शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘त्या’ गॅसगळती प्रकरणातील चौथ्या जखमीचा मृत्यू

By admin | Updated: April 1, 2016 00:59 IST

जालना : शहरातील मंठा नाक्यावरील म्हाडा कॉलनीत धूलिवंदनाच्या दिवशी गॅस गळती करुन भाजलेल्या सहापैकी गंभीर जखमी असलेला विजय कांगणे याचा

जालना : शहरातील मंठा नाक्यावरील म्हाडा कॉलनीत धूलिवंदनाच्या दिवशी गॅस गळती करुन भाजलेल्या सहापैकी गंभीर जखमी असलेला विजय कांगणे याचा गुरूवारी सकाळी ९.४५ वाजता औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्याने या प्रकरणातील मृत्यूची संख्या आता चार झाली आहे. उर्वरित दोघांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.शहरातील म्हाडा कॉलनीत संदीप कांगणे यांनी आपल्या घरी होळीनिमित्त जेवणाचे आयोजन केले होते. परंतु संदीप कांगणे याने जाणीवपूर्वक सिलिंडरची नळी हवेत मोकळी सोडून गॅस गळती करीत तिघांच्या मुत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संदीप कांगणे याच्यावर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ मार्च रोजी किरकोळ घरगुती वादातून संदीप कांगणे याने स्वत:ला स्वयंपाकगृहात कोंडून घेत गॅस गळती केली. दरम्यान, मध्यस्थी करण्यास गेलेल्या शेजाऱ्यांसह मेव्हणाही यात गंभीररित्या भाजला होता.सहाही जखमींना औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. होळीसणानिमित्त संदीप कांगणे यांच्या घरी दुपारी १ ते २ घरी मेजवाणीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु संदीप कांगणे आणि त्याची पत्नी यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मेजवाणी असल्याने संदीप याने मद्य प्राशन केले होते. पत्नीशी वाद झाल्याने संदीप याने गॅसची नळी काढून टाकली आणि स्वयंपाक घराचा आतून दरवाजा बंद केला. त्याचवेळी कुटुंबियांनी व शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत स्वयंपाक घराचा दरवाजा तोडला आणि आगीचे लोळ अंगावर उडाले. यात सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, मंगळवारी सूर्यकांत महामुनी, राधाबाई कांगणे, गणेश वाघ यांचा मृत्यू झाला. तर ९६ टक्के भाजलेला विजय कांगणे याचा गुरूवारी सकाळी ९.४५ मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का बसला. सध्या ७० टक्के भाजलेला संदीप कांगणे आणि ८० टक्के गंभीर जखमी झालेला संदीप डिघोळे यांची अद्याप मृत्यूशी झुंज सुरुच आहे.जालना शहरातील गॅस गळती व स्फोट प्रकरणातील आठव्या दिवशी गंभीर जखमी असलेल्या विजय कांगणे (२८) याचा गुरूवारी सकाळी ९.४५ वाजता औरंगाबाद येथे खाजगी रूग्णालयात मृत्यू झाला. महिनाभरापूर्वीच विवाह झालेल्या विजयचा मृत्यू झाल्याने अर्ध्यावरती डाव मोडल्याची भावना त्याच्या मित्रांनी व्यक्त केली. १३ फेब्रुवारी २०१६ विजयचा विवाह झाला होता. विवाहाला जेमतेम चाळीस दिवसच झाले. भावी जीवनाचे स्वप्न रंगवत असतानाच नव्यानेच कंपनीत नोकरी लागल्याने तो खूश होता. आणि त्याने औरंगाबाद येथे घरही खरेदी केले होते. परंतु २४ मार्चची पहाट उगवली ती संकट घेऊनच. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण स्पप्नांचा चुराडा झाल्याची भावना त्याच्या मित्रांनी व्यक्त केली. त्याची पत्नीही एम.टेक. करत आहे. सध्या विजय जालना औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. वरिष्ठ पदावर असूनही विजयने कधीच गर्व केला नसल्याचे त्याचे मित्र सचिन काकडे, मोहन कोकाटे म्हणाले. धूलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या घटनेत सर्वांना घरातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात विजय ९६ टक्के भाजला गेला. पती-पत्नीच्या भांडणातून घडलेल्या या घटनेत सहाजण गंभीर भाजले. त्यात तीन दिवसांपूर्वीच सूर्यकांत महामुनी, राधाबाई कांगणे, गणेश वाघ यांचा मृत्यू झाला. तर ९६ टक्के भाजलेला विजय कांगणे याचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला.