जालना : दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर एकास जबर मारहाण करून त्यास जीवे मारल्याप्रकरणी तिघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना अंबड तालुक्यातील पिंपरखेड शिवारात १२ नोव्हेंबर रोजी घडली. दरम्यान, पाच दिवसांतच अंबड पोलिसांनी तपासपूर्ण करून हा खुनाचा प्रकार उघड करून आरोपींना जेरबंद केले.अंबड तालुक्यातील चिंचखेड गावात दारूबंदी असल्याने त्यागावातील दत्ता बाबूराव पारवे हा पिंपरखेड येथे दारू १२ नोव्हेंबररोजी पिण्याच्या गेल्या होता. तेथे एका दारू विक्रेत्या महिलेच्या घरी दारू पिल्यानंतर जास्त नशा झाल्याने तो त्या महिलेच्या घरा जवळ दारूच्या पडला होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास गावातील सखाराम शेषराव वनारसे , संदीप देवराव राजंणे, राहुल धोंडीबा नागरे हे दारू पिण्यासाठी आले होते. त्यानी दारू पिल्यानंतर त्यांना गावातीलच दत्ता पारवे हा तेथे नशेत पडलेला दिसला. त्यास त्या तिघांनी गावाकडे येण्यासाठी त्यास उठविले तेव्हा त्यांच्या शिवीगाळ होऊन भांडण झाले. त्यानंतर त्या तिघांनी त्यास मोटारसायकलवर बसवून गावाकडे घेऊन जात असताना रस्त्यात पुन्हा भांडणे झाले. त्यात जबर मारहाणीमुळे पारवे यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात प्रथम आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात जबर मारहाणीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला. तपासात त्या तिघांनी मारहाण केल्यामुळे पारवे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्या तिघांनाही अंबड पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी केला. आरोपींना अटक करण्यासाठी पोहेका आय.एस. सय्यद, कोकणे, एस.ए. देशमुख, कावळे, भोसले यांनी मदत केली. (वार्ताहर)
‘त्या’ व्यक्तीचा मृत्यू मारहाणीमुळे
By admin | Updated: November 18, 2015 00:37 IST