शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी

By admin | Updated: March 19, 2017 23:26 IST

औसा :योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्जही माफ करू, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे व्यक्त केले.

औसा : शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. कर्जमाफीला आमचा विरोध नाही. पाणीसाठे आणि शाश्वत गुंतवणूक करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्जही माफ करू, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे व्यक्त केले.लातूर जिल्ह्यात १६ व १७ मार्च रोजी वादळी वारा व गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, औसा तालुक्यातील येल्लोरी, वरवडा शिवारातील नुकसानीची पाहणी त्यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासमवेत रविवारी केली. यावेळी ते शेतकऱ्यांशी बोलत होते. शेतकऱ्यांनी संकटाचा सामना धैर्याने करावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाचा विरोध नाही. मात्र शाश्वत गुंतवणुकीसाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याला प्राधान्य आहे. त्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहेत. गारपिटीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा प्रशासनाच्या वतीने सुरू असून, अहवाल शासनाकडे आल्यानंतर योग्य ती मदत केली जाईल. शेतकऱ्यांनी या नैसर्गिक संकटाचा सामना धैर्याने करावा. शासन तुमच्यासोबतच आहे, असेही प्रदेशाध्यक्ष दानवे यावेळी म्हणाले. येल्लोरी येथील गुंडाप्पा निटुरे, गुरुराज कुलकर्णी यांच्या शेतातील व वरवडा शिवारातील द्राक्ष बाग, डाळिंब, टोमॅटोची व अन्य पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आ. विनायकराव पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, रमेश कराड, किरण उटगे, महेश पाटील, सूर्यकांत शिंदे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, रोडगे, तहसीलदार अहिल्या गाठाळ, नायब तहसीलदार शशिकांत देवळे, उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार मोरे, तालुका कृषी अधिकारी दीपक बिराजदार, मंडळ अधिकारी तानाजी यादव, प्रभाकर मुगावे यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.