शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

दिवसा वीज बंद : रात्रीचा विजपुरवठा शेतकऱ्यांसाठी जीवघेणा

By | Updated: December 4, 2020 04:14 IST

सय्यद लाल बाजारसावंगी : परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा न करता रात्री वीज मिळत असल्याने हा वीज पुरवठा त्यांच्या ...

सय्यद लाल

बाजारसावंगी : परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा न करता रात्री वीज मिळत असल्याने हा वीज पुरवठा त्यांच्या जीवावर उठला आहे. पिकांवर पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री घराबाहेर पडावे लागत असल्याने जीव मुठीत घेत कामे करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवसा विजपुरवठा खंडित न करता कायम वीज द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

यंदा बाजारसावंगीसह जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्यमान झाल्याने सर्वत्र मुबलक पाणी आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला. मात्र त्याची कसर रब्बी हंगामातून काढण्याच्या दृष्टीने बळीराजा तयारीस लागला आहे. विहिरीत मुबलक पाणी उपलब्ध असल्याने पिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही. मात्र महावितरणकडून ग्रामीण भागात बहुतांश वेळा दिवसा विजपुरवठा खंडित करत रात्री तो देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. डिसेंबर महिन्यात थ्री फेजसाठीचा वीज पुरवठा आहे. महिन्यातून किमान पंधरा दिवस हे रात्रीचे शेतकऱ्यांना वीज मिळत असल्याने रात्रीच्या अंधारात त्यांना आपल्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. यादरम्यान साप, विंचूसह इतर हिंस्र प्राण्यांची दहशत असताना सुद्धा जीवाची बाजी लावून पिकांना पाणी द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यासह मराठवाड्यात सध्या बिबट्याची दहशत असून अनेक ठिकाणी त्याने नागरिकांसह प्राण्यांवर हल्ला करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामुळे महावितरणने शेतकरी हिताचा विचार करून दिवसा विजपुरवठा द्यावा, अशी मागणी होत आहे.

-------------

- पहिल्या आठवड्यात सकाळी ९-३५ ते सायंकाळी ५-३५

- दुसऱ्या आठवड्यात रात्री ८-१५ ते सकाळी ६-१५

- तिसरा आठवड्यात सकाळी ९-३५ ते ५-३५

- चौथ्या आठवड्यात रात्री ८-१५ ते ६-१५

--------------

रात्रीचा विजपुरवठा नको

सध्या दोन आठवडे दिवसा तर दोन आठवडे रात्रीचा विजपुरवठा महावितरणकडून करण्यात येत आहे. रात्रीचा विजपुरवठा शेतकऱ्यांना जीवघेणा व धोक्याचे असल्याने दिवसाच्या टप्प्यात सलग वीज मिळाली तर शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देणे फायद्याचे होईल.

- अजिनाथ नलावडे, शेतकरी

-------------

पाणी मुबलक मात्र ...

यंदा पावसाने सुरेख साथ दिल्याने विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी असल्याने बाजारसावंगीसह परिसरातील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, उसाची लागवड केली आहे. पाणी मुबलक प्रमाणात असतानाही रात्रीच्या विजपुरवठ्यामुळे मुबलक पाणी असतानाही सुद्धा पिकांना आवश्यक त्या प्रमाणात पाणी देता येत नसल्याने उत्पादनात घट होणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी रात्रीचा विजपुरवठा हा दिवसा किमान दहा तास पूर्ण दाबाने व्हायला हवा.

- कारभारी साळुंके, शेतकरी

-------------

वीज मंडळाने ठरवून दिलेली वेळ

वीज मंडळातर्फे थ्री फेज शेतीसाठीच्या विजपुरवठा हा दोन टप्प्यात करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार पंधरा दिवस दिवसा तर पंधरा दिवस रात्री अशा पद्धतीने वीज मंडळाने ठरवून दिलेल्या वेळेत रात्री दहा तास तर दिवसा आठ तास नियमानुसार देण्यात येत आहे. आम्ही शासनातर्फे आलेल्या निर्णयाचे पालन करीत आहोत.

- यु.बी. खान, सहाय्यक अभियंता, महावितरण कार्यालय खुलताबाद