शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
4
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
5
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
6
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
7
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
8
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
9
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
10
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
11
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
12
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
13
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
14
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
15
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
16
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
17
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
18
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
19
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
20
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!

दिवसा वीज बंद : रात्रीचा विजपुरवठा शेतकऱ्यांसाठी जीवघेणा

By | Updated: December 4, 2020 04:14 IST

सय्यद लाल बाजारसावंगी : परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा न करता रात्री वीज मिळत असल्याने हा वीज पुरवठा त्यांच्या ...

सय्यद लाल

बाजारसावंगी : परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा न करता रात्री वीज मिळत असल्याने हा वीज पुरवठा त्यांच्या जीवावर उठला आहे. पिकांवर पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री घराबाहेर पडावे लागत असल्याने जीव मुठीत घेत कामे करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवसा विजपुरवठा खंडित न करता कायम वीज द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

यंदा बाजारसावंगीसह जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्यमान झाल्याने सर्वत्र मुबलक पाणी आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला. मात्र त्याची कसर रब्बी हंगामातून काढण्याच्या दृष्टीने बळीराजा तयारीस लागला आहे. विहिरीत मुबलक पाणी उपलब्ध असल्याने पिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही. मात्र महावितरणकडून ग्रामीण भागात बहुतांश वेळा दिवसा विजपुरवठा खंडित करत रात्री तो देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. डिसेंबर महिन्यात थ्री फेजसाठीचा वीज पुरवठा आहे. महिन्यातून किमान पंधरा दिवस हे रात्रीचे शेतकऱ्यांना वीज मिळत असल्याने रात्रीच्या अंधारात त्यांना आपल्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. यादरम्यान साप, विंचूसह इतर हिंस्र प्राण्यांची दहशत असताना सुद्धा जीवाची बाजी लावून पिकांना पाणी द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यासह मराठवाड्यात सध्या बिबट्याची दहशत असून अनेक ठिकाणी त्याने नागरिकांसह प्राण्यांवर हल्ला करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामुळे महावितरणने शेतकरी हिताचा विचार करून दिवसा विजपुरवठा द्यावा, अशी मागणी होत आहे.

-------------

- पहिल्या आठवड्यात सकाळी ९-३५ ते सायंकाळी ५-३५

- दुसऱ्या आठवड्यात रात्री ८-१५ ते सकाळी ६-१५

- तिसरा आठवड्यात सकाळी ९-३५ ते ५-३५

- चौथ्या आठवड्यात रात्री ८-१५ ते ६-१५

--------------

रात्रीचा विजपुरवठा नको

सध्या दोन आठवडे दिवसा तर दोन आठवडे रात्रीचा विजपुरवठा महावितरणकडून करण्यात येत आहे. रात्रीचा विजपुरवठा शेतकऱ्यांना जीवघेणा व धोक्याचे असल्याने दिवसाच्या टप्प्यात सलग वीज मिळाली तर शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देणे फायद्याचे होईल.

- अजिनाथ नलावडे, शेतकरी

-------------

पाणी मुबलक मात्र ...

यंदा पावसाने सुरेख साथ दिल्याने विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी असल्याने बाजारसावंगीसह परिसरातील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, उसाची लागवड केली आहे. पाणी मुबलक प्रमाणात असतानाही रात्रीच्या विजपुरवठ्यामुळे मुबलक पाणी असतानाही सुद्धा पिकांना आवश्यक त्या प्रमाणात पाणी देता येत नसल्याने उत्पादनात घट होणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी रात्रीचा विजपुरवठा हा दिवसा किमान दहा तास पूर्ण दाबाने व्हायला हवा.

- कारभारी साळुंके, शेतकरी

-------------

वीज मंडळाने ठरवून दिलेली वेळ

वीज मंडळातर्फे थ्री फेज शेतीसाठीच्या विजपुरवठा हा दोन टप्प्यात करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार पंधरा दिवस दिवसा तर पंधरा दिवस रात्री अशा पद्धतीने वीज मंडळाने ठरवून दिलेल्या वेळेत रात्री दहा तास तर दिवसा आठ तास नियमानुसार देण्यात येत आहे. आम्ही शासनातर्फे आलेल्या निर्णयाचे पालन करीत आहोत.

- यु.बी. खान, सहाय्यक अभियंता, महावितरण कार्यालय खुलताबाद