शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

दंगल : राजेंद्र जंजाळ, फेरोज खान अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:19 IST

परवाच्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचे नगरसेवक फिरोज खान या दोघांना अटक केली. दोघांनाही १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : परवाच्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचे नगरसेवक फिरोज खान या दोघांना अटक केली. दोघांनाही १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.शहरातील राजाबाजार, नवाबपुरा, शहागंज, चेलीपुरा, मोतीकारंजा, गांधीनगर भागात ११ व १२ मे रोजी भीषण दंगल झाली होती. यात सहभागी असणाऱ्यांविरोधात पोलिसांनी दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत.जंजाळ यांच्याविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सकाळी १०.३० वाजता शिवाजीनगर परिसरातून जंजाळ यांना अटक केली. त्यावेळी शिवाजीनगरात तणाव निर्माण झाला होता. सकाळी जंजाळ यांना अटक करण्यासाठी विशेष पोलीस पथकाचे निरीक्षक नवले शिवाजीनगरात दाखल झाले होते. नागरिकांची गर्दी लक्षात आल्याने चौकशीसाठी तुम्हाला क्रांतीचौक ठाण्यात यावे लागेल, असे सांगितले. जंजाळ हे स्वत:च्या गाडीतून अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल यांच्यासह ठाण्यात हजर झाले; परंतु क्रांतीचौक ठाण्यात शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. फिर्यादी मोहंमद शोएब अब्दुल मुनाफ (२८, रा. राजाबाजार) यांचे दुकान व वाहनांना आग लावून लुटमार केल्याची व लाखोंचे नुकसान केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीत गाड्या व दुकानांच्या जाळपोळीत ४२ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांना घटनास्थळी सापडलेले पुरावे आणि व्हिडिओत जाळपोळ करताना दिसणारी व्यक्ती ही जंजाळ असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्या विरोधात मालमत्तेचे नुकसान, दंगलीत सहभाग आदी कलमान्वये रविवारी (दि.१३) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सर्व पुरावे हाती आल्यानंतर पोलिसांनी जंजाळ यांना मंगळवारी अटक केल्याचे ‘एसआयटी’ पथकातील अधिका-यांनी सांगितले.पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी जंजाळ यांना कागदपत्रांसह न्यायालयात हजर केले. गुन्हा घडताना दंगल झालेली असून, अटक आरोपीने घरे, मोटारसायकली व चारचाकी वाहनांची तोडफोड करून त्या जाळून टाकल्या, याबाबत नेमका काय उद्देश होता, वाहने जाळण्यासाठी व तोडफोड करण्यासाठी ज्या हत्यारांचा वापर केला, गाड्या जाळण्यासाठी ज्या साहित्याचा वापर केला ते जप्त करणे बाकी आहे, गुन्हा करतानाचे आरोपीच्या अंगावरील कपडे जप्त करणे आहे, फरार साथीदार आरोपींना अटक करणे आहे, दंगल घडवून समाजात अशांतता निर्माण केली असून, यामागे कोण आहे, याचा तपास करायचा आहे, म्हणून आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील मनीषा गंडले यांनी केली. यावेळी न्यायालयाने जंजाळ यांना १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तणावशिवाजीनगर येथील घरातून राजेंद्र जंजाळ यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना जिन्सी पोलीस ठाण्यात न नेता क्रांतीचौक पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा जंजाळ यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. शिवसेनेचे पदाधिकारी प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, माजी महापौर बापू घडामोडे, उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक राजू शिंदे, संजय केणेकर आदी यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करण्याचा इशारा दिल्यानंतर जमावाने पोलीस ठाण्याचा परिसर रिकामा केला.जंजाळ यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत समर्थकांनी हुल्लडबाजी केली. गर्दी वाढल्याने पोलिसांनीच अखेर जंजाळ यांना तुम्ही स्वत:हून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात या, असे सांगितले. त्यावर जंजाळ काही समर्थकांसह ठाण्यात दाखल झाले. यावेळी उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंडे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सी.डी. शेवगण तसेच शहरातील विविध ठाण्यांचे निरीक्षक, फौजदार आणि विशेष पोलीस शस्त्रासह पथक, दंगा काबू व्हॅनदेखील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात हजर होते. दरम्यानच्या काळात शिवाजीनगरातील नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठले. परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून राखीव दलाच्या तीन गाड्या व पोलीस कर्मचा-यांनी शिवाजीनगरला वेढा घातला होता. हडको, टीव्ही सेंटर चौकात देखील शिवसैनिकांनी दुकाने बंद ठेवून जंजाळ यांच्या अटकेचा निषेध केला.आधी फरार; नंतर शरणशहरात शुक्रवारी रात्री उसळलेल्या दंगलप्रकरणी मंगळवारी सकाळी एमआयएमचे विरोधी पक्षनेते फेरोज खान यांना अटक करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा नवाबपुरा येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. त्यापूर्वीच फेरोज खान फरार झाले होते. दिवसभरातील नाट्यमय घडामोडीनंतर सायंकाळी ६.३० वाजता आ. इम्तियाज जलील यांनी त्यांना सिटीचौैक पोलीस ठाण्यात हजर केले. पोलिसांनी विरोधी पक्षनेत्यास अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांच्या या अटक सत्रानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारArrestअटक