शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वर्षभरात १,५२९ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:30 IST

शहरात दरवर्षी ५० हजार बालकांचा जन्म होतो. यातील १५२९ बालकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू होतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात दरवर्षी ५० हजार बालकांचा जन्म होतो. यातील १५२९ बालकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू होतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना २०१६ मधील जन्म आणि मृत्यूदराची आकडेवारी मनाला चटका लावून जाणारी आहे.मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने येथे रुग्ण येतात. घाटीच्या प्रसूतीशास्त्र विभागात दररोज ५० ते ७० बाळांचा जन्म होतो. याशिवाय महापालिकेतील पाच रुग्णालये, खाजगी रुग्णालयांमध्ये गरोदर महिलांची प्रसूती होते. शहरात कोणत्याही दवाखान्यात जन्म घेतलेल्या बाळाचे बर्थ सर्टिफिकेट महापालिकेतच घ्यावे लागते. प्रत्येक बालकाच्या जन्म-मृत्यूची नोंद महापालिकेला डोळ्यात तेल घालून करावी लागते. २०१६ मध्ये जानेवारी ते डिसेंबरपर्यंत ४९ हजार २४० बालकांनी जन्म घेतला. यामध्ये २५ हजार ७२१ मुले, तर २३ हजार ५१९ मुलींची संख्या होती. मुलींचा जन्मदर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत समाधानकारक आहे. जन्मापासून १ वर्षापर्यंत मरण पावलेल्या बालकांची संख्या १ हजार २९ आहे. यात मुलांची संख्या ६४६, तर मुलींची ३८३ आहे. जन्मापासून पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूची संख्या १७६ आहे. जन्मत:च मरण पावलेल्या बालकांची संख्या २८९ आहे. जन्मापूर्वीच मरण पावलेल्या बालकांची संख्या फक्त ३५ असल्याचा अहवालही मनपाच्या आरोग्य विभागाने शासनाला पाठविला आहे.विविध कल्याणकारी योजनाकेंद्र व राज्य शासनामार्फत माता मृत्यू, बालक मृत्यू दर कमी व्हावा यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. जन्मत:च मरण पावलेल्या मुलांचा आरोग्य विभागातर्फे स्वतंत्रपणे शोध घेण्यात येतो. यासाठी शासनाने समिती नेमलेली आहे. समिती मृत्यूच्या विविध कारणांचा शोध घेऊन शासनाला अहवाल सादर करते. महापालिका आरोग्य विभाग १०० टक्के शासन योजना राबवीत आहे. यासाठी आशा वर्कर्स आणि मनपाचे संपूर्ण कर्मचारी बाह्यरुग्ण विभागाचे काम संपल्यावर शासन योजनांवर काम करतात.-संध्या टाकळीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी२०१६ चा जन्म-मृत्यू दराचा अहवाल४९,२४०बालकांचा जन्म१,५२९बालकांचा मृत्यू९,५२९मोठ्या व्यक्तींचा मृत्यू