शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

अर्धापूरच्या प्रकाशाला नियोजनाचा अंधार

By admin | Updated: May 28, 2014 00:41 IST

उदयकुमार गुंजकर , अर्धापूर अर्धापूर शहराला प्रकाशमय करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगाचा निधी आलेला असताना नियोजनाअभावी हा पण निधी इतरत्र वर्ग झाला़

 उदयकुमार गुंजकर , अर्धापूर अर्धापूर शहराला प्रकाशमय करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगाचा निधी आलेला असताना नियोजनाअभावी हा पण निधी इतरत्र वर्ग झाला़ त्यामुळे सर्वकाही उपलब्ध असूनही शहरवासियांना अंधारात वावरावे लागत आहे़ शहरातील प्रभागात नवीन पोल उभारणे, पथदिवे दुरूस्ती व सर्वत्र सीएफएल बल्ब बसविणे इत्यादी कामे करून अर्धापूर शहर प्रकाशमय करण्यासाठी निधी आलेला आहे़ पण नगरपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे अद्यापही या बाबतीत काहीच निर्णय झालेला नाही़ ग्रामपंचायतच्या काळात दिवाबत्तीवर चार ते पाच लाख रुपये खर्च होवून ७० टक्के शहर प्रकाशमय राहत होते़ पण आता त्या रकमेच्या दहा पट निधी आलेला असताना अद्यपि कोणतीही पाऊले उचलली गेली नाहीत़ नगर पंचायत अस्तित्वात येताच शहरातील दिवाबत्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते़ त्या लाखो रुपयांची बिले निघाली पण कागदोपत्री हिशोब जुळत नसल्याने लेखा परीक्षणात ताशेरेही ओढण्यात आले़ शहरातील दिवाबत्तीवर एवढा खर्च होवूनही काही प्रभागात अद्याप अंधार आहे़ नगर पंचायतच्या नियोजन शून्यतेमुळे यापूर्वी बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला निधी अद्यापही खर्च का झाला नाही म्हणून नांदेडच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी तत्कालीन मुख्याधिकार्‍यांना खडसावले़ त्यामुळे दरम्यानच्या काळात तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी फोनवरून सर्व नगरसेवकांची तत्काळ बैठक बोलावली होती़ त्या बैठकीत काम का झाले नाही, यावर काही तोडगा न निघता विकासनिधीवरून वादावादीचे रुपांतर नगरसेवकांच्या हाणामारीत झाले़ विकास कामांसाठी आलेला निधी नगर पंचायतने स्वत: खर्च न करता बांधकाम विभागाकडे वर्ग करून कोणाचे हित साधले, त्या वेळेस नगर पंचायतला पूर्ण वेळ मुख्याधिकारी, इंजिनिअर असतांना वेळेत काम पूर्ण होवू शकले नाही़ सत्तेचे विकेंद्रीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेला जादा अधिकार देवून सक्षम करावे आणि ग्रामविकास साधला पाहिजे हे राजीव गांधींचे स्वप्न असताना नगर पंचायतला आलेला निधी इतरत्र वर्ग करून काय साध्य करीत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे़ येणार्‍या निधीतून शहरात वसमत फाटा ते इरिगेशन कॉलनी, तसेच गावातील मुख्य रस्त्यावर बसस्टँड, बाजार चौक, दर्गाह ते तहसील कार्यालयापर्यंत पथदिवे उभारण्याची योजना अंमलात आणणार आहोत - आशुतोष चिंचाळकर, प्रभारी मुख्याधिकारी, नगर पंचायत, अर्धापूर सीएफएल बल्ब बसविण्याबाबत बैठकीत ठराव घेण्यात आला़ पण पुढे कार्यवाही शून्यच आहे - प्रकाश सरोदे, नगरसेवक़ दिवाबत्तीची योजना चांगली असून आचारसंहितेमुळे त्याला अंमलात आणण्यास उशीर होत आहे - रेखाताई काकडे, नगराध्यक्षा, नगर पंचायत, अर्धापूर आचारसंहितेचे कारण दाखवून प्रकाशासाठी घाई करून स्वत:चे हीत सांभाळत हा निधी इतरत्र वळवून नगर पंचायत शहराला अंधारात ठेवणार का? - सखाराम क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख, अर्धापूर