शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

मुक्या प्राण्यांनाही मरणयातना

By admin | Updated: March 14, 2016 00:56 IST

औरंगाबाद : प्रशासनाचा निष्काळजीपणा कमी झालेला नाही. प्राणिसंग्रहालयातील अनेक प्राण्यांना अजूनही विविध माध्यमातून यातना देणे सुरूच आहे.

औरंगाबाद : बिबट्याच्या तीन पिलांच्या मृत्यूनंतरही सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय प्रशासनाचा निष्काळजीपणा कमी झालेला नाही. प्राणिसंग्रहालयातील अनेक प्राण्यांना अजूनही विविध माध्यमातून यातना देणे सुरूच आहे. पाण्याअभावी मगरींचे हौद कोरडे पडले आहेत. तर बगळ्यांच्या हौदातही पाण्याचा अभाव आहे. किती तरी दिवसांपासून या हौदांमध्ये पाणी टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या प्राण्यांना त्रास सहन करावा लागत आहे.मनपाच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय हे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. या प्राणिसंग्रहालयात वाघ, हत्तींसह २३ प्रजातींचे सुमारे ३१० वन्यप्राणी आहेत. हे प्राणी पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे ७ लाख लोक प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. मात्र, सध्या येथील अनेक प्राण्यांना प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा सामना करावा लागत आहे. बिबट्याच्या तीन नवजात पिलांचा जन्मानंतर ३६ तासांत मृत्यू झाला. रेणू बिबट्याच्या गरोदरपणाबद्दल अनभिज्ञ असलेल्या अधिकाऱ्यांनी तिची योग्य काळजी घेतली नाही. शिवाय मादी बिबट्याला आजारी समजून तिला औषधांचे हाय पॉवर डोस दिले गेले. याचा परिणाम मुदतपूर्व प्रसूती होऊन अशक्तपणामुळे तिची तिन्ही पिल्ले दगावली. या गंभीर घटनेनंतरही प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. बिबट्याप्रमाणेच मगरी आणि बगळ्यांनाही मरणयातना भोगाव्या लागत आहेत. प्राणिसंग्रहालयात सध्या लहान मोठ्या सहा मगरी आहेत. त्यांच्यासाठी हौद करण्यात आलेले असून, त्यात सदैव भरपूर पाणी असणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून हे हौद रिकामे पडले आहेत. त्यात तळाला अगदी थोडेच पाणी शिल्लक असून तेही महिना दोन महिन्यांपासून बदललेले नाही. त्यामुळे त्यात घाण साचली आहे. बगळ्यांची अवस्थाही काहीशी अशीच आहे. याठिकाणी हत्तींच्या समोरील भागात बगळ्यांना जाळीदार घरात ठेवण्यात आलेले आहे. त्यात पाण्याचा मोठा हौद आहे. दिवसभर हे बगळे येथे पाण्यात खेळत असतात. मात्र, याठिकाणीही सध्या जेमतेम पाणी आहे. त्यातील पाणी किती तरी दिवसांपासून बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे पाण्यात घाण तयार होऊन याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. या परिस्थितीविषयी प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी पाणीटंचाईचे कारण दिले. पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.