शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

मुक्या प्राण्यांनाही मरणयातना

By admin | Updated: March 14, 2016 00:56 IST

औरंगाबाद : प्रशासनाचा निष्काळजीपणा कमी झालेला नाही. प्राणिसंग्रहालयातील अनेक प्राण्यांना अजूनही विविध माध्यमातून यातना देणे सुरूच आहे.

औरंगाबाद : बिबट्याच्या तीन पिलांच्या मृत्यूनंतरही सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय प्रशासनाचा निष्काळजीपणा कमी झालेला नाही. प्राणिसंग्रहालयातील अनेक प्राण्यांना अजूनही विविध माध्यमातून यातना देणे सुरूच आहे. पाण्याअभावी मगरींचे हौद कोरडे पडले आहेत. तर बगळ्यांच्या हौदातही पाण्याचा अभाव आहे. किती तरी दिवसांपासून या हौदांमध्ये पाणी टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या प्राण्यांना त्रास सहन करावा लागत आहे.मनपाच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय हे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. या प्राणिसंग्रहालयात वाघ, हत्तींसह २३ प्रजातींचे सुमारे ३१० वन्यप्राणी आहेत. हे प्राणी पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे ७ लाख लोक प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. मात्र, सध्या येथील अनेक प्राण्यांना प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा सामना करावा लागत आहे. बिबट्याच्या तीन नवजात पिलांचा जन्मानंतर ३६ तासांत मृत्यू झाला. रेणू बिबट्याच्या गरोदरपणाबद्दल अनभिज्ञ असलेल्या अधिकाऱ्यांनी तिची योग्य काळजी घेतली नाही. शिवाय मादी बिबट्याला आजारी समजून तिला औषधांचे हाय पॉवर डोस दिले गेले. याचा परिणाम मुदतपूर्व प्रसूती होऊन अशक्तपणामुळे तिची तिन्ही पिल्ले दगावली. या गंभीर घटनेनंतरही प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. बिबट्याप्रमाणेच मगरी आणि बगळ्यांनाही मरणयातना भोगाव्या लागत आहेत. प्राणिसंग्रहालयात सध्या लहान मोठ्या सहा मगरी आहेत. त्यांच्यासाठी हौद करण्यात आलेले असून, त्यात सदैव भरपूर पाणी असणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून हे हौद रिकामे पडले आहेत. त्यात तळाला अगदी थोडेच पाणी शिल्लक असून तेही महिना दोन महिन्यांपासून बदललेले नाही. त्यामुळे त्यात घाण साचली आहे. बगळ्यांची अवस्थाही काहीशी अशीच आहे. याठिकाणी हत्तींच्या समोरील भागात बगळ्यांना जाळीदार घरात ठेवण्यात आलेले आहे. त्यात पाण्याचा मोठा हौद आहे. दिवसभर हे बगळे येथे पाण्यात खेळत असतात. मात्र, याठिकाणीही सध्या जेमतेम पाणी आहे. त्यातील पाणी किती तरी दिवसांपासून बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे पाण्यात घाण तयार होऊन याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. या परिस्थितीविषयी प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी पाणीटंचाईचे कारण दिले. पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.