शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘डेडलाईन’ मार्चची; काम अजूनही अर्धवट

By admin | Updated: September 7, 2014 00:53 IST

संतोष वाघ, चितेगाव चितेगाव-इमामपूर या रस्त्यावरील तीन पुलांचे बांधकाम मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे.

संतोष वाघ, चितेगावचितेगाव-इमामपूर या रस्त्यावरील तीन पुलांचे बांधकाम मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. हे काम पूर्णत्वास नेण्याची मुदत मार्च २०१४ ची होती. मुदत संपूण सहा महिने झाले तरीही काम अर्धवटच आहे. पुलांचे काम संथ गतीने चालू असल्याने या रस्त्यावरील सर्व गावांच्या नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले असून पावसाळ्यात तर गावाबाहेर पडणे मुश्कील होते. राज्य रस्ता क्रमांक ३० पासून चितेगाव ते इमामपूर या १० कि़मी. रस्त्यावरील नदीवर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन पूल बांधकाम व पाच वर्षे देशभालीसाठी मार्च २०१३ मध्ये एक कोटी ८५ लाख रुपये मंजूर होऊन काम सुरू झाले. हे काम मार्च २०१४ मध्ये पूर्ण करण्याची अट असूनही या तीन पुलांची कामे अजून ५० टक्केही झालेले नाही. चितेगाव ते बाभूळगाव शिवारातील दोन पुलांचे काम हे १ कोटी ३० लाख रुपये मनीषा कन्स्ट्रक्शन यांनी घेतले असून या पुलाचे काम मध्यंतरी अनेकवेळा बंद ठेवले. जुना पूल हटविल्यानंतर नदीवर तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ताही पुरामुळे वाहून गेल्याने या ठिकाणाहून आपली वाहने ने-आण करणे मुश्कील झाले आहे. या रस्त्यावरील नद्यांना पूर आला तर बाभूळगाव, इमामपूर, पैठणखेडा, जयतपूर, केसापुरी, वाकी या गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटतो. या गावांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी बिडकीन, चितेगाव व औरंगाबाद या ठिकाणी ये-जा करावी लागते; परंतु रस्ताच नसल्याने खूप दूरवरून पायी येणे अवघड होत आहे. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला जनावरांना टाकावा लागत आहे. पुढे हा रस्ता वाळूज औद्योगिक वसाहतीला मिळतो. नदीला पाणी आल्याने अनेक कामगारांच्या रोजंदारीवर गदा येत आहे. याविषयी या गावांतील अनेक नागरिकांनी संबंधित ठेकेदाराकडे कामाविषयी तक्रार केली. या पुलाच्या बांधकामाचा कालावधी उलटला असून संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वरील गावांच्या नागरिकांनी केली आहे.