शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

गंगापूर तालुक्यात हजारो हेक्टर पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:02 IST

कन्नड व लासूर परिसरात झालेल्या पावसाने शिवना नदीला २० वर्षांनंतर पूर आला होता. यामुळे देवी दाक्षायणी मंदिराला पाण्याचा वेढा ...

कन्नड व लासूर परिसरात झालेल्या पावसाने शिवना नदीला २० वर्षांनंतर पूर आला होता. यामुळे देवी दाक्षायणी मंदिराला पाण्याचा वेढा पडून फरशी पूल पाण्याखाली आहे. नागपूर-मुंबई महामार्गावरील पुलावरवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. गंगापूर-लासूर हा मार्ग वाहतुकीसाठी बुधवारी दिवसभर बंद करण्यात आला होता. शहाजपूर, शिरजगाव, बोलेगाव, बाबरगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीकाठच्या गावांत व शिवारात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तर पुरामुळे पिंपळवाडी गावाचा संपर्क तुटला होता. नरसापूर-सारंगपूर गावाचा संपर्कही तुटला होता.

अंबेलोहळ, तुर्कांबाद व वाळूज परिसरात झालेल्या जोरदार पावसाने टेंभापुरी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. लिंबे जळगाव येथील शनी मंदिराला पाणी लागले आहे. धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून धामोरी बु. येथील नागझरी नदीला व शेंदुरवादा येथील खांब नदीला पूर आल्याने परिसरातील अनेक गावांत पाणी शिरले होते. शेंदुरवादा येथील प्रसिद्ध शेंदुरात्मक हे गणपती मंदिर काही काळ पाण्यात होते. कायगाव भागात जोरदार पाऊस झाल्याने लखमापूर, गणेशवाडी, अंमळनेर, अगरवाडगाव, भेंडाळा, भिवधानोरा, धनगरपट्टी शिवारात सोयाबीन पिकात पाणी तुंबले असून उसांचे पीक आडवे झाले आहे. तालुक्यात दिवसभरात एकूण ६२६ मि.मी पावसाची नोंद झाली असून डोणगाव मंडळात सर्वांत कमी म्हणजे ४१ मि. मी. तर सर्वाधिक तुर्काबाद मंडळात १२८ मि. मी. पाऊस पडला आहे.

080921\20210908_093333.jpg

गंगापूर : शिवना नदीला आलेल्या महापुरामुळे मालूंजा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने लासुर व गंगापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता