शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

या निर्णयामुळे राज्यातील लॉटरी विक्रेत्यांचे नशीब फिरले; वर्षभरात साडेसात लाख झाले बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 13:25 IST

परराज्यातील लॉटरीवर महाराष्ट्रात २८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे लॉटरी विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी, मागील वर्षभरात राज्यातील ७ लाख ६५ हजार विक्रेत्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे.

ठळक मुद्दे राज्य शासन स्वत:ची आॅनलाईन लॉटरी १२ टक्के जीएसटी आकारून सुरू करील, या आशेवर उर्वरित ३५ हजार विक्रेते तग धरून आहेत

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : परराज्यातील लॉटरीवर महाराष्ट्रात २८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे लॉटरी विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी, मागील वर्षभरात राज्यातील ७ लाख ६५ हजार विक्रेत्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. राज्य शासन स्वत:ची आॅनलाईन लॉटरी १२ टक्के जीएसटी आकारून सुरू करील, या आशेवर उर्वरित ३५ हजार विक्रेते तग धरून आहेत, अशी धक्कादायक माहिती महाराष्ट्र राज्य आॅनलाईन लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. 

लॉटरी खेळणे चांगले की वाईट, हा वादाचा विषय आहे. मात्र, सरकारमान्य अधिकृत व्यवसायात लॉटरीचा समावेश होतो. राज्यात मटका, जुगारासारखे अवैध धंदे बोकाळले होते. त्याला लगाम घालण्याकरिता शासनाने राज्यात शासकीय लॉटरी १९६७ मध्ये सुरू केली. २००३ पासून राज्यात परराज्यातील आॅनलाईन लॉटरी विक्री सुरू झाली. यात गोवा, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड या पाच राज्यांतील आॅनलाईन लॉटरीचे दररोज दिवसभरात ८२ ड्रॉ काढण्यात येत असत.

यासंदर्भात विलास सातार्डेकर यांनी सांगितले की, जीएसटीपूर्वी लॉटरीच्या किमतीतून बक्षिसांची रक्कम वजा करून जी रक्कम उरते त्यावर कर लावण्यात येत असे. मात्र, १ जुलै २०१७ पासून जीएसटी लागू झाला आणि लॉटरीच्या संपूर्ण रकमेवर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येऊ लागला. यामुळे तेवढी रक्कम बक्षिसातून वजा करण्यात आली. परिणामी, ग्राहकांचे आॅनलाईन लॉटरीचे आकर्षण कमी झाले. उलाढाल घटल्याने दुकानाचे भाडेही निघेना. परिणामी, राज्यातील ८ लाखांपैकी मागील वर्षभरात ७ लाख ६५ हजार विक्रेते व्यवसायातून बाहेर पडले. सातार्डेकर म्हणाले की, ‘एक देश, एक कर’प्रणाली असे म्हणत केंद्राने जीएसटी लागू केला. मात्र, लॉटरीमध्ये परराज्यातील आॅनलाईन लॉटरीवर २८ टक्के, तर महाराष्ट्रातील लॉटरीवर १२ टक्के जीएसटी आकारला जात आहे. येथे मात्र एक कर प्रणालीला फाटा देण्यात आला आहे. 

राज्य सरकारने आश्वासन दिले होते की, शासन आॅनलाईन लॉटरी सुरू करणार आहे. मात्र, जिथे जीएसटीपूर्वी लॉटरीतून राज्य शासनाला २०० कोटी रुपये कर मिळत होता. तिथे आता जीएसटीतून सुमारे १ हजार कोटी कर मिळाला आहे. एवढी दुकाने बंद होऊनही महसूल जास्त जमा झाल्याने राज्य शासन आॅनलाईन लॉटरी सुरू करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

पावसाळी अधिवेशनात धरणे आंदोलन औरंगाबादेतील राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास खंडेलवाल यांनी सांगितले की, लॉटरी व्यावसायिकांना वाचविण्यासाठी राज्य संघटनेने येत्या पावसाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने स्वत:ची आॅनलाईन लॉटरी सुरू करावी, जीएसटीनुसार देशभरात एक समान कर आकारण्यात यावा, लॉटरी विक्रीत कमिशन वाढविण्यात यावे,  लॉटरी व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळावा, अधिकृत लॉटरी विक्रेत्यास सरकारने ओळखपत्र द्यावे, या मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे. 

टॅग्स :GSTजीएसटीState Governmentराज्य सरकार