शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान हेक्टरमध्ये; पंचनामे एकरात!

By admin | Updated: April 16, 2015 01:00 IST

अनिल महाजन, धारुर तालुक्यात वादळी - वाऱ्याच्या तडाख्याने फळबागा उद्धवस्थ झाल्या. नुकसानीचे क्षेत्र हेक्टरमध्ये असताना प्रशासनाने मात्र, केवळ १७८ एकरवरील पिकांना बाधा पोहोचल्याचा जावईशोध लावला आहे

अनिल महाजन, धारुरतालुक्यात वादळी - वाऱ्याच्या तडाख्याने फळबागा उद्धवस्थ झाल्या. नुकसानीचे क्षेत्र हेक्टरमध्ये असताना प्रशासनाने मात्र, केवळ १७८ एकरवरील पिकांना बाधा पोहोचल्याचा जावईशोध लावला आहे. त्यामुळे कमालीचे आश्चर्य होत असून फेरपंचनाम्याची मागणी पुढे आली आहे.सलग पाच दिवस अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले. खरीप, रबी पिके वाया गेल्यामुळे आधीच शेतकऱ्यांचे गणित बिघडून गेले होते. पाणीटंचाईवर मात करत हजारो रुपये खर्च करुन काही शेतकऱ्यांनी कशाबशा फळबागा जोपासल्या. पिकेही चांगली आली;पण ऐन काढणीच्या वेळीच निसर्गाने वक्रदृष्टी फिरवली. त्यामुळे होत्याचे नव्हते झाले. सुकळी, देवठाणा, महातारगाव, मुंंगी, वाका या गावांतील टरबूज, खरबुजांचे पिक वाया गेले. मुंगी येथील शेतकरी अशोक सोळंके यांचे दोन एरवरील टरबूज वाया गेले. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला. अशीच आपत्ती इतर शेतकऱ्यांवरही ओढावली. गारांचा मारा इतका जबर होता की, टरबूज, खरबुजांचे जागेवरच दोन तुकडे पडले. शिवाय मका, ऊस, भेंडी या पिकांचेही मोठे नुकसान झाले.दरम्यान, प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले;परंतु केवळ १७८ एकरवर नुकसान झाल्याचा अहवाल दिल्याने पंचनाम्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तालुक्यात ६३२ हेक्टरवर फळबाग लाडवड आहे. मात्र, ७१ हेक्टरवरच नुकसान झाल्याचे दाखविल्याने प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप होऊ लागला आहे. विशेष म्हणजे तालुक्यात आंब्याचे उत्पादनही मोठे आहे. यंदा गारपिटीने कैऱ्या झडल्या. त्यामुळे आंबा उत्पादन करणाऱ्या तालुक्यालाच इतर ठिकाणच्या आंब्यांवर समाधान मानावे लागणार आहे.देशमुख यांचा बांधावरुन दौराआ. आर. टी. देशमुख यांनी नुकसानीच्या पाहणीसाठी नुकताच दौरा केला. काटेवाडी येथे केळीच्या बागा गारपिटीने भूईसपाट झाल्या. मात्र, देशमुख तेथे फिरकलेही नाही. शेजारच्या गावांमध्ये बांधावरुन त्यांनी पिकपाहणी दौरा आटोपला. त्यामुळे आ. देशमुख यांचा दौरा दिलासा देण्यासाठी होता की, देखाव्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.