शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

अर्धापूरच्या प्रकाशाला नियोजनाचा अंधार

By admin | Updated: May 28, 2014 00:41 IST

उदयकुमार गुंजकर , अर्धापूर अर्धापूर शहराला प्रकाशमय करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगाचा निधी आलेला असताना नियोजनाअभावी हा पण निधी इतरत्र वर्ग झाला़

 उदयकुमार गुंजकर , अर्धापूर अर्धापूर शहराला प्रकाशमय करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगाचा निधी आलेला असताना नियोजनाअभावी हा पण निधी इतरत्र वर्ग झाला़ त्यामुळे सर्वकाही उपलब्ध असूनही शहरवासियांना अंधारात वावरावे लागत आहे़ शहरातील प्रभागात नवीन पोल उभारणे, पथदिवे दुरूस्ती व सर्वत्र सीएफएल बल्ब बसविणे इत्यादी कामे करून अर्धापूर शहर प्रकाशमय करण्यासाठी निधी आलेला आहे़ पण नगरपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे अद्यापही या बाबतीत काहीच निर्णय झालेला नाही़ ग्रामपंचायतच्या काळात दिवाबत्तीवर चार ते पाच लाख रुपये खर्च होवून ७० टक्के शहर प्रकाशमय राहत होते़ पण आता त्या रकमेच्या दहा पट निधी आलेला असताना अद्यपि कोणतीही पाऊले उचलली गेली नाहीत़ नगर पंचायत अस्तित्वात येताच शहरातील दिवाबत्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते़ त्या लाखो रुपयांची बिले निघाली पण कागदोपत्री हिशोब जुळत नसल्याने लेखा परीक्षणात ताशेरेही ओढण्यात आले़ शहरातील दिवाबत्तीवर एवढा खर्च होवूनही काही प्रभागात अद्याप अंधार आहे़ नगर पंचायतच्या नियोजन शून्यतेमुळे यापूर्वी बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला निधी अद्यापही खर्च का झाला नाही म्हणून नांदेडच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी तत्कालीन मुख्याधिकार्‍यांना खडसावले़ त्यामुळे दरम्यानच्या काळात तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी फोनवरून सर्व नगरसेवकांची तत्काळ बैठक बोलावली होती़ त्या बैठकीत काम का झाले नाही, यावर काही तोडगा न निघता विकासनिधीवरून वादावादीचे रुपांतर नगरसेवकांच्या हाणामारीत झाले़ विकास कामांसाठी आलेला निधी नगर पंचायतने स्वत: खर्च न करता बांधकाम विभागाकडे वर्ग करून कोणाचे हित साधले, त्या वेळेस नगर पंचायतला पूर्ण वेळ मुख्याधिकारी, इंजिनिअर असतांना वेळेत काम पूर्ण होवू शकले नाही़ सत्तेचे विकेंद्रीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेला जादा अधिकार देवून सक्षम करावे आणि ग्रामविकास साधला पाहिजे हे राजीव गांधींचे स्वप्न असताना नगर पंचायतला आलेला निधी इतरत्र वर्ग करून काय साध्य करीत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे़ येणार्‍या निधीतून शहरात वसमत फाटा ते इरिगेशन कॉलनी, तसेच गावातील मुख्य रस्त्यावर बसस्टँड, बाजार चौक, दर्गाह ते तहसील कार्यालयापर्यंत पथदिवे उभारण्याची योजना अंमलात आणणार आहोत - आशुतोष चिंचाळकर, प्रभारी मुख्याधिकारी, नगर पंचायत, अर्धापूर सीएफएल बल्ब बसविण्याबाबत बैठकीत ठराव घेण्यात आला़ पण पुढे कार्यवाही शून्यच आहे - प्रकाश सरोदे, नगरसेवक़ दिवाबत्तीची योजना चांगली असून आचारसंहितेमुळे त्याला अंमलात आणण्यास उशीर होत आहे - रेखाताई काकडे, नगराध्यक्षा, नगर पंचायत, अर्धापूर आचारसंहितेचे कारण दाखवून प्रकाशासाठी घाई करून स्वत:चे हीत सांभाळत हा निधी इतरत्र वळवून नगर पंचायत शहराला अंधारात ठेवणार का? - सखाराम क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख, अर्धापूर