शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

घरासमोर वाजवणार डफडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:50 IST

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकृषी कर्ज थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर डफडे वाजवून वसुलीसाठी तगादा लावणार, अशी माहिती रमेश आडसकर यांनी पत्र परिषदेत दिली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकृषी कर्ज थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर डफडे वाजवून वसुलीसाठी तगादा लावणार, अशी माहिती रमेश आडसकर यांनी पत्र परिषदेत दिली. ५ आॅक्टोबरपासून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या दालनात झालेल्या या पत्रपरिषदेस माजी संचालक साहेबराव दरेकर, रमेश आडसकर, सुभाषचंद्र सारडा, अशोक पालवे, विलास बडगे, दिनकर कदम, दिलीप हंबर्डे, अनिल सोळंके, विलास सोनवणे, विजयकुमार गंडले, सुहास पाटील, वसंतराव सानप, मधुकर ढाकणे आदी उपस्थित होते.आडसकर म्हणाले की, बँकेने ९८८ कोटी शेतकºयांना, तर ८२ कोटी अकृषी कर्ज वाटप केले. ही आकडेवारी बघता अकृषी कर्जाची थकबाकी रक्कम १२ टक्केही नाही. आम्ही फक्त त्या ठरावावर सह्या केल्यामुळे दोषी आहोत; प्रत्यक्षात लाभ मात्र या बड्या मंडळींनीच उचलला आहे.गेल्या काही वर्षांपासून आम्ही कोर्टाच्या चकरा मारत आहोत. बाकी मंडळी इकडे फिरकतदेखील नाहीत. जनता ही आमच्याकडे आम्हीच बँक बुडविली, या नजरेतून बघत आहे. राजकीय हेव्यादाव्यातून चांगल्या स्थितीत असलेल्या या बँकेची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. १० वर्षांपूर्वी अंबासाखर कारखान्याने कर्ज घेतले होते. त्या बदल्यात आम्ही मद्य प्रकल्प बँकेच्या ताब्यात दिला आणि त्याच्या विक्रीतून कर्ज वसुली करावी असे सांगितले. त्यानंतर मात्र आम्ही, आमच्या कुठल्याही संस्थेने कर्ज घेतले नाही. तरीदेखील केवळ ठरावावर सही म्हणून आम्ही दोषी ठरत आहोत. बँकेला या आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आता आम्हीच पुढाकार घेतला आहे. बीड शहरातील बँकेने नोंदविलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर १४०/१३ यात सात संस्थांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. त्यापैकी तांबेश्वर शेतीमाल पुरवठा संस्था, आदित्य बहुउद्देशीय संस्था, श्रीमती मल्लवाबाई वल्याळ ट्रस्ट सोलापूर, व्यंकटेश्वर अ‍ॅग्रो शुगर शिवणी (ता. लोहा, जि. नांदेड), गजानन सहकारी साखर कारखाना, नवगण राजुरी, खंड औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्था अंबाजोगाई या सहा संस्थांनी आपल्यावरील कर्ज बेबाक केले; परंतु जयभवानी सहकारी साखर कारखाना, शिवाजीनगर गढी, ता. गेवराई यांच्यावर जवळपास ३९ कोटी रुपयांचे कर्ज थकबाकीत आहे. अशी बडी मंडळी थकबाकीदारांमध्ये असून, त्याचा फटका सर्वसामान्य शेतकºयांना कर्ज मिळण्यास बसला आहे. अशा थकबाकीदार बड्या मंडळींकडील कर्जवसुलीसाठी ५ आॅक्टोबरपासून मोहीम राबविण्यात येणार असून, त्यात आम्ही सहभागी होणार आहोत, असे या सर्वांनी पत्रपरिषदेत सांगितले.