शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वन्य प्राण्यांकडून कोवळ्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:04 IST

दुधड : दोन वर्षांपासून त्रस्त असलेल्या दुधड परिसरातील शेतकऱ्यांच्या यंदा सुरुवातीला पाऊस चांगला असल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. पेरणी ...

दुधड : दोन वर्षांपासून त्रस्त असलेल्या दुधड परिसरातील शेतकऱ्यांच्या यंदा सुरुवातीला पाऊस चांगला असल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. पेरणी केलेले पीक जोमात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तोच या कोवळ्या पिकांवर निलगायी, रानडुक्कर आदी वन्यप्राणी धुडगूस घालीत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

याबाबत दुधड शिवारातील शेतकऱ्यांनी वनविभागाला वारंवार माहिती दिली. परंतु त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. यासंबंधी शेतकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांकडे निवेदनाद्वारे कैफियत मांडली. माजी आमदार डॉ. कल्याण का‌ळे यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांना खडसावले. नागरिकांच्या समस्या सोडवा, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. असे सुचविल्यावर वनविभागाला उशीरा का होईना जाग आली आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

वनविभागाकडून आवाहन

शनिवारी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांनी पथकासह दुधड शिवारात नुकसान झालेल्या शेतशिवाराची पाहणी केली. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी वनविभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन केले. यावेळी बाबासाहेब चौधरी, किशोर चौधरी, विनायक चौधरी, शिवाजी चौधरी, शिवनाथ चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, सुदाम घोडके, वनपाल एस. बी. पुंड, वनरक्षक के. पी. शिंदे, ए. टी. भागवत, एस. एम. गोराडे आदींची उपस्थिती होती.