शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

सीईओंच्या सुनावणीला स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या प्रतिनिधींची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:03 IST

--- औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या सुनावणीला स्वामी विवेकानंद अकॅडमी संस्थेच्या प्रतिनिधींनी दांडी ...

---

औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या सुनावणीला स्वामी विवेकानंद अकॅडमी संस्थेच्या प्रतिनिधींनी दांडी मारली. त्यामुळे या संस्थेला त्यांचे म्हणणे मांडण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षकांचे नुकसान होणार नाही. यासंबंधी सविस्तर अहवाल महिना अखेरीस शिक्षण संचालकांना पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

चिकलठाणा परिसरात स्वामी विवेकानंद अकॅडमीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेने आठवी ते दहावीचे मराठी माध्यमाचे वर्ग या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच ६५० विद्यार्थ्यांना टिसी थेट स्पीड पोस्टाने पाठविल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले आहेत. यासंदर्भात पालक, युवासेना, एमआयएमनेही पालकमंत्र्यांकडे या विद्यार्थी व पालकांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सीईओ डॉ. गोंदावले यांना या प्रकरणात लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सीईओंनी बुधवारी शाळा, पालक, शिक्षकांची सुनावणी ठेवली होती. शिक्षक, पालक, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांच्यासह अधिकारी वेळेवर उपस्थित झाले. मात्र, शाळेचे किंवा संस्थेचे कुणीही हजर झाले नाही. एकतर्फी निर्णय न करता संस्थेला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत एक संधी दिली जाणार आहे. शाळेला कारवाई अपेक्षित आहे. मात्र, त्यांचे मनसुबे पूर्ण न होऊ देता इतर ३ पर्यायांची चाचपणी करून निर्णय घेण्यासाठी सविस्तर अहवाल शिक्षण संचालकांना दिला जाईल. शासनस्तरावर यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

--

विद्यार्थी, शिक्षकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ

--

शिक्षक आणि पालकांशी झालेल्या चर्चेनुसार शाळेने २० वर्षांहून अधिक सेवा दिलेल्या शिक्षकांनाही विश्वासात घेतलेले नाही. तसेच विद्यार्थ्यांना थेट टिसी पाठविणेही चुकीचेच आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. याची काळजी घेऊ. संस्थेला मराठी माध्यमाच्या शाळेसाठी मान्यता आणि जागा देण्यात आली होती. याचा सविस्तर अहवाल महिना अखेर शासनाला पाठवू. शासनस्तरावर यासंबंधी निर्णय होईल.

-डॉ. मंगेश गोंदावले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद.

--

तीन पर्यायांवर विचार

--

शाळा मान्यता काढण्याची वाट पाहतेय. त्यांना ते वर्ग चालवायचेच नाहीत. त्यामुळे ते सुनावणीला येण्याची शक्यता नाही. त्यासाठी कायदेशीर ३ मार्ग आहेत. त्याची चाचपणी करीत आहोत. त्या संस्थेवर प्रशासक नेमणे, दुसऱ्या इच्छुक संस्थेला ती शाळा चालविण्यासाठी देणे किंवा तेथील इच्छुक शिक्षकांनी एखादी संस्था स्थापन करून शाळा चालवणे. हे तीन कायदेशीर मार्ग आहेत. यासंबंधी वस्तुस्थिती शिक्षण संचालकांना कळवून त्यांच्याकडे सुनावणी होईल. ते निर्णय घेतील, असे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.