शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

धरण व नद्यांचे पाणी दूषित

By admin | Updated: June 6, 2014 01:11 IST

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे भूजल पातळी घटत असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर होत आहे.

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे भूजल पातळी घटत असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. जायकवाडी धरण, गोदावरी नदीचे पाणी थेट पिण्यासाठी अयोग्य, तर खाम नदीचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठीही योग्य नसल्याचे जलसंपदा विभागाच्या जलगुणवत्ता प्रयोगशाळेतील सूत्रांनी सांगितले.प्रयोगशाळेत दर महिन्याला गोदावरी नदीच्या नेवासा, येली, टाकळी धनगर, गंगाखेड आदी ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. शहरातून जाणार्‍या खाम नदीचे शेंदुरवादा, छावणी परिसरातील पाण्याच्या नमुन्याची तपासणी केली जाते.दरमहा होणार्‍या या तपासणीत गोदावरी नदीचे पाणी शेती वापरासाठी योग्य असल्याचे व नदीपात्रातील पाणी क्षारयुक्त असल्याने थेट पिण्यासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. खाम नदीमध्ये शहरातील घाण पाणी सोडल्यामुळे नदी पूर्ण प्रदूषित झाली असून, पाणी शेती व पिण्यासाठी योग्य नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. जायकवाडी धरणात खाम नदी व इतर नद्यांचे पाणी प्रक्रिया न करता सोडल्यामुळे दूषित झाले आहे. जायकवाडी धरणाचे पाणी पिण्यासाठी योग्य नाही. १३ वर्षांत ४,२७५ नमुन्यांची तपासणी जल गुणवता प्रयोगशाळा स्तर क्र. २ मध्ये शहरासह मराठवाड्यातील ४,२७५ खाजगी पाणी नमुन्यांची तपासणी केली आहे. २००१-२००२ मध्ये दोन पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली तर २००२-२००३ मध्ये १२९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली.२००३-२००४ मध्ये ६५ नमुन्यांची तपासणी केली आहे. सर्वांत जास्त २०११-२०१२ मध्ये ८४६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.