शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

धरण व नद्यांचे पाणी दूषित

By admin | Updated: June 6, 2014 01:11 IST

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे भूजल पातळी घटत असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर होत आहे.

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे भूजल पातळी घटत असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. जायकवाडी धरण, गोदावरी नदीचे पाणी थेट पिण्यासाठी अयोग्य, तर खाम नदीचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठीही योग्य नसल्याचे जलसंपदा विभागाच्या जलगुणवत्ता प्रयोगशाळेतील सूत्रांनी सांगितले.प्रयोगशाळेत दर महिन्याला गोदावरी नदीच्या नेवासा, येली, टाकळी धनगर, गंगाखेड आदी ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. शहरातून जाणार्‍या खाम नदीचे शेंदुरवादा, छावणी परिसरातील पाण्याच्या नमुन्याची तपासणी केली जाते.दरमहा होणार्‍या या तपासणीत गोदावरी नदीचे पाणी शेती वापरासाठी योग्य असल्याचे व नदीपात्रातील पाणी क्षारयुक्त असल्याने थेट पिण्यासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. खाम नदीमध्ये शहरातील घाण पाणी सोडल्यामुळे नदी पूर्ण प्रदूषित झाली असून, पाणी शेती व पिण्यासाठी योग्य नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. जायकवाडी धरणात खाम नदी व इतर नद्यांचे पाणी प्रक्रिया न करता सोडल्यामुळे दूषित झाले आहे. जायकवाडी धरणाचे पाणी पिण्यासाठी योग्य नाही. १३ वर्षांत ४,२७५ नमुन्यांची तपासणी जल गुणवता प्रयोगशाळा स्तर क्र. २ मध्ये शहरासह मराठवाड्यातील ४,२७५ खाजगी पाणी नमुन्यांची तपासणी केली आहे. २००१-२००२ मध्ये दोन पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली तर २००२-२००३ मध्ये १२९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली.२००३-२००४ मध्ये ६५ नमुन्यांची तपासणी केली आहे. सर्वांत जास्त २०११-२०१२ मध्ये ८४६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.