शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी

By admin | Updated: March 19, 2017 23:26 IST

औसा :योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्जही माफ करू, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे व्यक्त केले.

औसा : शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. कर्जमाफीला आमचा विरोध नाही. पाणीसाठे आणि शाश्वत गुंतवणूक करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्जही माफ करू, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे व्यक्त केले.लातूर जिल्ह्यात १६ व १७ मार्च रोजी वादळी वारा व गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, औसा तालुक्यातील येल्लोरी, वरवडा शिवारातील नुकसानीची पाहणी त्यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासमवेत रविवारी केली. यावेळी ते शेतकऱ्यांशी बोलत होते. शेतकऱ्यांनी संकटाचा सामना धैर्याने करावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाचा विरोध नाही. मात्र शाश्वत गुंतवणुकीसाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याला प्राधान्य आहे. त्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहेत. गारपिटीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा प्रशासनाच्या वतीने सुरू असून, अहवाल शासनाकडे आल्यानंतर योग्य ती मदत केली जाईल. शेतकऱ्यांनी या नैसर्गिक संकटाचा सामना धैर्याने करावा. शासन तुमच्यासोबतच आहे, असेही प्रदेशाध्यक्ष दानवे यावेळी म्हणाले. येल्लोरी येथील गुंडाप्पा निटुरे, गुरुराज कुलकर्णी यांच्या शेतातील व वरवडा शिवारातील द्राक्ष बाग, डाळिंब, टोमॅटोची व अन्य पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आ. विनायकराव पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, रमेश कराड, किरण उटगे, महेश पाटील, सूर्यकांत शिंदे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, रोडगे, तहसीलदार अहिल्या गाठाळ, नायब तहसीलदार शशिकांत देवळे, उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार मोरे, तालुका कृषी अधिकारी दीपक बिराजदार, मंडळ अधिकारी तानाजी यादव, प्रभाकर मुगावे यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.