्या नाशवंत पालेभाज्या व्यापाऱ्यांना इतर जिल्ह्यांत विक्रीसाठी नेता येतील; परंतु नव्याने जिल्ह्यातून भाजीपाला समितीत आणता येणार नाही. मात्र, शहरात घरोघरी पोहोचविण्यात येणारे दूध, तसेच दूध बॅग विक्री करण्यास परवानगी देण्यात आल्याचे पुरवठा अधिकारी महादेव किरवले यांनी सांगितले.जिल्हा पुरवठा अधिकारी किरवले, अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी रविवारी बाजार समितीमध्ये भेट दिली व उपलब्ध असलेला शेतीमाल, नाशवंत पालेभाज्या, फळे आदींबाबत आढावा घेतला. तसेच व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांचीही उपस्थिती होती.

१९ मे रोजी झारखंडसाठी रेल्वेऔरंगाबादहून नववी रेल्वे झारखंडला १९ मे रोजी सोडण्यात येईल. २ रेल्वे बिहारसाठी सोडण्यात येणार आहेत; परंतु अद्याप बिहार शासनाने मंजुरी दिलेली नाही. औरंगाबाद प्रशासनाने रेल्वेसाठी मागणी केली आहे

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद